उल्हासनगर दि. १५ ( प्रमोद दळवी ): उल्हासनगर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व महानगरपालिका शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम सोमवारी दि.१५ जुन, २०२६ रोजी आयोजित करण्यात आला होता. शासन निर्देशानुसार शाळेच्या पहिल्या दिवशी दि.१५ जुन, २०२६ रोजी लोक प्रतिनिधी, उल्हासनगर महानगरपालिकेचे वर्ग १ व वर्ग २ चे अधिकारी महानगरपालिकांच्या शाळांना भेटी देऊन, शाळेच्या पहिल्या दिवशी नवागतांचे स्वागत व मार्गदर्शन करण्यात आले.

त्यास अंबरनाथ विधानसभा आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी महानगरपालिकेचा शहीद भगत सिंग हिंदी विद्यालय (मनपा शाळा क्र. ५) उल्हासनगर ५ येथे भेट देऊन शाळेच्या पहिल्या दिवशी नवागतांचे स्वागत केले तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना पाठ्य पुस्तके व स्वतः मार्फत विद्यार्थ्यांना वह्या व छत्रींचे वाटप करण्यात आले. उल्हासनगर महानगरपालिकेचे महापौर अश्विनी निकम , उप महापौर अमर लुंड, स्थायी समिती सभापती कलवंतसिंह सोहता, गटनेता अरुण आशान ,सभापती, शिक्षण समिती, व सर्व समित्यांचे सभापती, नगरसेवक यांनी त्यांच्या प्रभागातील महानगरपालिकेच्या शाळांना तसेच उल्हासनगर महानगरपालिकेतील वर्ग १ व २ चे अधिकारी यांनी सुद्धा भेटी देऊन शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत व मार्गदर्शन केले. भेटी दरम्यान नवगतांचे स्वागत पुष्पवृष्टि तसेच पुष्प देऊन करण्यात आले. सबंधित मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थ्यांना पाठयपुस्तकांचे वितरण व मार्गदर्शन केले. जसे मनपा शाळा क्र. १८ च्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक व फॅन्सी ड्रेस परिधान करून महापौर अश्विनी कमलेश निकम यांचे स्वागत केले.

मनपा शाळा क्र. १७ व २७ मध्ये इ. १ ली च्या विद्यार्थ्यांच्या हाताचे ठसे व मनपा शाळा क्र. ८,२९ व ३० यांनी विद्यार्थ्यांच्या तळ पायाचे ठसे एक आठवण म्हणून घेण्यात आले. तसेच महानगरपालिकेच्या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी लाडू व चॉकलेटचे वाटप करून विद्यार्थ्यांचा आजचा पहिला दिवस गोड करण्यात आला.

महानगरपालिकेच्या ८ शाळांमधील ४० वर्ग खोल्या ह्या डिजिटल करण्यात आलेल्या असून महापौर अश्विनी निकम यांनी हिंदी माध्यमांच्या शाळा डिजिटल करण्याकरीता पावले उचलली आहे. तसेच मा. शिक्षण सभापती यांनी उल्हासनगर महानगरपालिकेची इंग्रजी माध्यमाची शाळा लवकरच सुरू करणार असल्याचे तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप लवकरच करणार आहे असे जाहिर केले. महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी शिष्यवृत्ती परिक्षेत गुण संपादन करीत आहेत. त्यामुळे समाजातील सर्व पालकांनी महानगरपालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश घ्यावा असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले.






























