( प्रमोद दळवी )
अंबरनाथ दि.२६ : गेल्या काही महिन्यापासून अंबरनाथ मधील शिवगंगा नगर मध्ये विद्युत समस्याने नागरिक हैराण झाले आहेत. वारंवार एम एस ई बी च्या कार्यालयात धाव घेऊनही या समस्या सुटत नसल्याने अखेर अंबरनाथ मनसेचे शहर अध्यक्ष कुणाल भोईर व सचिव अविनाश सुरसे यांनी एम एस ई बी च्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत भेट घेऊन त्यांना या समस्या तातडीने सोडवण्यास सांगितले आहे.
गेल्या काही महिन्यापासून शिवगंगा नगर मधील नागरिकांना विद्युत समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. या समस्या बाबत नागरिकांनी अंबरनाथ मनसेचे शहराध्यक्ष कुणाल भोईर व सचिव अविनाश सुरसे यांना सांगितले. कुणाल भोईर व अविनाश सुरसे यांनी त्वरित अंबरनाथ एम एस ई बी चे प्रमुख अधिकारी प्रजापति यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या बाबत त्यांनी अधिकाऱ्याला जाब विचारला. समस्या बाबत त्यांच्यासोबत चर्चा केल्यावर काही समस्या ताबडतोब सोडविण्यात आल्या. ज्या काही आणखीन समस्या आहेत तसेच. काही नागरिकांना मोठ्या प्रमाणात वीज बिल आले आहेत. याशिवाय काही जणांचे मीटर फॉलटी सुद्धा दाखवण्यात आले आहेत. वीज बिला संदर्भातील ही समस्या लवकरात लवकर सोडवण्यात येतील असे आश्वासन अधिकाऱ्याने मनसेला दिले. शिवाय या महिन्यात एम एस ई बी कडून नागरिकांवर अन्याय होऊ नये यासाठी एम एस ई बी चे उपसंचालक राजेश चलवादी यांची देखील मनसेने भेट घेतली. अंबरनाथ मध्ये विद्युत संदर्भात नागरिकांना जे काही समस्या आहेत. त्या समस्या आता लवकरच सोडविण्यात येणार असल्याचे कुणाल भोईर व अविनाश सुरसे यांनी सांगितले आहे





























