Homeशहरअंबरनाथ मधील धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृहामध्ये अजित कडकडे यांच्या भक्ती व नाट्यगीतांच्या...

अंबरनाथ मधील धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृहामध्ये अजित कडकडे यांच्या भक्ती व नाट्यगीतांच्या कार्यक्रमाने अंबरनाथकरांना मंत्रमुग्ध केले

अंबरनाथ दि. २ ( प्रमोद दळवी ) : अंबरनाथ मधील धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृहामध्ये दिनांक १ मे ‘महाराष्ट्र दिनी’ अजित कडकडे यांच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त त्यांचा सत्कार व “दत्ताची पालखी” या शीर्षकांतर्गत त्यांच्या भक्ती व नाट्य गीतांच्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्यांनी गणेश गीत,अबीर गुलाल अभंग, दत्ताची पालखी, घेई छंद मकरंद नाट्यगीत, स्वामी समर्थांचे गीत इत्यादी गाण्यांनी  अंबरनाथकर रसिकांना मंत्रमुग्ध करून टाकले.

याप्रसंगी अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी व मान्यवर यांनी  अजित कडकडे यांचा सत्कार केला. तसेच अंबरनाथ संगीत सभेचे अध्यक्ष प्रसाद मुदवेडकर यांनी सन्मानचिन्ह देऊन त्यांचे स्वागत केले. मोहन कुलकर्णी यांनी दिनांक १७ मे रोजी धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृहात होणाऱ्या बाळ कोल्हटकर जन्मशताब्दी कार्यक्रमाचे त्यांना निमंत्रण दिले. आज ७५ व्या वर्षी खड्या आवाजात गाताना प्रत्येक गाण्याचा आशय व आध्यात्मिक मार्गावर चालताना जीवनात कसा अमुलाग्र बदल होतो याचे विवेचन स्वतः कडकडेजी करत होते. या कार्यक्रमाला  अंबरनाथकरांनी प्रचंड दाद दिली.सत्काराला उत्तर देताना अजित कडकडे म्हणाले गेली ४० वर्षे रसिकांनी मला भरभरून दाद दिली माझ्यावर भरगोस प्रेम केले आणि आज या वयात सुद्धा अंबरनाथकरांनी ज्या पद्धतीने मला दाद दिली त्याचा मला खरंच आनंद झालेला आहे .

या सत्कार प्रसंगी डॉक्टर वसंत महाजन, सौ नीलिमा जोशी, दत्ता घावट, डॉ. सागर धाडस, निलेश पताडे, विकास पावसकर, रेवती जठार इंदुताई पाताडे ,शैला आचार्य , डॉ सुजाता महाजन, डॉ राहुल चौधरी, पराग सुळे आदी मंडळी उपस्थित होती.हा कार्यक्रम उत्साहात आणि असंख्य अंबरनाथकरांच्या उपस्थितीत पार पडला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कामगार मंत्र्यांनी विकासकांना कल्याणकारी योजनेंतर्गत कामगारांची नोंदणी करण्याचे आवाहन केले

पुणे: विकासकांनी बांधकाम कामगारांची इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण (BOCW) योजनेंतर्गत नोंदणी करावी, असे आवाहन महाराष्ट्राचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी केले आहे.कामगारांचे...

गुणवत्तापूर्ण व उत्कृष्ट सेवेबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांना पोलीस पदक प्रदान

उल्हासनगर दि. २ ( प्रमोद दळवी ) : सन २०२५  साठी सलग १५ वर्ष गुणवत्तापूर्ण व उत्कृष्ट सेवेबद्दल ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर मधील विठ्ठलवाडी वाहतूक...

सरकारचा सर्वात मोठा एलपीजी दर वाढल्याने रेस्टॉरंट्स किमती वाढवणार आहेत

मुंबई: केंद्र सरकारने व्यावसायिक एलपीजीच्या किमतींमध्ये सुमारे 1,000 रुपयांची एकच सर्वाधिक वाढ केल्याने शुक्रवारी मुंबईतील रेस्टॉरंट्स तसेच रस्त्याच्या कडेला असलेल्या भोजनालयांना धक्का...

पुणे न्यायालयाने दरोड्याच्या गुन्ह्यात दोन ते सात वर्षांची शिक्षा सुनावली, संघटित गुन्हेगारीच्या आरोपातून त्यांची...

पुणे : शहरातील विशेष न्यायालयाने समीर हज्जू पठाण आणि राहुल गजेंद्र कांबळे यांना प्राणघातक शस्त्राचा वापर करून दरोडा टाकल्याप्रकरणी दोषी ठरवून सात वर्षांच्या कारावासाची...

भारताचा T20 विश्वचषक संघ: काशवी गौतम आणि अमनजोत कौर निवडीसाठी का उपलब्ध नव्हते?

काशवी गौतम (Getty Images) नवी दिल्ली: 2026 च्या महिला T20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या संघाच्या घोषणेने काही आश्चर्य घडवून आणले, परंतु सर्वात मोठा...

कामगार मंत्र्यांनी विकासकांना कल्याणकारी योजनेंतर्गत कामगारांची नोंदणी करण्याचे आवाहन केले

पुणे: विकासकांनी बांधकाम कामगारांची इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण (BOCW) योजनेंतर्गत नोंदणी करावी, असे आवाहन महाराष्ट्राचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी केले आहे.कामगारांचे...

गुणवत्तापूर्ण व उत्कृष्ट सेवेबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांना पोलीस पदक प्रदान

उल्हासनगर दि. २ ( प्रमोद दळवी ) : सन २०२५  साठी सलग १५ वर्ष गुणवत्तापूर्ण व उत्कृष्ट सेवेबद्दल ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर मधील विठ्ठलवाडी वाहतूक...

सरकारचा सर्वात मोठा एलपीजी दर वाढल्याने रेस्टॉरंट्स किमती वाढवणार आहेत

मुंबई: केंद्र सरकारने व्यावसायिक एलपीजीच्या किमतींमध्ये सुमारे 1,000 रुपयांची एकच सर्वाधिक वाढ केल्याने शुक्रवारी मुंबईतील रेस्टॉरंट्स तसेच रस्त्याच्या कडेला असलेल्या भोजनालयांना धक्का...

पुणे न्यायालयाने दरोड्याच्या गुन्ह्यात दोन ते सात वर्षांची शिक्षा सुनावली, संघटित गुन्हेगारीच्या आरोपातून त्यांची...

पुणे : शहरातील विशेष न्यायालयाने समीर हज्जू पठाण आणि राहुल गजेंद्र कांबळे यांना प्राणघातक शस्त्राचा वापर करून दरोडा टाकल्याप्रकरणी दोषी ठरवून सात वर्षांच्या कारावासाची...

भारताचा T20 विश्वचषक संघ: काशवी गौतम आणि अमनजोत कौर निवडीसाठी का उपलब्ध नव्हते?

काशवी गौतम (Getty Images) नवी दिल्ली: 2026 च्या महिला T20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या संघाच्या घोषणेने काही आश्चर्य घडवून आणले, परंतु सर्वात मोठा...
error: Content is protected !!