उल्हासनगर दि . ३० ( प्रमोद दळवी ) : राज्याच्या राजकारणात अनेकदा धक्कातंत्राचा प्रत्यय देणारे तसेच सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी दिनाक २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी बारामतीत विमान अपघातात निधन झाले. अजित पवार यांची अकाली एक्झिट अवघ्या महाराष्ट्रासाठी धक्कादायक ठरली. ‘दादा माणूस’ अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून अजित पवार यांच्या चाहत्यांनी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यसंस्कारासाठी प्रचंड गर्दी केली होती आता. संपूर्ण महाराष्ट्रात अजित पवार यांना आदरांजली देण्यासाठी शोकसभा सुरू झाल्या आहेत.
उल्हासनगरात देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष भरत राजवानी यांनी अजित पवार यांना आदरांजली देण्यासाठी सर्वपक्षीय आदरांजली सभा आयोजित केली आहे. शनिवारी ३१ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० ते ७ च्या दरम्यान ही सर्वपक्षी आदांजली सभा उल्हासनगर पश्चिम येथील सपना गार्डन परिसरातील सिंधू भवन येथे होणार आहे. सर्वांनी या सभेला उपस्थित राहण्याचे निमंत्रण भारत राजवानी यांनी केले आहे.





























