Homeशहरउल्हासनगरातील भरतनगर येथील रेल्वे ट्रॅक जवळ मातीचा भराव टाकल्याने नाल्यातील प्रवाह बंद...

उल्हासनगरातील भरतनगर येथील रेल्वे ट्रॅक जवळ मातीचा भराव टाकल्याने नाल्यातील प्रवाह बंद : पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता

उल्हासनगर दि. १२ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर शहरातील भरतनगर येथील रेल्वे ट्रॅक जवळ नाल्याच्या प्रवाहात पूर्णपणे माती टाकून तो प्रवाह बंद करण्यात आले आहे. पाण्याचा प्रवाह जाण्यासाठी एक छोटासा पाईप टाकण्यात आला आहे. पण पावसाळ्यात मात्र नाल्यातील पाण्याच्या प्रवाहाला मार्ग मिळाला नाही तर भरत नगर परिसरात पूर परिस्थित निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

उल्हासनगर शहरातील भरतनगर येथून वाहणारा नाला वालधुनी नदीला मिळतो. भरतनगर नाल्याचा काही परिसर अंबरनाथ नगरपालिकेमध्ये येत आहे. उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने भरतनगर येथील वालधुनी नदीतील गाळ काढण्याचे काम जेसीबीने सुरू करण्यात आले आहे. अंबरनाथ नगरपालिकेच्या परिसरात येणाऱ्या भरतनगर येथील काही ठिकाणी नाल्याची साफसफाई देखील करण्यात आली नाही. पावसाळा सुरू होणार असूनही अद्याप नाल्याची सफाई झाली नाही. नाल्यांमधील तुंबलेल्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात रेल्वे ट्रॅक जवळ वाहणाऱ्या या नाल्यात रेल्वेने मातीचा भराव टाकून नाल्याचा प्रवाह पूर्णपणे बंद केल्या असल्याचे त्या ठिकाणावरून दिसून येत आहे. त्यामुळे मुसळधार पावसात नाल्यातील पाण्याला प्रवाह मिळाला नाही तर भरत नगर परिसरात पूर परिस्थिती निर्माण होणार आहे. याशिवाय नाल्याच्या किनारी संरक्षण भिंतही नसल्यामुळे किनाऱ्यावरील राहणाऱ्या नागरिकांच्या घरात नाल्यातील पाणी शिरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शुक्रवारी काँग्रेसच्या विरोधी पक्ष नेत्या व नगरसेविका अंजली साळवे उल्हासनगर महानगरपालिकेचे मुख्य स्वच्छता निरीक्षक एकनाथ पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी भरतनगर येथील रेल्वे ट्रॅक जवळील नाल्याची पाहणी केली. त्यावेळी अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने त्या नाल्यातील साफसफाई देखील करण्यात आली नसल्याचे त्यांच्या निदर्शनात आले. याशिवाय रेल्वे ट्रॅक जवळील नाल्यात पूर्णपणे मातीचा भराव टाकून त्या मातीखाली एक छोटासा पाईप नाल्यातील पाणी जाण्यासाठी लावण्यात आला आहे. त्या ठिकाणी बंद असलेल्या नाल्याच्या प्रवाहामुळे व नाल्यातील साचलेल्या घाणीमुळे पावसाळ्यात त्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होणार आहे.

याबाबत काँग्रेसच्या विरोधी पक्ष नेत्या व नगरसेविका अंजली साळवे यांनी अंबरनाथ नगरपरिषदेचे नगराध्यक्ष तेजश्री करंजुळे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून भरत नगर येथील नाल्याबाबत व त्या ठिकाणी टाकण्यात आलेल्या मातीच्या भरावाबाबत तसेच पावसाळ्यात त्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होणार असल्याचे सांगितले. त्या ठिकाणी येऊन आपण परिस्थितीचा आढावा घ्यावा अशी विनंती केली. अंबरनाथ नगरपरिषदेचे नगराध्यक्ष तेजश्री करंजुळे यांनी नगरसेविका अंजली साळवे यांना आपण त्या ठिकाणी येऊन पाहणी करू अशा आश्वासन दिले. वेळेस त्या ठिकाणी पावसाळा सुरू होण्याआधीच नाल्याचा प्रवाह खुला केला नाही तर भरतनगर परिसर मुसळधार पावसात पाण्याखाली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नोकरीच्या खोट्या जाहिरातींना बळी पडू नका: महा मेट्रो

पुणे : मेट्रो प्रशासनाने नोकरी इच्छूक आणि नागरिकांनी खोट्या भरतीच्या जाहिरातींबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.प्रशासनाने म्हटले आहे की "बेईमान घटक" अनैतिक...

ज्ञानगंगा कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जर्मन नर्सिंग भरती व जर्मन भाषा प्रशिक्षणावरील मार्गदर्शन संपन्न

ठाणे दि. १२ ( प्रमोद दळवी )  : ज्ञानगंगा शिक्षण संकुलांतर्गत कार्यरत ज्ञानगंगा कॉलेज ऑफ नर्सिंग, ठाणे यांच्या माध्यमातून जी.एन.एम. (GNM) विद्यार्थ्यांसाठी जर्मन नर्सिंग...

बांगलादेशने ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक मालिका जिंकल्यानंतर मेहदी हसन मिराझला वीरगतीने रुग्णालयात दाखल केले.

हेल्मेटच्या बाजूला बाऊन्सर लागल्याने मेहदी हसन मिराझ उपचार घेत आहेत. (एक्स फोटो) बांगलादेशचा कर्णधार मेहदी हसन मिराझ याला गुरुवारी ढाका येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय...

कुत्रे सोडले, दार फोडले, व्हिडिओ रेकॉर्ड केले: मुंबईतील जनगणना कर्मचाऱ्यांची मुदत जवळ आल्यावर शिवीगाळ...

जनगणना 2027 हा भारतातील पहिला डिजिटल गणनेचा व्यायाम आहे मुंबई: मुंबई महानगर प्रदेशातील जनगणना करणाऱ्यांसाठी, लोकांची मोजणी न करणे ही सर्वात कठीण गोष्ट...

मुंबई-आग्रा महामार्गावर इगतपुरीजवळ ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने तब्बल ५ तास वाहतूक कोंडी

पुणे : मुंबई-आग्रा महामार्गावरील इगतपुरीपासून जवळच असलेल्या मुंडे गावाजवळ शुक्रवारी पहाटे ट्रकची धडक बसल्याने सुमारे पाच तास वाहतूक विस्कळीत झाली होती.पहाटे साडेचारच्या...

नोकरीच्या खोट्या जाहिरातींना बळी पडू नका: महा मेट्रो

पुणे : मेट्रो प्रशासनाने नोकरी इच्छूक आणि नागरिकांनी खोट्या भरतीच्या जाहिरातींबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.प्रशासनाने म्हटले आहे की "बेईमान घटक" अनैतिक...

ज्ञानगंगा कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जर्मन नर्सिंग भरती व जर्मन भाषा प्रशिक्षणावरील मार्गदर्शन संपन्न

ठाणे दि. १२ ( प्रमोद दळवी )  : ज्ञानगंगा शिक्षण संकुलांतर्गत कार्यरत ज्ञानगंगा कॉलेज ऑफ नर्सिंग, ठाणे यांच्या माध्यमातून जी.एन.एम. (GNM) विद्यार्थ्यांसाठी जर्मन नर्सिंग...

बांगलादेशने ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक मालिका जिंकल्यानंतर मेहदी हसन मिराझला वीरगतीने रुग्णालयात दाखल केले.

हेल्मेटच्या बाजूला बाऊन्सर लागल्याने मेहदी हसन मिराझ उपचार घेत आहेत. (एक्स फोटो) बांगलादेशचा कर्णधार मेहदी हसन मिराझ याला गुरुवारी ढाका येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय...

कुत्रे सोडले, दार फोडले, व्हिडिओ रेकॉर्ड केले: मुंबईतील जनगणना कर्मचाऱ्यांची मुदत जवळ आल्यावर शिवीगाळ...

जनगणना 2027 हा भारतातील पहिला डिजिटल गणनेचा व्यायाम आहे मुंबई: मुंबई महानगर प्रदेशातील जनगणना करणाऱ्यांसाठी, लोकांची मोजणी न करणे ही सर्वात कठीण गोष्ट...

मुंबई-आग्रा महामार्गावर इगतपुरीजवळ ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने तब्बल ५ तास वाहतूक कोंडी

पुणे : मुंबई-आग्रा महामार्गावरील इगतपुरीपासून जवळच असलेल्या मुंडे गावाजवळ शुक्रवारी पहाटे ट्रकची धडक बसल्याने सुमारे पाच तास वाहतूक विस्कळीत झाली होती.पहाटे साडेचारच्या...
error: Content is protected !!