- माजी उपनगराध्यक्ष व स्थानिक मा. नगरसेवक अब्दुलभाई शेख यांच्या शुभहस्ते भूमिपूजन
अंबरनाथ दि २१ ( प्रमोद दळवी ): गेल्या अनेक महिन्यापासून आपल्या परिसरात नवीन शौचालय उपलब्ध करून द्यावे अशी सातत्याने मागणी अंबरनाथ पश्चिमेकडील शास्त्रीनगर, स्वामीनगर परिसरातील रहिवासी करीत होते. या प्रमुख मागणीच्या अनुषंगाने स्थानिक मा. नगरसेवक व मा. उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांनी पालिका प्रशासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करीत शास्त्रीनगर,स्वामीनगर परिसरातील टॅक्सपेयर असणाऱ्या गोरगरीब कुटुंबातील नागरिकांकरिता शौचालय बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. त्या नवीन शौचालयाच्या कामाचे भूमिपूजनाचा कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता. त्या परिसरातील स्थानिक मा. उपनगराध्यक्ष व स्थानिक मा. नगरसेवक अब्दुलभाई शेख यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवीत त्या नवीन शौचालय बांधण्याच्या कामाच भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.

त्यावेळी उपस्थित असणाऱ्या परिसरातील महिला वर्गांसह परिसरातील स्थानिक नागरिक यांच्या हस्ते विविध पूजा करून श्रीफळ वाढवत या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. सदर प्रसंगी शिवसेना शाखाप्रमुख व्यंकटेश तसेच जीवा, मैदर ,आझाद, मुबारक, अजय, आयप्पन, रणजीत, मनी, संजू, अजित, रमेश, देवा, रामचंद्र, चुनरसू ,शिवा, कार्तिक मोहन, मुरगण तसेच शिवसेना पदाधिकारी , स्थानिक नागरिक व परिसरातील अनेक माता भगिनी या कार्यक्रमाला उपस्थित होते. प्रभागाचे मा. नगरसेवक ,मा. उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांनी पालिका प्रशासनाकडून सातत्यपूर्ण पाठपुराच्या अनुषंगाने नवीन शौचालय उपलब्ध करून घेतल्या बाबत व परिसरातील अतिशय महत्त्वाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी त्यावेळी अब्दुलभाई शेख यांचे विशेष आभार प्रकट केले.

अब्दुलभाई शेख यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले शिवसेनेचे ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या मूलभूत तत्वाच्या अनुषंगाने अंबरनाथ नगरपरिषदचे टेक्सपेयर असणाऱ्या गोरगरीब बांधवांसाठी तसेच अतिशय महत्त्वपूर्ण शौचालय ही नागरिक मूलभूत सुविधा उपलब्ध होईल या करिता नगरपालिका प्रशासन यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्याचे त्यांनी विशेष नमूद केले. तसेच राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे सर्वोच्च नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या प्रमुख अधिपत्याखाली असे व इतर अनेक लोकोपयोगी उपक्रम सातत्यपूर्ण स्वरूपात राबवण्याचा मानस देखील या वेळेस अब्दुलभाई शेख यांनी व्यक्त केला.





























