Homeशहरभरत नगर येथील रेल्वे ट्रॅक जवळील तो मातीचा भराव काढल्याने नाल्यातील पाण्याचा...

भरत नगर येथील रेल्वे ट्रॅक जवळील तो मातीचा भराव काढल्याने नाल्यातील पाण्याचा प्रवाह सुरळीत सुरू : काँग्रेसच्या विरोधी पक्ष नेत्या व नगरसेविका अंजली साळवे यांच्या प्रयत्नांना यश

  • अंबरनाथ नगरपरिषदेचे नगराध्यक्ष तेजश्री करंजुळे यांनी त्वरित दखल घेतल्याने त्यांचे मानले आभार

अंबरनाथ दि..१३ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगरतील भरत नगर येथे रेल्वे ट्रॅक जवळ असलेल्या नाल्यात टाकण्यात आलेल्या मातीचा भराव अखेर हटवण्यात आल्याने त्या नाल्याचा प्रवाह आता सुरळीत सुरू झाला आहे. काँग्रेसच्या विरोधी पक्ष नेत्या व नगरसेविका अंजली साळवे यांनी केलेल्या प्रयत्नामुळे बंद असलेल्या नाल्याचा प्रवाह आता सुरळीत सुरू झाल्याने स्थानिक नागरिकांनी त्यांचे आभार प्रकट केले आहे.

उल्हासनगर शहरातील भरत नगर येथे रेल्वे ट्रॅक जवळील वाहणाऱ्या नाल्यात रेल्वेने मातेचा भराव टाकल्यामुळे त्या ठिकाणावरील नाल्याचा प्रवाह बंद झाला होता. काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्या  व नगरसेविका अंजली साळवे यांनी महानगरपालिकेच्या मुख्य स्वच्छता निरक्षकांसह भरत नगर येथील त्या नाल्याची पाहणी केली होती. त्यावेळी तो नाल्याचा प्रवाह मातीच्या भरावामुळे बंद असल्याचे त्यांच्या निर्देशनात आले होते.  या बंध नाल्याच्या  प्रवाहामुळे पावसाळ्यात भरत नगर परिसरात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाल्याने त्यांनी त्वरित या समस्या बाबत अंबरनाथ नगरपरिषदेचे नगराध्यक्ष तेजश्री करंजुळे यांना सांगितले. नगरसेविका अंजली साळवे यांच्या समस्या गांभीर्याने घेत नगराध्यक्ष तेजश्री करंजुळे यांनी त्वरित आदेश दिलाने भरत नगर येथील रेल्वे ट्रॅक जवळील नाल्यात टाकण्यात आलेला मातीचा भराव हटवण्यात आला आहे. त्यामुळे भरत नगर येथील नाल्याचा प्रवाह आता सुरळीत सुरू झाला आहे. नाल्याचा प्रवाह बंद असल्यामुळे त्या ठिकाणी नाल्यामध्ये घाण तुंबून राहिली होती. पण आता नाल्याचा प्रवाह सुरू झाल्याने तो तुंबलेला घाण कचरा नाल्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे. त्यामुळे भरत नगर येथील नाला आता स्वच्छ दिसू लागला आहे. पावसाळ्यात आता त्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होणार नाही असे चित्र दिसू लागले आहे.

नगराध्यक्ष तेजश्री करंजुळे यांनी आपल्या समस्यांची त्वरित दखल घेतल्याने काँग्रेसच्या विरोधी पक्ष नेत्या व नगरसेविका अंजली साळवे यांनी नगराध्यक्ष तेजश्री करंजुळे यांचे आभार प्रकट केले आहे. नगरसेविका अंजली साळवे यांच्या प्रयत्नामुळे भरत नगर येथील नाल्याचा प्रवाह आता सुरू झाल्याने स्थानिक नागरिकांनी देखील अंजली साळवे यांचे आभार मानले आहे. भरत नगर परिसरात पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होऊ नये व नागरिकांच्या घराचेही नुकसान होऊ नये याकरिता मी या गंभीर समस्या बाबत नगराध्यक्ष तेजश्री करंजुळे यांना संपर्क साधून सांगितल्यामुळे आज भरत नगर येथील बंद असलेल्या नाल्याचा प्रवाह सुरळीतपणे सुरू झाले असल्याचे अंजली साळवे यांनी सांगितले आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

फ्लॅट खरेदीदारांची ५० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डरवर गुन्हा दाखल

या रखडलेल्या प्रकल्पात 150 हून अधिक ग्राहकांनी अंदाजे 50 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पुणे : वाघोली पोलिसांनी शहरातील बांधकाम व्यावसायिक...

रेल्वे रूळ क्रॉस करून अपघाताला आमंत्रण देऊ नका याकरिता रेल्वे पोलिसांची जनजागृती : रेल्वे...

अंबरनाथ दि. १७ ( प्रमोद दळवी ) : अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्टेशनच्या मध्ये असणाऱ्या मोरिवली गाव येथे रेल्वे क्रॉसिंग दरम्यान होणाऱ्या अपघातांची  घटना...

लिओनेल मेस्सीच्या संघाने कोलकाता स्पर्धेतील गोंधळासाठी माजी बंगाल मंत्र्याला जबाबदार धरले आहे

अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी त्याच्या 'GOAT इंडिया टूर 2025' चा भाग म्हणून एका कार्यक्रमादरम्यान (पीटीआय फोटो) गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कोलकाता येथील युवा भारती...

मुंबईत पाण्याचा तुटवडा मुंबई बातम्या

मुंबईला पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमधील पाण्याची पातळी 10.3% पर्यंत घसरली आहे, बीएमसीने म्हटले आहे की ते 30 जून रोजी पुन्हा पाणी परिस्थितीचा आढावा...

नसरापूर बलात्कार-हत्येचा खटला अंतिम टप्प्यात, फिर्यादी पक्षाने अंतिम साक्षीदार तपासले | पुणे बातम्या

पुणे : नसरापूर बलात्कार आणि खून खटल्यातील खटला मंगळवारी विशेष पोक्सो न्यायालयासमोर अंतिम साक्षीदारांची तपासणी केल्याने निकालाच्या जवळ गेला.कोर्टाने फिर्यादी साक्षीदार (पीडब्ल्यू)...

फ्लॅट खरेदीदारांची ५० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डरवर गुन्हा दाखल

या रखडलेल्या प्रकल्पात 150 हून अधिक ग्राहकांनी अंदाजे 50 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पुणे : वाघोली पोलिसांनी शहरातील बांधकाम व्यावसायिक...

रेल्वे रूळ क्रॉस करून अपघाताला आमंत्रण देऊ नका याकरिता रेल्वे पोलिसांची जनजागृती : रेल्वे...

अंबरनाथ दि. १७ ( प्रमोद दळवी ) : अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्टेशनच्या मध्ये असणाऱ्या मोरिवली गाव येथे रेल्वे क्रॉसिंग दरम्यान होणाऱ्या अपघातांची  घटना...

लिओनेल मेस्सीच्या संघाने कोलकाता स्पर्धेतील गोंधळासाठी माजी बंगाल मंत्र्याला जबाबदार धरले आहे

अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी त्याच्या 'GOAT इंडिया टूर 2025' चा भाग म्हणून एका कार्यक्रमादरम्यान (पीटीआय फोटो) गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कोलकाता येथील युवा भारती...

मुंबईत पाण्याचा तुटवडा मुंबई बातम्या

मुंबईला पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमधील पाण्याची पातळी 10.3% पर्यंत घसरली आहे, बीएमसीने म्हटले आहे की ते 30 जून रोजी पुन्हा पाणी परिस्थितीचा आढावा...

नसरापूर बलात्कार-हत्येचा खटला अंतिम टप्प्यात, फिर्यादी पक्षाने अंतिम साक्षीदार तपासले | पुणे बातम्या

पुणे : नसरापूर बलात्कार आणि खून खटल्यातील खटला मंगळवारी विशेष पोक्सो न्यायालयासमोर अंतिम साक्षीदारांची तपासणी केल्याने निकालाच्या जवळ गेला.कोर्टाने फिर्यादी साक्षीदार (पीडब्ल्यू)...
error: Content is protected !!