Homeताज्या बातम्याकर्नाक पुलाचे ‘सिंदूर’ नामकरण केल्याने इतिहासाच्या काळ्या खुणा पुसल्या – मुख्यमंत्री देवेंद्र...

कर्नाक पुलाचे ‘सिंदूर’ नामकरण केल्याने इतिहासाच्या काळ्या खुणा पुसल्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • ऐतिहासिक सिंदूर पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई, दि. १०: भारतीयांना फसविणारा आणि अत्याचार करणारा अशी ओळख असेलेल्या कर्नाक या ब्रिटीश गव्हर्नरच्या नावाने मुंबईत स्थित दिडशे वर्षांपासूनच्या इतिहासाच्या काळ्या खुणा पुसत कर्नाक पुलाचे नामकरण ‘सिंदूर’ केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावरील व पी. डी’मेलो मार्गाला जोडणाऱ्या या सिंदूर (पूर्वीचा कर्नाक पूल) रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्‍यमंत्री फडणवीस यांच्‍या हस्‍ते झाले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मंत्री मंगल प्रभात लोढा, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार मनीषा कायंदे, माजी आमदार राज पुरोहित, बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, अपर आयुक्त अभिजीत बांगर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात इतिहासातील काळी प्रकरणे संपली पाहिजेत, त्याच्या खुणा मिटल्या पाहिजेत असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याने कर्नाक पुलाचे नाव बदलले. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे नष्ट केले. भारत पाकिस्तानात घुसून दहशदवादी अड्डे उद्धवस्त करू शकतो, हे दाखवून दिले. या सेनेच्या अतुलनीय कामगिरीमुळे सर्वांच्या मते महापालिकेने पुलाला ‘सिंदूर’ नाव दिले, याचा मला आनंद आहे. या पुलाची एकूण लांबी ३४२  मीटर असून रेल्वेच्या हद्दीत ७०  मीटर इतकी असल्याने निश्चितच मुंबईतल्या वाहतुकीसाठी पूल अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रेल्वेवरचा पूल असल्याने आणि दाटीवाटीच्या ठिकाणी असल्याने अडचणींवर मात करून मुंबई मनपाने कमी वेळात ऐतिहासिक जुन्या कर्नाक पुलाचे उत्कृष्ट बांधकाम केल्याने मुख्यमंत्र्यांनी मनपाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. शिवाय सिंदूर पूल मुंबईकरांना समर्पित करीत दुपारी ३ वाजल्यापासून तो वाहतुकीला खुला होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी घोषित केले.

सिंदूरपुलाविषयी माहिती

दक्षिण मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मशीद बंदर आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी सिंदूर पूल महत्त्वाचा आहे. मशीद बंदर परिसरात पूर्व आणि पश्चिम परिसर जोडणारा विद्यमान मार्ग कायम ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने या पुलाची पुनर्बांधणी केली आहे. मध्‍य रेल्‍वे प्रशासनाने मंजूर केलेल्‍या आराखड्यानुसार सिंदूर पुलाचे बांधकाम करण्‍यात आले आहे.

सिंदूरपुलाच्या पुनर्बांधणीचे फायदे

मुंबई शहराच्या दक्षिणेतील पी. डी’मेलो मार्गाकडील बंदर भाग आणि क्रॉफर्ड मार्केट, काळबादेवी, धोबी तलाव या वाणिज्यक भागांना लोहमार्गावरून पूर्व-पश्चिमेला जोडणारा महत्त्वाचा दुवा.पुलाच्या पुनर्बांधणीमुळे सुमारे १०  वर्षापासून बाधित झालेली पूर्व-पश्चिम वाहतुकीसाठी सुविधा उपलब्ध होणार. पूल कार्यान्वित झाल्यावर पी. डी’मेलो मार्ग विशेषतः वालचंद हिराचंद मार्ग व शहीद भगत सिंग मार्ग यांच्या छेदनबिंदूवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. पुलाच्या पुनर्बांधणीने युसुफ मेहरअली मार्ग, मोहम्मद अली मार्ग, सरदार वल्लभभाई पटेल मार्ग, काझी सय्यद मार्ग यावरील वाहतूक सुलभ होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कल्याण जिल्हा कक्ष प्रमुखपदी सौ. मीना (ताई) सोंडे यांची नियुक्ती

उल्हासनगर दि १६ ( प्रमोद दळवी )  : वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कल्याण जिल्हा (उल्हासनगर व अंबरनाथ) कक्ष प्रमुखपदी सौ. मीना...

विठ्ठलवाडी रेल्वे ट्रॅकजवळ गांजा विक्री करणाऱ्यावर पोलिसांची झडप; ५३० ग्रॅम गांजा जप्त

उल्हासनगर दि. १६ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर शहरातील कॅम्प क्रमांक-३ परिसरातील विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाजवळील गोपाळ समाज परिसरात रेल्वे ट्रॅकच्या कडेला एक इसम...

शाळा सुरू झाल्यानंतर महिन्याभरात शिक्षण पुरवठ्यासाठी दिलेला निधी | पुणे बातम्या

विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक साहित्य वेळेवर मिळावे यासाठी नागरी संस्था प्रयत्न करत आहे पुणे : पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर महिनाभरानंतर शैक्षणिक...

विराट कोहलीने मोडला रिकी पाँटिंगचा विक्रम, सर्वकालीन टॉप-फाइव्ह एलिट यादीत प्रवेश | क्रिकेट बातम्या

भारताचा विराट कोहली (ANI फोटो) विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याच्या चमकदार कारकिर्दीत आणखी एक मैलाचा दगड जोडला आणि ऑस्ट्रेलियन महान रिकी...

NITI आयोगाच्या अहवालात व्यापक पर्यटन सुधारणांची अपेक्षा आहे; हॉटेलची वाढ मंदावणारी नियामक अडथळे |...

नवीन NITI आयोग अहवाल हॉटेल प्रकल्प आणि पर्यटन वाढीला गती देण्यासाठी जलद मंजूरी आणि सोप्या नियमांची शिफारस करतो (प्रतिनिधित्वात्मक हेतूंसाठी AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा)...

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कल्याण जिल्हा कक्ष प्रमुखपदी सौ. मीना (ताई) सोंडे यांची नियुक्ती

उल्हासनगर दि १६ ( प्रमोद दळवी )  : वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कल्याण जिल्हा (उल्हासनगर व अंबरनाथ) कक्ष प्रमुखपदी सौ. मीना...

विठ्ठलवाडी रेल्वे ट्रॅकजवळ गांजा विक्री करणाऱ्यावर पोलिसांची झडप; ५३० ग्रॅम गांजा जप्त

उल्हासनगर दि. १६ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर शहरातील कॅम्प क्रमांक-३ परिसरातील विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाजवळील गोपाळ समाज परिसरात रेल्वे ट्रॅकच्या कडेला एक इसम...

शाळा सुरू झाल्यानंतर महिन्याभरात शिक्षण पुरवठ्यासाठी दिलेला निधी | पुणे बातम्या

विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक साहित्य वेळेवर मिळावे यासाठी नागरी संस्था प्रयत्न करत आहे पुणे : पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर महिनाभरानंतर शैक्षणिक...

विराट कोहलीने मोडला रिकी पाँटिंगचा विक्रम, सर्वकालीन टॉप-फाइव्ह एलिट यादीत प्रवेश | क्रिकेट बातम्या

भारताचा विराट कोहली (ANI फोटो) विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याच्या चमकदार कारकिर्दीत आणखी एक मैलाचा दगड जोडला आणि ऑस्ट्रेलियन महान रिकी...

NITI आयोगाच्या अहवालात व्यापक पर्यटन सुधारणांची अपेक्षा आहे; हॉटेलची वाढ मंदावणारी नियामक अडथळे |...

नवीन NITI आयोग अहवाल हॉटेल प्रकल्प आणि पर्यटन वाढीला गती देण्यासाठी जलद मंजूरी आणि सोप्या नियमांची शिफारस करतो (प्रतिनिधित्वात्मक हेतूंसाठी AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा)...
error: Content is protected !!