Homeताज्या बातम्यासुनेत्रा पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ : राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या

सुनेत्रा पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ : राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या

मुंबई दि ३१ ( प्रमोद दळवी )  : उपमुख्यमंत्री अजित पवार  यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा शनिवारी पार पडला.  सुनेत्रा पवार  यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. राजभवनात झालेल्या दिमाखदार सोहळ्यात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या आहेत. सुनेत्रा पवार यांना तीन खाती मिळाली आहेत. यामध्ये राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण,  अल्पसंख्यक विकास ही खाती मिळाली आहेत.

दरम्यान, सुनेत्रा पवारांनी पक्षाची सुत्रे हाती घ्यावीत अशी मागणी नेत्यांकडून होत होती. त्यात शनिवारी सकाळी देवगिरी निवासस्थानी येथे  सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली. याच ठिकाणी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत जनभावना लक्षात घेऊन सुनेत्रा पवार यांच्या नावाची निवड करण्यात आली. त्यानंतर हे सगळे नेते बैठकीतून बाहेर पडले. मग सुनेत्रा पवारांसह सगळेच नेते विधान भवनात पोहचले. याठिकाणी राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात अजित पवारांच्या  प्रतिमेला श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीला सुरुवात झाली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड झाली. अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते होते ते खाते सुनेत्रा पवार यांना देण्यात आलेले नाही. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. सुनेत्रा पवार  यांनी पदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पोस्ट करत त्यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी पंतप्रधान मोदी यांन अजित पवार  यांचाही उल्लेख केला.

शपथविधीनंतर ट्विट करत सुनेत्रा पवार म्हणाल्या, “आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला. आज त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत ‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्य भावनेने उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारताना मन अक्षरशः भरून येत आहे.” “दादांच्या अकाली जाण्याने मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असला, तरी त्यांनी शिकवलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रतीची बांधिलकी हाच माझा खरा आधार आहे. त्यांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी अखंड प्रामाणिकपणे काम करत राहीन, असेही सुनेत्रा यांनी म्हटले आहे. याच बरोबर, “या कठीण क्षणी महाराष्ट्रातील जनतेने दिलेली प्रेमाची साथ हेच माझे बळ आहे. आपल्या विश्वासाच्या जोरावर, दादांच्या विचारांना उजाळा देत, नव्या आशेने पुढे चालत राहीन,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातील म्हारळ गावात “देवाभाऊ कृषी माऊली सोहळा” उत्साहात संपन्न

उल्हासनगर दि. २७ ( प्रमोद दळवी )  : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्र...

रस्ता खचल्याने माळशेज घाट पुढील सूचना मिळेपर्यंत वाहतूक बंद

कल्याण ते अहिल्यानगर मार्गे माळशेज घाटादरम्यानची वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आली आहे पुणे : पुण्यापासून सुमारे 105 किमी अंतरावर असलेल्या जुन्नर...

RIL ने SC 15% कॅप पूर्ण करण्यासाठी कोस्टल रोड योजनेत बदल केला

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने बीएमसीला अद्ययावत कोस्टल रोड ओपन स्पेसेस प्लॅन सादर केला आहे (प्रतिनिधी प्रतिमा) मुंबई: SC ने कोस्टल रोड मोकळ्या जागांपैकी फक्त...

केके मोहम्मद, कनिसेट्टी यांना सुराणा पुरस्कार पुणे बातम्या

पुणे: प्रख्यात पुरातत्वशास्त्रज्ञ आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) चे माजी प्रादेशिक संचालक के के मुहम्मद आणि इतिहासकार आणि लेखक अनिरुद्ध कनिसेट्टी यांना...

कमिन्स, स्टार्क, हेझलवूड आणि अमूल्य धडे: अभिषेक मुंड आणि वासुदेव प्रसाद सिंग ऑस्ट्रेलियाच्या वेगवान...

(LR) वासुदेव प्रसाद सिंग, पॅट कमिन्स आणि अभिषेक मुंड ब्रिस्बेनमधील ॲलन बॉर्डर फील्डवर (फोटो सौजन्य: क्रिकेट ऑस्ट्रेलिया) नवी दिल्ली: "सर, येकीन नहीं हो...

उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातील म्हारळ गावात “देवाभाऊ कृषी माऊली सोहळा” उत्साहात संपन्न

उल्हासनगर दि. २७ ( प्रमोद दळवी )  : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्र...

रस्ता खचल्याने माळशेज घाट पुढील सूचना मिळेपर्यंत वाहतूक बंद

कल्याण ते अहिल्यानगर मार्गे माळशेज घाटादरम्यानची वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आली आहे पुणे : पुण्यापासून सुमारे 105 किमी अंतरावर असलेल्या जुन्नर...

RIL ने SC 15% कॅप पूर्ण करण्यासाठी कोस्टल रोड योजनेत बदल केला

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने बीएमसीला अद्ययावत कोस्टल रोड ओपन स्पेसेस प्लॅन सादर केला आहे (प्रतिनिधी प्रतिमा) मुंबई: SC ने कोस्टल रोड मोकळ्या जागांपैकी फक्त...

केके मोहम्मद, कनिसेट्टी यांना सुराणा पुरस्कार पुणे बातम्या

पुणे: प्रख्यात पुरातत्वशास्त्रज्ञ आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) चे माजी प्रादेशिक संचालक के के मुहम्मद आणि इतिहासकार आणि लेखक अनिरुद्ध कनिसेट्टी यांना...

कमिन्स, स्टार्क, हेझलवूड आणि अमूल्य धडे: अभिषेक मुंड आणि वासुदेव प्रसाद सिंग ऑस्ट्रेलियाच्या वेगवान...

(LR) वासुदेव प्रसाद सिंग, पॅट कमिन्स आणि अभिषेक मुंड ब्रिस्बेनमधील ॲलन बॉर्डर फील्डवर (फोटो सौजन्य: क्रिकेट ऑस्ट्रेलिया) नवी दिल्ली: "सर, येकीन नहीं हो...
error: Content is protected !!