Homeताज्या बातम्यापहलगाम हल्ला : पाकिस्तान विरोधात मुंब्र्यातील हजारो लोक रस्त्यावर

पहलगाम हल्ला : पाकिस्तान विरोधात मुंब्र्यातील हजारो लोक रस्त्यावर

 

  • पाकिस्तान मुर्दाबादचे नारे
  • महिलांचा मोठा सहभाग

ठाणे दि २५ :  पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली तसेच सय्यद अली (भाईसाहब ) यांच्या उपस्थितीत शुक्रवारी मुंब्रा परिसरात विविध ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आले. काळे झेंडे दाखवित  पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत हजारो मुंब्रावासियांनी रस्त्यावर उतरून दहशतवादी कृत्याचा निषेध केला.

काश्मीरच्या पहलगाम भागात दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे कळवा – मुंब्रा विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष शमीम खान आणि शानु पठाण यांच्या आवाहनानुसार हजारो मुंब्रावासियांनी रस्त्यावर उतरून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. जुम्माचा नमाज अदा केल्यानंतर हजारो लोक सुरूवातीला कौसा जामा मशिदीबाहेर जमा झाले. तिथे निदर्शने केल्यानंतर  रिझवी बाग मस्जिद,   राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष कार्यालय,  तनवीर नगर येथे आंदोलन केले. या प्रसंगी शमीम खान यांनी रास्ता रोकोदेखील केला. तसेच, रशीद कंपाउंड येथेही नागरिकांनी पाकिस्तानचा निषेध केला. यावेळी आंदोलकांनी, पाकिस्तान मुर्दाबाद,  आतंकवाद को जड से मिटाओ, हमारी जान हिंदुस्थान अशा घोषणा दिल्या.

या प्रसंगी डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी,  पहलगाम येथील हत्याकांडास जेवढे दहशतवादी जबाबदार आहेत. तेवढेच जबाबदार केंद्र सरकारही आहे. अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असलेल्या परिसरातील सुरक्षा व्यवस्था डळमळीत का होती? येथील लष्कराचे जवान कुठे होते?, असा सवाल डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी केला. पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या अंत्ययात्रा पाहून देशातील प्रत्येक घरात अश्रू दाटले. त्यामुळेच मुंब्रा – कौसातील बांधवांनी नमाज अदा केल्यानंतर प्रत्येक नाक्यावर पाकिस्तानचा निषेध करणारे आंदोलन केले. हे आंदोलन माणुसकीचे प्रतिक आहे. असे डॉ.जितेंद्र आव्हाड म्हणाले. शमीम खान यांनी, हे कृत्य करणाऱ्या दहशतवाद्यांना भारतीय नागरिक कधीच माफ करणार नाहीत. ज्या दहशतवाद्यांनी आमच्या भावांना गोळ्या घातल्या आहेत. त्यांनाही रस्त्यावर गोळ्या घालून मारावे, अशी मागणी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नवी मुंबई महानगरपालिकेने 500 इमारतींना असुरक्षित ठरवले, रिकामी नोटीस बजावल्या

नवी मुंबई: आपल्या हद्दीतील सध्याच्या इमारतींचे विभागनिहाय सर्वेक्षण केल्यानंतर, नवी मुंबई महानगरपालिकेने (NMMC) महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 264 मध्ये निर्दिष्ट केलेल्या श्रेणीनुसार...

ऑनलाइन टास्क फ्रॉडमध्ये महिलेने 24L गमावले

पुणे: ऑनलाइन टास्क पूर्ण करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान ऑनलाइन टास्क फसवणूक करून वाकड येथील एका महिलेची...

IPL 2026: ‘माझे सर्वोत्तम अजून येणे बाकी आहे’- RR विरुद्ध 74 सामना जिंकल्यानंतर इशान...

सनरायझर्स हैदराबादचा इशान किशन (ANI) सनरायझर्स हैदराबादचा यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशनने राजस्थान रॉयल्सवर पाच विकेट्सने मिळवलेल्या रोमहर्षक विजयात एक संयोजित तरीही आक्रमक हात खेळला,...

ताजेपणाचा गैरसमज: तुमच्या स्वयंपाकघरातील मेणबत्त्या खरी समस्या का भूत करत आहेत |

स्वयंपाकाचा दुर्गंधी रेंगाळणे ही एक सामान्य समस्या आहे, परंतु एअर फ्रेशनर केवळ मुखवटा वास घेतात, सुरक्षिततेची खोटी भावना निर्माण करतात आणि संभाव्य धोके...

शल्यचिकित्सकांपासून ते डिझाइनरपर्यंत, माजी विद्यार्थी अनेक दशकांनंतर कलेकडे परत येतात

पुणे: शेठ दगडुराम कटारिया इंग्लिश मीडियम हायस्कूलचे 1986 ते 2007 च्या बॅचमधील पन्नास विद्यार्थी त्यांच्या प्रिय कला शिक्षिका शैलजा पाठक यांच्यामुळे वर्षानुवर्षे संपर्कात राहिले...

नवी मुंबई महानगरपालिकेने 500 इमारतींना असुरक्षित ठरवले, रिकामी नोटीस बजावल्या

नवी मुंबई: आपल्या हद्दीतील सध्याच्या इमारतींचे विभागनिहाय सर्वेक्षण केल्यानंतर, नवी मुंबई महानगरपालिकेने (NMMC) महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 264 मध्ये निर्दिष्ट केलेल्या श्रेणीनुसार...

ऑनलाइन टास्क फ्रॉडमध्ये महिलेने 24L गमावले

पुणे: ऑनलाइन टास्क पूर्ण करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान ऑनलाइन टास्क फसवणूक करून वाकड येथील एका महिलेची...

IPL 2026: ‘माझे सर्वोत्तम अजून येणे बाकी आहे’- RR विरुद्ध 74 सामना जिंकल्यानंतर इशान...

सनरायझर्स हैदराबादचा इशान किशन (ANI) सनरायझर्स हैदराबादचा यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशनने राजस्थान रॉयल्सवर पाच विकेट्सने मिळवलेल्या रोमहर्षक विजयात एक संयोजित तरीही आक्रमक हात खेळला,...

ताजेपणाचा गैरसमज: तुमच्या स्वयंपाकघरातील मेणबत्त्या खरी समस्या का भूत करत आहेत |

स्वयंपाकाचा दुर्गंधी रेंगाळणे ही एक सामान्य समस्या आहे, परंतु एअर फ्रेशनर केवळ मुखवटा वास घेतात, सुरक्षिततेची खोटी भावना निर्माण करतात आणि संभाव्य धोके...

शल्यचिकित्सकांपासून ते डिझाइनरपर्यंत, माजी विद्यार्थी अनेक दशकांनंतर कलेकडे परत येतात

पुणे: शेठ दगडुराम कटारिया इंग्लिश मीडियम हायस्कूलचे 1986 ते 2007 च्या बॅचमधील पन्नास विद्यार्थी त्यांच्या प्रिय कला शिक्षिका शैलजा पाठक यांच्यामुळे वर्षानुवर्षे संपर्कात राहिले...
error: Content is protected !!