कोलकाता दि. १६ : भारत सरकार नवी दिल्ली नीति आयोग आणि झेनिथ बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांच्या सहकार्याने बांगा गौरव सन्मान व राजाराम मोहन राय राष्ट्रीय पुरस्कार २०२५ मिशन विश्वगुरू भारत कोलकत्ता राज्य यांच्यावतीने भारत देशातील निवडक राज्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या ११ व्यक्तींना प्रमुख मान्यवर मा.महमहिमा श्यामल कुमार सेन, (राज्यपाल) पश्चिम बंगाल कोलकत्ता राज्य तथा मुख्य न्यायाधीश अलाहबाद उच्च न्यायालय व मा.पद्मश्री पुरंदास बालू सम्राट,प्रख्यात बालू मेस्ट्रो,लोक संगीत दिग्गज,बाऊल म्युझिकचा राजा, कोलकाता,पश्चिम बंगाल आणि मा.पद्मश्री काझी मासूम अख्तर, सहाय्यक प्राध्यापक, सोशल वर्क आणि पीस मेसेंजर कोलकाता, पश्चिम बंगाल आणि मा.आचार्य डॉ. गोपाळ खेत्री, परोपकारी भाषक मानवी उत्थान वकील डी.बी.एम कॅल आणि एमएफजी.पश्चिम बंगालच्या प्रथम भारतीय ट्यूब शैम्पू कोलकत्याचा केमिस्ट शोधक. इत्यादी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उल्लेखनीय समाजसेवेचे कार्य करणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील बदलापूर येथील मा.डॉ.व्ही.व्ही.पोपेरे (आदिवासी सेवक महाराष्ट्र शासन) यांना राजाराम मोहन राय राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

हा पुरस्कार संपूर्ण भारत देशामध्ये विविध राज्यातील उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या ११ निवडक व्यक्तींना देण्यात आलेला आहे. ही बाब फार अभिमानास्पद आहे. नक्कीच डॉक्टर पोपेरे यांनी आपल्या सामाजिक कार्याचा ठसा इतर राज्यात देखील उमटवलेला दिसत आहे यावरून निदर्शनास येत आहे. डॉक्टर पोपेरे यांनी सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक कार्य हे देश पातळीवर नेण्याचे कार्य करत आहेत. ही फार गौरवाची व अभिमानास्पद बाब आहे. या कार्यक्रमाकरिता संपूर्ण भारत देशातून विविध मान्यवर उपस्थित होते. व कार्यक्रम मोठ्या उत्साहात पश्चिम बंगाल कोलकाता येथे संपन्न झाला




























