Homeताज्या बातम्यासुनेत्रा पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ : राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या

सुनेत्रा पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ : राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या

मुंबई दि ३१ ( प्रमोद दळवी )  : उपमुख्यमंत्री अजित पवार  यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा शनिवारी पार पडला.  सुनेत्रा पवार  यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. राजभवनात झालेल्या दिमाखदार सोहळ्यात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या आहेत. सुनेत्रा पवार यांना तीन खाती मिळाली आहेत. यामध्ये राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण,  अल्पसंख्यक विकास ही खाती मिळाली आहेत.

दरम्यान, सुनेत्रा पवारांनी पक्षाची सुत्रे हाती घ्यावीत अशी मागणी नेत्यांकडून होत होती. त्यात शनिवारी सकाळी देवगिरी निवासस्थानी येथे  सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली. याच ठिकाणी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत जनभावना लक्षात घेऊन सुनेत्रा पवार यांच्या नावाची निवड करण्यात आली. त्यानंतर हे सगळे नेते बैठकीतून बाहेर पडले. मग सुनेत्रा पवारांसह सगळेच नेते विधान भवनात पोहचले. याठिकाणी राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात अजित पवारांच्या  प्रतिमेला श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीला सुरुवात झाली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड झाली. अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते होते ते खाते सुनेत्रा पवार यांना देण्यात आलेले नाही. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. सुनेत्रा पवार  यांनी पदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पोस्ट करत त्यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी पंतप्रधान मोदी यांन अजित पवार  यांचाही उल्लेख केला.

शपथविधीनंतर ट्विट करत सुनेत्रा पवार म्हणाल्या, “आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला. आज त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत ‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्य भावनेने उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारताना मन अक्षरशः भरून येत आहे.” “दादांच्या अकाली जाण्याने मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असला, तरी त्यांनी शिकवलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रतीची बांधिलकी हाच माझा खरा आधार आहे. त्यांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी अखंड प्रामाणिकपणे काम करत राहीन, असेही सुनेत्रा यांनी म्हटले आहे. याच बरोबर, “या कठीण क्षणी महाराष्ट्रातील जनतेने दिलेली प्रेमाची साथ हेच माझे बळ आहे. आपल्या विश्वासाच्या जोरावर, दादांच्या विचारांना उजाळा देत, नव्या आशेने पुढे चालत राहीन,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आमच्या हक्काचे पैसे मृत्यूपूर्वी मिळणार का? सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा महापालिका प्रशासनाला सवाल : प्रलंबित मागण्यासाठी...

मागण्या मान्य न झाल्यास मंगळवारपासून बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा उल्हासनगर दि २० ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर महापालिका सेवेतून सन २०१६ ते...

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला आरक्षण विधेयकासाठी जनजागृती मोहीम सुरू करण्याची घोषणा केली.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला आरक्षण विधेयकासाठी जनजागृती करण्यासाठी देशव्यापी मोहीम सुरू केली (फाइल फोटो) मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी देशभरात...

फॉरेस्ट पॅच डंपिंग ग्राउंड बनवतात, पर्यावरण आणि आगीची चिंता वाढवतात

पुणे: पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील जंगलांच्या कप्प्यांमध्ये अनियंत्रित कचरा टाकणे ही गंभीर पर्यावरणीय चिंता म्हणून पुढे येत आहे, ज्यामुळे वन्यजीव धोक्यात येत...

शुभमन गिल ते हार्दिक पांड्या पर्यंत: GT आणि MI यांच्यातील आजच्या IPL 2026 च्या...

हार्दिक पांड्या आणि शुभमन गिल (इमेज क्रेडिट: BCCI/IPL) नवी दिल्ली: पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्स आयपीएल 2026 च्या कठीण मोहिमेचा सामना करत...

बटाटे वाढवण्यासाठी सर्वोत्तम वेळ: ब्रिटीश घरगुती बागांमध्ये बटाटे कधी वाढवायचे |

ब्रिटनमध्ये तुमच्या स्वत:च्या बटाट्याची लागवड केल्यास एक स्वादिष्ट बक्षीस मिळते. लागवडीच्या खिडक्या समजून घेणे ही भरपूर कापणीची गुरुकिल्ली आहे. 'अर्ली' साधारण 12 आठवड्यांत...

आमच्या हक्काचे पैसे मृत्यूपूर्वी मिळणार का? सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा महापालिका प्रशासनाला सवाल : प्रलंबित मागण्यासाठी...

मागण्या मान्य न झाल्यास मंगळवारपासून बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा उल्हासनगर दि २० ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर महापालिका सेवेतून सन २०१६ ते...

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला आरक्षण विधेयकासाठी जनजागृती मोहीम सुरू करण्याची घोषणा केली.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला आरक्षण विधेयकासाठी जनजागृती करण्यासाठी देशव्यापी मोहीम सुरू केली (फाइल फोटो) मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी देशभरात...

फॉरेस्ट पॅच डंपिंग ग्राउंड बनवतात, पर्यावरण आणि आगीची चिंता वाढवतात

पुणे: पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील जंगलांच्या कप्प्यांमध्ये अनियंत्रित कचरा टाकणे ही गंभीर पर्यावरणीय चिंता म्हणून पुढे येत आहे, ज्यामुळे वन्यजीव धोक्यात येत...

शुभमन गिल ते हार्दिक पांड्या पर्यंत: GT आणि MI यांच्यातील आजच्या IPL 2026 च्या...

हार्दिक पांड्या आणि शुभमन गिल (इमेज क्रेडिट: BCCI/IPL) नवी दिल्ली: पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्स आयपीएल 2026 च्या कठीण मोहिमेचा सामना करत...

बटाटे वाढवण्यासाठी सर्वोत्तम वेळ: ब्रिटीश घरगुती बागांमध्ये बटाटे कधी वाढवायचे |

ब्रिटनमध्ये तुमच्या स्वत:च्या बटाट्याची लागवड केल्यास एक स्वादिष्ट बक्षीस मिळते. लागवडीच्या खिडक्या समजून घेणे ही भरपूर कापणीची गुरुकिल्ली आहे. 'अर्ली' साधारण 12 आठवड्यांत...
error: Content is protected !!