Homeशहरअतिसार थांबवा अभियानांतर्गत आनंद नगर येथे जनजागृती उपक्रम

अतिसार थांबवा अभियानांतर्गत आनंद नगर येथे जनजागृती उपक्रम

ठाणे दि.१९ ( प्रमोद दळवी )  : ठाणे महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या “अतिसार थांबवा अभियान” अंतर्गत आनंद नगर आरोग्य केंद्र, कासारवडवली येथे विशेष जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात आला.

या उपक्रमास ज्ञानगंगा एज्युकेशनल ट्रस्टच्या नर्सिंग महाविद्यालयाचे पीआरओ प्रा. अनिल आठवले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. माधवी देवल, परिचारिका सौ. प्रतिभा भोये, कु. राजश्री महाले तसेच प्रसाविका, आशा व इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. अभियानाअंतर्गत बाह्यरुग्ण विभागातील रुग्ण व नागरिकांना अतिसार प्रतिबंधासाठी आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. हात स्वच्छ धुण्याची योग्य पद्धत, वैयक्तिक व परिसर स्वच्छता राखणे, सुरक्षित व ताजे अन्न सेवन करणे, उकळून अथवा शुद्ध केलेले पाणी पिणे तसेच शिळे अन्न टाळण्याबाबत माहिती देण्यात आली.

तसेच ORS (ओआरएस) द्रावण तयार करण्याची योग्य पद्धत समजावून सांगण्यात आली. ORS चे द्रावण तयार केल्यानंतर ते २४ तासांच्या आत वापरण्याचे तसेच उर्वरित द्रावण टाकून देण्याचे आवाहन करण्यात आले. लहान मुलांमध्ये अतिसाराची लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेण्याचे महत्त्वही यावेळी अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान हात धुण्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले तसेच उपस्थितांना ORS पाकिटांचे वाटप करण्यात आले. नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत या जनजागृती उपक्रमात सहभाग नोंदविला.

दिनांक १६ जून ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत सुरू असलेल्या “अतिसार थांबवा अभियान” अंतर्गत अशा विविध जनजागृती उपक्रमांद्वारे नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचे कार्य सुरू असून, या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व संबंधितांचे आभार व्यक्त करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्मार्ट मीटरच्या नावाखाली मनमानी खपवून घेतली जाणार नाही – राजेंद्रसिंह भुल्लर महाराज

उल्हासनगर दि.२० ( प्रमोद दळवी ) : स्मार्ट मीटर बसवण्याबाबत नागरिकांच्या तक्रारी आणि चिंतांच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना शहर प्रमुख राजेंद्रसिंह भुल्लर महाराज यांनी महावितरणला केलेल्या...

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ज्ञानगंगा एज्युकेशन ट्रस्टच्या पदवी महाविद्यालयात योगाभ्यास कार्यक्रम उत्साहात संपन्न

कल्याण दि. २० ( प्रमोद दळवी ) : आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने ज्ञानगंगा एज्युकेशन ट्रस्टचे कला, वाणिज्य व विज्ञान पदवी महाविद्यालय येथे योगाभ्यास कार्यक्रम...

प्रभागातील गरीब व गरजू महिलांच्या रोजगार मेळाव्यासाठी पूर्वतयारी बैठक संपन्न

उल्हासनगर दि. २० ( प्रमोद दळवी ) : शुक्रवारी  दिनांक १९/०६/२०२६ रोजी दुपारी १:३० वाजता उल्हासनगर महानगरपालिकेतील महिला व बालविकास सभापती श्रीमती मीनाताई सोंडे...

‘याने सर्वात जास्त फटका मारला आहे’: घोट्याच्या दुखापतीमुळे महिला टी-20 विश्वचषक मोहीम संपल्यानंतर श्रेयंका...

श्रेयंका पाटील (X वर @BCCIWomen चे छायाचित्र) नवी दिल्ली: भारताची अष्टपैलू खेळाडू श्रेयंका पाटील 2026 च्या आयसीसी महिला टी-20 विश्वचषकाच्या उर्वरित सामन्यांमधून हेडिंग्ले...

दूषित पाणी प्यायल्याने कल्याणमधील रहिवासी आजारी | मुंबई बातम्या

रहिवाशांना पुढील आरोग्य गुंतागुंत होण्याची भीती आहे ठाणे : कल्याण पश्चिमेतील उंबर्डे परिसरातील एका गृहनिर्माण संस्थेतील सुमारे २५ ते ३० रहिवासी संशयित दूषित...

स्मार्ट मीटरच्या नावाखाली मनमानी खपवून घेतली जाणार नाही – राजेंद्रसिंह भुल्लर महाराज

उल्हासनगर दि.२० ( प्रमोद दळवी ) : स्मार्ट मीटर बसवण्याबाबत नागरिकांच्या तक्रारी आणि चिंतांच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना शहर प्रमुख राजेंद्रसिंह भुल्लर महाराज यांनी महावितरणला केलेल्या...

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ज्ञानगंगा एज्युकेशन ट्रस्टच्या पदवी महाविद्यालयात योगाभ्यास कार्यक्रम उत्साहात संपन्न

कल्याण दि. २० ( प्रमोद दळवी ) : आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने ज्ञानगंगा एज्युकेशन ट्रस्टचे कला, वाणिज्य व विज्ञान पदवी महाविद्यालय येथे योगाभ्यास कार्यक्रम...

प्रभागातील गरीब व गरजू महिलांच्या रोजगार मेळाव्यासाठी पूर्वतयारी बैठक संपन्न

उल्हासनगर दि. २० ( प्रमोद दळवी ) : शुक्रवारी  दिनांक १९/०६/२०२६ रोजी दुपारी १:३० वाजता उल्हासनगर महानगरपालिकेतील महिला व बालविकास सभापती श्रीमती मीनाताई सोंडे...

‘याने सर्वात जास्त फटका मारला आहे’: घोट्याच्या दुखापतीमुळे महिला टी-20 विश्वचषक मोहीम संपल्यानंतर श्रेयंका...

श्रेयंका पाटील (X वर @BCCIWomen चे छायाचित्र) नवी दिल्ली: भारताची अष्टपैलू खेळाडू श्रेयंका पाटील 2026 च्या आयसीसी महिला टी-20 विश्वचषकाच्या उर्वरित सामन्यांमधून हेडिंग्ले...

दूषित पाणी प्यायल्याने कल्याणमधील रहिवासी आजारी | मुंबई बातम्या

रहिवाशांना पुढील आरोग्य गुंतागुंत होण्याची भीती आहे ठाणे : कल्याण पश्चिमेतील उंबर्डे परिसरातील एका गृहनिर्माण संस्थेतील सुमारे २५ ते ३० रहिवासी संशयित दूषित...
error: Content is protected !!