शहाड दि. २६ ( प्रमोद दळवी ) : देवशयनी आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने उल्हासनगर येथील बिर्ला मंदिरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. या पवित्र दिवशी कल्याण युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मनोभावे दर्शन घेत राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य, शांती आणि सर्वांगीण कल्याणासाठी प्रार्थना केली.
यावेळी धार्मिक वातावरणात भक्तिभावाने पूजा-अर्चा करण्यात आली. उपस्थितांनी विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होत समाजात शांतता, ऐक्य आणि विकास नांदावा, अशी प्रार्थना केली. आषाढी एकादशीचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करत वारकरी परंपरेतील श्रद्धा आणि भक्तीचा संदेशही यावेळी देण्यात आला. या प्रसंगी कल्याण युवासेना लोकसभा सचिव हरजिंदरसिंह (विक्की) भुल्लर, उपशहर प्रमुख जयकुमार केणी, जितू उपाध्याय, विभागप्रमुख विनोद साळेकर, प्रमोद पांडेय, शिवसेना वैद्यकीय शहर समन्वयक बिपीन सिंह, उपविभाग प्रमुख विशाल आंबेकर, समाजसेवक महेश यादव तसेच शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





























