( महेंद्र माने )
मुंबई दि.२९ : मराठी सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते प्रकाश भेंडे यांचं सोमवारी २८ एप्रिल रोजी साडे ८ च्या दरम्यान अखेरचा श्वास घेतला. मराठी चित्रपट सृष्टी गाजवणाऱ्या दिवंगत अभिनेत्री उमा भेंडे यांचे ते पती होते. उमा भेंडे आणि प्रकाश भेंडे या दोघांनीही मराठी चित्रपटातून एकत्रित काम केले होते. त्यांच्या पश्चात प्रसाद आणि प्रसन्न ही दोन मुलं आहेत.

प्रकाश भेंडी यांनी वयाच्या ८३ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.त्यांच्या पार्थिवावर दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. प्रकाश भेंडे यांच्या निधनानं मराठी सिनेइडंस्ट्रीवर शोककळा पसरली असून अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.चित्रपट आणि कलाक्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी दिवंगत अभिनेत्री उमा भेंडे आणि , प्रकाश भेंडे या दाम्पत्याला ओळखलं जायचं. यासाठी त्यांना एकता कल्चरल अकादमीतर्फे एकता कलागौरव पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं होतं.

टेक्स्टाईल डिझायनर ते अभिनेता
प्रकाश भेंडे यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा इथल्या एका गावात झाला. त्यांचे वडील डॉक्टर होते. जन्म मुरुड-जंजिरा इथल्या गावात झालं होतं, पण प्रकाश भेंडे यांचं बालपण मात्र गिरगावात गेलं. वडिलांच्या निधनानंतर कमी वयातच कुटुंबाची जबाबादारी प्रकाश यांच्यावर पडली. यासाठी त्यांनी काही वर्षे टेक्स्टाईल डिझायनर म्हणूनही काम केलं होतं. त्यामुळं सिनेइंडस्ट्रीत तसे ते उशीरानेच आले. त्यांनी भालू या सिनेमाची निर्मिती केली. याच सिनेमात त्यांनी आणि उमा यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. यानंतर अभिनेता म्हणून त्यांनी बरेच सिनेमे केले. ते फक्त अभिनेताच होते, असं नाही तर लेखक, निर्माता, दिग्दर्शकही होते. इतकंच नाही तर चे चित्रकार देखील होते.

मी एकटा उरलो!
मराठी चित्रपटसृष्टीतील ‘लव्ह बर्डस्’ म्हणून उमा आणि प्रकाश यांना ओळखलं जायचं. तिच्या जाण्यानं माझं जगच संपलं आहे. आम्ही ४३ वर्षे एकत्र होतो. आता मी एकाकी झालो. तिनं माझ्या हातातच प्राण सोडला,’ असं प्रकाश भेंडे यांनी उमा यांच्या निधनानंतर म्हटलं होतं.





























