उल्हासनगर दि ९ ( प्रमोद दळवी ) : मंगळवारी तेजश्री कंपाऊंड, कल्याण एमएसईबी कार्यालय परिसरात विविध सामाजिक संघटनांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात छावा संघटना निखिल गोळे समेत पदाधिकारी व कार्यकर्ता, प्रहार संघटना एडवोकेट स्वप्निल पाटिल, तसेच राष्ट्र कल्याण पार्टी अध्यक्ष शैलेश तिवारी, राज द्विवेदी, अरविंद दुबे, पर्यावरण मित्र शशिकांत दायमा, नीलू पंजवानी समेत अनेक कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

आंदोलनाचे प्रमुख मुद्दे म्हणजे शहरातील वाढीव वीजबिल, अदानी मीटरची सक्ती, तसेच जिन्स वॉश कारखान्यांना वीजपुरवठा खंडित न करणे आणि वीज मंडळाची कथित अकार्यक्षमता हे होते. मागील तीन वर्षांपासून महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ कल्याण विभाग कडून अनेक जिन्स वॉश कारखान्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश वीज मंडळास देण्यात आलेले असूनही, संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी या आदेशांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. यामुळे वालधुनी व उल्हास नदीतील वाढत्या प्रदूषणास वीज नियामक मंडळही तितकेच जबाबदार असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. याच पार्श्वभूमीवर वीज मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. दरम्यान, मुख्य कार्यकारी अभियंता यांनी पुढील ७ दिवसांत अवैध जिन्स वॉश कारखान्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कार्यवाही करण्यात येईल त्यासोबतच जबाबदार संबंधीत अधिकार्यांवर देखील कारवाई करण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन दिले.





























