Homeशहरउल्हासनगरातील पॅनल क्रमांक १२ मधील पाणी समस्येची महापौरांकडून पाहणी

उल्हासनगरातील पॅनल क्रमांक १२ मधील पाणी समस्येची महापौरांकडून पाहणी

उल्हासनगर दि. ६ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर शहरातील पॅनल क्रमांक १२  मधील नागरिकांना पाण्याची भीषण टंचाई असल्याने ही पाणीटंचाईची समस्या सोडवण्यासाठी महापौर अश्विनी कमलेश निकम यांनी पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन परिस्थितीची पाहणी केली.

उल्हासनगर महानगरपालिकेच्या पॅनल क्रमांक १२  मधील सम्राट अशोक नगर, वडोल गाव तसेच आसपासच्या परिसरात मागील अनेक दिवसांपासून तीव्र पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. या भागातील नागरिकांना दररोजच्या जीवनात पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी स्थानिकांकडून सातत्याने केली जात होती. विशेषतः वडोल गाव परिसरात पाणीपुरवठा सुधारण्यासाठी जवळपास एक वर्षापूर्वी कामाला सुरुवात करण्यात आली होती. मात्र विविध कारणांमुळे हे काम अद्याप पूर्ण झालेले नसल्याने नागरिकांची गैरसोय अधिकच वाढली आहे. अनेक ठिकाणी पाईपलाईनचे काम अपूर्ण राहिले असून काही भागात नियमित पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार नागरिकांनी व्यक्त केली.

या समस्येबाबत नागरिकांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते शिवाजी रगडे तसेच स्थानिक नगरसेविका सविता ताई तोरणे-रगडे यांनी प्रशासनाकडे सविस्तर तक्रार नोंदवली. त्यानंतर या गंभीर समस्येची दखल घेत महापौर अश्विनी कमलेश निकम यांनी पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष त्या ठिकाणी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. महापौरांनी वडोल गाव आणि सम्राट अशोक नगर परिसरात जाऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधला व त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. नागरिकांनी पाण्याच्या अनियमित पुरवठ्याबाबत, अपूर्ण राहिलेल्या पाईपलाईन कामाबाबत तसेच कामाच्या विलंबाबाबत नाराजी व्यक्त केली.

यावेळी महापौर अश्विनी कमलेश निकम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना अपूर्ण काम तातडीने पूर्ण करण्याचे तसेच परिसरातील पाणीपुरवठा नियमित व सुरळीत करण्यासाठी आवश्यक ती तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. नागरिकांना लवकरात लवकर दिलासा मिळावा यासाठी प्रशासनाने गांभीर्याने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक नागरिकांनीही महापौरांनी स्वतः येऊन समस्या ऐकून घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि पाणी समस्येचे कायमस्वरूपी निराकरण लवकर व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबरनाथ पोलिसांची मोठी कारवाई ; ८६ हजार रुपयांचा साडेतीन किलो गांजा जप्त, एकाला...

अंबरनाथ दि. २१ ( प्रमोद दळवी ) : अंबरनाथ पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई करत तब्बल ३,.४५७  किलो गांजा जप्त...

‘हे लाजिरवाणे आहे’: व्हायरल क्लिप समोर आल्यानंतर अर्जेंटिनाचे विश्वचषक अंतिम आचार ताज्या छाननीखाली

अर्जेंटिनाच्या एन्झो फर्नांडिस (२४) याला लाल कार्ड दाखविल्यानंतर अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी विरोध केला (एपी फोटो) एंझो फर्नांडीझच्या निर्णायक रेड कार्डच्या परिणामावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न...

बोरिवलीत दुचाकीस्वाराला टाळताना बेस्ट बसने दुभाजक लावले, कोणतीही दुखापत झाली नाही

मुंबई: बोरिवली पूर्व येथे सोमवारी रात्री उशिरा बेस्टची बस रस्त्याच्या दुभाजकावर अडकली. दौलत नगर बसस्थानकाजवळ रात्री 11.20 च्या सुमारास ही घटना घडली...

पुणे खून प्रकरण: लग्नाला उशीर करण्यासाठी सिया आणि चेतनने सुरुवातीला केतनला जखमी करण्याची योजना...

सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी केतन अग्रवालच्या लग्नाला उशीर करण्यासाठी त्याला जखमी करण्याची योजना आखली पुणे: सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर,...

भारतातील सर्वात लांब वंदे भारत एक्सप्रेस मार्ग जे प्रत्येक प्रवाशाला माहित असले पाहिजेत |

भारताचे वंदे भारत एक्सप्रेस नेटवर्क 2019 लाँच झाल्यापासून लक्षणीयरीत्या विस्तारले आहे. अजनी ते पुणे हा मार्ग आता देशातील सर्वात लांब वंदे भारत प्रवास...

अंबरनाथ पोलिसांची मोठी कारवाई ; ८६ हजार रुपयांचा साडेतीन किलो गांजा जप्त, एकाला...

अंबरनाथ दि. २१ ( प्रमोद दळवी ) : अंबरनाथ पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई करत तब्बल ३,.४५७  किलो गांजा जप्त...

‘हे लाजिरवाणे आहे’: व्हायरल क्लिप समोर आल्यानंतर अर्जेंटिनाचे विश्वचषक अंतिम आचार ताज्या छाननीखाली

अर्जेंटिनाच्या एन्झो फर्नांडिस (२४) याला लाल कार्ड दाखविल्यानंतर अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी विरोध केला (एपी फोटो) एंझो फर्नांडीझच्या निर्णायक रेड कार्डच्या परिणामावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न...

बोरिवलीत दुचाकीस्वाराला टाळताना बेस्ट बसने दुभाजक लावले, कोणतीही दुखापत झाली नाही

मुंबई: बोरिवली पूर्व येथे सोमवारी रात्री उशिरा बेस्टची बस रस्त्याच्या दुभाजकावर अडकली. दौलत नगर बसस्थानकाजवळ रात्री 11.20 च्या सुमारास ही घटना घडली...

पुणे खून प्रकरण: लग्नाला उशीर करण्यासाठी सिया आणि चेतनने सुरुवातीला केतनला जखमी करण्याची योजना...

सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी केतन अग्रवालच्या लग्नाला उशीर करण्यासाठी त्याला जखमी करण्याची योजना आखली पुणे: सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर,...

भारतातील सर्वात लांब वंदे भारत एक्सप्रेस मार्ग जे प्रत्येक प्रवाशाला माहित असले पाहिजेत |

भारताचे वंदे भारत एक्सप्रेस नेटवर्क 2019 लाँच झाल्यापासून लक्षणीयरीत्या विस्तारले आहे. अजनी ते पुणे हा मार्ग आता देशातील सर्वात लांब वंदे भारत प्रवास...
error: Content is protected !!