Homeताज्या बातम्याकठोर कारवाई करून आतंकवाद्यांना कायमचा धडा शिकवा : ठाणे येथे विविध...

कठोर कारवाई करून आतंकवाद्यांना कायमचा धडा शिकवा : ठाणे येथे विविध मागण्या करत हिंदु जनजागृती समितीचे आंदोलन

ठाणे  दि.२६ :  काश्मीर खोर्‍यामध्ये व्यापक‘कोंबिंग ऑपरेशन’ राबवून अतिरेक्यांचा बीमोड करावा, ज्या परिसरातून सतत अतिरेकी आक्रमणे होत आहेत, तेथे कायमस्वरूपी लष्करी तळ उभारण्यात यावेत. काश्मीरमधील उरलेले हिंदू पर्यटक, व्यावसायिक आणि हिंदु पंडित यांचे जीवित रक्षण करण्यासाठी विशेष सुरक्षा आराखडा लागू करण्यात यावा तसेच भारत सरकारने जिहादी आतंकवाद्यांना आणि त्यांच्या भारतातील हस्तकांना जन्माची अद्दल घडेल, अशी कठोर सैन्य कारवाई करत कायमचा धडा शिकवावा अशा विविध मागण्या करत हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी ठाणे येथे आंदोलन केले. या आंदोलनात राष्ट्रप्रेमी नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

ठाणे पश्चिम येथील सॅटीस पुलाखाली २६ एप्रिलला सायंकाळी ५.३० वाजता केलेल्या आंदोलनात करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी पाकिस्तानच्या निषेधाचे फलक हातात धरले होते. त्यावेळी आंदोलनकर्त्यांनी काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा, मोदीजी घुसके मारो देश तुम्हारे साथ है., वंदे मातरम, भारत मातेचा विजय असो, अशा घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनात बजरंग दल, अखिल भारत हिंदु महासभा, सहयोग गोविंदा पथक, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती या संघटनांच्या प्रतिनिधींसह राष्ट्रप्रेमी नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. त्यावेळी शासनाला देण्यात येणाऱ्या निवेदनावर नागरिकांनी उस्फुर्तपणे स्वाक्षऱ्या केल्या.

या हल्ल्यात बळी पडलेले २८ पर्यटक देशभरातील विविध राज्यांतील असल्याने यातून संपूर्ण देशभरात दहशत माजवण्याचा दहशतवाद्यांचा उद्देश स्पष्ट होतो. हत्येचे जे व्हिडिओ आणि छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसारित झाली आहेत, ती पाहिल्यानंतर ही क्रूरता मानवतेलाही लाजवणारी आहे. गेल्या काही काळात हिंदु व्यावसायिक, कर्मचारी, काश्मीरी हिंदूंवर सातत्याने हल्ले होत आहेत. केंद्र सरकारने ३७० कलम रद्द करून काश्मीरला भारतीय घटनेच्या संपूर्ण चौकटीत आणले, निवडणुका घेतल्या, विकासाचे प्रयत्न केले; पण तरीसुद्धा जिहादी अतिरेकी कारवाया थांबायला तयार नाहीत. तसेच असे भीषण दहशतवादी हल्ले स्थानिकांच्या सहभागाशिवाय होणे शक्य नाही. वर्ष १९९० मध्ये ९० हजार हिंदूंची हत्या आणि साडेचार लाख काश्मिरी हिंदूंचे बलपूर्वक विस्थापन अशाच पद्धतीने करण्यात आले होते. आता ही आक्रमणे याच षड्यंत्राचा पुढचा भाग आहेत. त्यामुळे या हल्ल्यात कोणत्या संघटना, नेते वा जिहादी आतंकवादी सहभागी आहेत, हे शोधून त्यांच्यावर ‘दशहतवादविरोधी कायद्यांअंतर्गत कठोर कारवाई करून कायमचा धडा शिकवला पाहिजे, अशी मागणी समितीने केली आहे. अशी माहिती हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ता डॉ. उदय धुरी यांनी दिली .

­­­

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

12 वर्षांच्या तुरुंगवासानंतर मुंबई न्यायालयाने अल्पवयीन बलात्कार प्रकरणात पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

मुंबई: एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी 12 वर्षे तुरुंगात घालवलेल्या 35 वर्षीय व्यक्तीची निर्दोष मुक्तता करताना एका विशेष पोक्सो न्यायालयाने डॉक्टरांच्या...

बागेश्वर धाम प्रमुखाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमोर शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली; त्यांच्या या वक्तव्याचे...

पुणे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नागपुरात शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र...

IPL 2026: सर्वात तरुण. सर्वात वेगवान. न थांबता! वैभव सूर्यवंशी स्क्रिप्ट्स T20 इतिहास पुन्हा

आयपीएल 2026 मध्ये द वंडर किड वबिहाव सूर्यवंशी बिस्ट मोडमध्ये आहे " decoding="async" fetchpriority="high"/>द वंडर किड वबिहव सूर्यवंशी आयपीएल २०२६ मध्ये बीस्ट मोडमध्ये...

5 फॅब्रिक्स जे तुम्हाला उन्हाळ्यात थंड ठेवू शकतात

चला वास्तविक बनूया - कापूस हा प्रत्येकाचा उन्हाळा डीफॉल्ट आहे. आणि ते स्थान मिळवले आहे.हे मऊ, हलके आहे आणि हवा सहजतेने जाऊ देते, जे...

कथित पर्यावरण उल्लंघनाप्रकरणी पुणे रिव्हरफ्रंट प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश राज्याने दिले आहेत

पुणे: राज्याच्या पर्यावरण विभागाने पीएमसीच्या महत्त्वाकांक्षी रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट (RFD) प्रकल्पाबाबत कथित पर्यावरण मंजुरी (EC) उल्लंघनाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. 13 एप्रिल रोजी विभागाने पुणे...

12 वर्षांच्या तुरुंगवासानंतर मुंबई न्यायालयाने अल्पवयीन बलात्कार प्रकरणात पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

मुंबई: एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी 12 वर्षे तुरुंगात घालवलेल्या 35 वर्षीय व्यक्तीची निर्दोष मुक्तता करताना एका विशेष पोक्सो न्यायालयाने डॉक्टरांच्या...

बागेश्वर धाम प्रमुखाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमोर शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली; त्यांच्या या वक्तव्याचे...

पुणे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नागपुरात शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र...

IPL 2026: सर्वात तरुण. सर्वात वेगवान. न थांबता! वैभव सूर्यवंशी स्क्रिप्ट्स T20 इतिहास पुन्हा

आयपीएल 2026 मध्ये द वंडर किड वबिहाव सूर्यवंशी बिस्ट मोडमध्ये आहे " decoding="async" fetchpriority="high"/>द वंडर किड वबिहव सूर्यवंशी आयपीएल २०२६ मध्ये बीस्ट मोडमध्ये...

5 फॅब्रिक्स जे तुम्हाला उन्हाळ्यात थंड ठेवू शकतात

चला वास्तविक बनूया - कापूस हा प्रत्येकाचा उन्हाळा डीफॉल्ट आहे. आणि ते स्थान मिळवले आहे.हे मऊ, हलके आहे आणि हवा सहजतेने जाऊ देते, जे...

कथित पर्यावरण उल्लंघनाप्रकरणी पुणे रिव्हरफ्रंट प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश राज्याने दिले आहेत

पुणे: राज्याच्या पर्यावरण विभागाने पीएमसीच्या महत्त्वाकांक्षी रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट (RFD) प्रकल्पाबाबत कथित पर्यावरण मंजुरी (EC) उल्लंघनाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. 13 एप्रिल रोजी विभागाने पुणे...
error: Content is protected !!