- चित्रफित जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवण्याचे सहा. आयुक्त (१) तथा जनसंपर्क अधिकारी अजय साबळे यांचे आवाहन
उल्हासनगर दि २५ : भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा असलेल्या सन १९७५ ते १९७७ मधील आणीबाणीला बुधवारी आज २५ जून २०२५ रोजी ५० वर्षे पूर्ण झाले आहे. या महत्त्वपूर्ण घटनेच्या स्मरणार्थ, राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत विशेष प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने शासनाच्या निर्देशान्वये उल्हासनगर महापालिकेत अधिकारी व कर्मचाऱ्यांना आणीबाणी विषयाची चित्रफीत दाखवण्यात आली.

केंद्र शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे, आणीबाणी प्रदर्शन व इतर कृतीच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यासंदर्भात दिनांक २०/०६/२०२५ रोजी शासन स्तरावरून महापालिका प्रशासनास निर्देश दिले आहेत. मा. मुख्यमंत्री महोदयांनी निवड केलेल्या महानगरपालिका व नगरपालिका यांच्या कार्यालयामध्ये सदरची कार्यवाही ही दिनांक २५/०६/२०२५ पासून करावयाची आहे.त्यानुसार मा. महापालिका प्रशासक तथा आयुक्त श्रीम. मनिषा आव्हाळे भा.प्र.से.. यांच्या मार्गदर्शनाखाली व उप-आयुक्त श्रीम. स्नेहा करपे, सहा. आयुक्त (१) तथा जनसंपर्क अधिकारी श्री. अजय साबळे यांचे उपस्थितीत शासन निर्देशान्वये सन १९७५ ते १९७७ मधील आणीबाणी विषयीची शासनाने तयार केलेली चित्रफीत आज दिनांक २५/०६/२०२५ रोजी सायं. ४:०० वाजता महापालिका मुख्यालयातील सभागृहात सर्व महापालिका अधिकारी व कर्मचारी यांना दाखविण्यात आली.

सदर चित्रफीतीमध्ये भारतामध्ये दि. २५ जून, १९७५ ते दि.३१ मार्च, १९७७ या कालावधीत घोषीत करण्यात आलेल्या आणीबाणीच्या कालावधीत ज्या स्वयंसेवी, सत्याग्रहींनी लोकशाहीकरिता लढा देऊन बंदिवास सोसला, अशा सत्याग्रहोंनी त्यावेळची परिस्थितीबाबत आपले मनोगत व्यक्त केले.सदर कार्यक्रमास उप-आयुक्त श्रीम. स्नेहा करपे, सहा. आयुक्त (१) तथा जनसंपर्क अधिकारी श्री. अजय साबळे, सहा. आयुक्त श्रीम. सलोनी निमकर, दिव्यांग कल्याण योजना विभाग प्रमुख श्री. राजेश घनघाव, पर्यावरण विभाग प्रमुख श्री. दत्तात्रेय जाधव, वाहन विभाग प्रमुख श्री. विनोद केणे, क्रीडा विभाग प्रमुख श्री. शांताराम चोधरी, सुरक्षा अधिकारी श्री. यशवंत सगळे, कनिष्ठ अभियंता श्री. महेंद्र धिंडे, सिस्टीम अॅनलिस्ट श्रीम. श्रध्दा बाविस्कर व इतर महापालिका अधिकारी/कर्मचारी उपस्थीत होते.श्री. अजय साबळे, सहा. आयुक्त (१) तथा जनसंपर्क अधिकारी यांनी उपस्थितांना सदरची चित्रफीत शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पाठविणेचे आवाहन करून सदर कार्यक्रमाची सांगता केली.






























