Homeताज्या बातम्यानागरिकांच्या मदतीसाठी प्रशासनाने सतर्क-सज्ज रहावे, नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा : मुख्यमंत्री देवेंद्र...

नागरिकांच्या मदतीसाठी प्रशासनाने सतर्क-सज्ज रहावे, नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा

 मुंबई  दि. २६ : – पावसाने निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्यपूर्णरित्या आढावा घेत आहेत. या परिस्थितीत नागरिकांना मदत करण्यासाठी संपूर्ण प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. ज्या ठिकाणी नुकसान झाले तेथे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. राज्याच्या मुख्य सचिव आणि राज्याच्या आपत्ती निवारण कक्षाशी ते सातत्याने संपर्कात आहेत.

दरम्यान, राज्यातील या परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांना विविध यंत्रणांकडून अवगत करण्यात आले.  राज्यात पुणे, सातारा, सोलापूर, रायगड, मुंबई आणि एमएमआर या भागात अतिवृष्टी झालेली आहे. दौंडमध्ये ११७  मि.मी., बारामतीत १०४.७५  मि.मी., इंदापुरात ६३.२५  मि.मी. इतका पाऊस झाला आहे.  बारामतीत २५  घरांशी अंशत: पडझड झाली असून, पुरात अडकलेल्या ७  जणांना वाचविण्यात आले आहे. ७०  ते ८०  कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. मोबाईल सेवा काल विस्कळित झाल्या होत्या. त्या आता पूर्ववत होत आहेत. इंदापूर येथे 2 जणांना पूरस्थितीतून बाहेर काढण्यात आले आहे.  फलटणमध्ये १६३.५  मि.मी. इतका पाऊस झाला. एनडीआरएफची एक चमू फलटणमध्ये आहे. ३०  नागरिक दुधेबावी गावाशेजारी अडकले होते. त्यांना निवास आणि भोजनाची सुविधा पुरविण्यात आली आहे.

सोलापूरमध्ये ६७.७५  मि.मी. पाऊस झाला. माळशिरस तालुक्यात ६  नागरिक पुरात अडकले होते, त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. पंढरपूर येथे भीमा नदी पात्रात ३ जण अडकले, त्यांचे बचावकार्य सुरु आहे. रायगडमध्ये एकाचा वीज पडून मृत्यू झाला, तर महाड ते रायगड किल्ला रस्ता अतिवृष्टीमुळे बंद करण्यात आला आहे.

मुंबईत २४  तासात १३५.४  मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत एकूण ६  ठिकाणी पाणी साचण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. एकूण १८  ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्याच्या तर ५  ठिकाणी इमारतीच्या भींती पडण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मुंबई महापालिका, अग्निशमन दल, मुंबई पोलिस आणि इतरही सर्व यंत्रणा सज्ज आहेत. कुठेही प्राणहानी झालेली नाही. मुंबईत ५  ठिकाणी एनडीआरएफ टीम कुठल्याही प्रकारच्या मदतीसाठी सज्ज आहेत.

दरम्यान, मुंबईत पुढील २४  तास विजांचा गडगडाट आणि वादळी वार्‍यासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी राज्याच्या मुख्य सचिव तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध यंत्रणांना सतर्क आणि सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. एनडीआरएफ – एसडीआरएफ, अग्निशमन, महसूल प्रशासन तसेच गृह विभाग आदींना नियंत्रण कक्षांच्या माध्यमातून तातडीच्या उपाययोजना आणि मदत व बचावासाठीची सज्जता ठेवण्याच्या अनुषंगानेही त्यांनी विविध सूचना केल्या. जलसंपदा विभागाशी सातत्यपूर्ण समन्वय ठेवण्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘राजीनामा देण्यासाठी दबाव टाकण्यात आला’: महिलेने धर्मांतर, कामाच्या ठिकाणी भेदभाव केल्याचा आरोप केल्यानंतर पुण्याच्या...

एका तंत्रज्ञान कंपनीच्या एका माजी कर्मचाऱ्याने धार्मिक छळ, कामाच्या ठिकाणी भेदभाव आणि राजीनामा देण्याचे आरोप केले आहेत, त्यानंतर पुण्यातील हिंजवडी पोलिसांकडे तक्रार दाखल...

‘एक मिनिट थांबा, आम्ही कुठे गोलंदाजी करू?’: सनरायझर्स हैदराबादचा स्टार वैभव सूर्यवंशी दुःस्वप्न आठवतो

वैभव सूर्यवंशी (बीसीसीआय/आयपीएल फोटो) नवी दिल्ली: वैभव सूर्यवंशीच्या विक्रमी IPL 2026 मोहिमेतील सर्वात मोठी खेळी क्रमवारीत ठेवायची असेल, तर एलिमिनेटरमध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्धचा त्याचा...

महाराष्ट्र सरकार आणि प्रसार भारती SPV मुंबईत एकात्मिक फिल्म आणि टेलिव्हिजन मीडिया हब विकसित...

यासाठी राज्य सरकार आणि प्रसार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उद्देश वाहन स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मंजुरी दिली. मुंबई...

पिंपरी चिंचवड पोलिसांनी केली 52 हजार लिटर अवैध दारू जप्त, नष्ट

भारतीय पोलिसांनी अंमलबजावणी कारवाई दरम्यान जप्त केलेल्या अवैध दारूच्या बाटल्या नष्ट केल्या पुणे : पिंपरी चिंचवड पोलिसांनी २८ मे ते २ जून दरम्यान...

आजची जपानी म्हण: “ज्या नखेला चिकटते ते मिळते…” |

दिवसाची जपानी म्हण (AI-व्युत्पन्न प्रतिमा) जपानी म्हणी, ज्यांना कोटोवाझा असेही म्हणतात, जपानच्या सांस्कृतिक वारशाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. पिढ्यान्पिढ्या पार पडलेल्या, या म्हणींमध्ये...

‘राजीनामा देण्यासाठी दबाव टाकण्यात आला’: महिलेने धर्मांतर, कामाच्या ठिकाणी भेदभाव केल्याचा आरोप केल्यानंतर पुण्याच्या...

एका तंत्रज्ञान कंपनीच्या एका माजी कर्मचाऱ्याने धार्मिक छळ, कामाच्या ठिकाणी भेदभाव आणि राजीनामा देण्याचे आरोप केले आहेत, त्यानंतर पुण्यातील हिंजवडी पोलिसांकडे तक्रार दाखल...

‘एक मिनिट थांबा, आम्ही कुठे गोलंदाजी करू?’: सनरायझर्स हैदराबादचा स्टार वैभव सूर्यवंशी दुःस्वप्न आठवतो

वैभव सूर्यवंशी (बीसीसीआय/आयपीएल फोटो) नवी दिल्ली: वैभव सूर्यवंशीच्या विक्रमी IPL 2026 मोहिमेतील सर्वात मोठी खेळी क्रमवारीत ठेवायची असेल, तर एलिमिनेटरमध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्धचा त्याचा...

महाराष्ट्र सरकार आणि प्रसार भारती SPV मुंबईत एकात्मिक फिल्म आणि टेलिव्हिजन मीडिया हब विकसित...

यासाठी राज्य सरकार आणि प्रसार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उद्देश वाहन स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मंजुरी दिली. मुंबई...

पिंपरी चिंचवड पोलिसांनी केली 52 हजार लिटर अवैध दारू जप्त, नष्ट

भारतीय पोलिसांनी अंमलबजावणी कारवाई दरम्यान जप्त केलेल्या अवैध दारूच्या बाटल्या नष्ट केल्या पुणे : पिंपरी चिंचवड पोलिसांनी २८ मे ते २ जून दरम्यान...

आजची जपानी म्हण: “ज्या नखेला चिकटते ते मिळते…” |

दिवसाची जपानी म्हण (AI-व्युत्पन्न प्रतिमा) जपानी म्हणी, ज्यांना कोटोवाझा असेही म्हणतात, जपानच्या सांस्कृतिक वारशाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. पिढ्यान्पिढ्या पार पडलेल्या, या म्हणींमध्ये...
error: Content is protected !!