Homeताज्या बातम्याअद्ययावत राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामुळे कुठल्याही आपत्तीला व्यवस्थित तोंड देणार – उपमुख्यमंत्री...

अद्ययावत राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामुळे कुठल्याही आपत्तीला व्यवस्थित तोंड देणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

• मंत्रालयातील अद्ययावत राज्य आपत्कालीन कार्य केंद्रास भेट

मुंबई दि. २६ : आपत्तीमध्ये काम करण्याला आमचे प्राधान्य आहे. अद्ययावत राज्य आपत्कालीन कार्य केंद्राद्वारे कोणत्याही प्रकारच्या आपत्ती परिस्थितीला सामोरे जाण्यास सज्ज असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. राज्यातील सध्याच्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील अद्ययावत अशा राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला भेट देऊन त्यांनी आढावा घेतला व माध्यमांशी संवाद साधला.
आपत्कालीन कार्य केंद्र तंत्रज्ञानाने सुसज्ज असे झाल्याने कोणत्याही आपत्तीत शासनाला योग्य व्यवस्थापन करणे सहज शक्य होईल असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी केंद्रातील प्रशिक्षित कर्मचाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून ते कशा पद्धतीने काम करतात आणि तंत्रज्ञान वापरता याची माहितीही घेतली आणि समाधान व्यक्त केले. यावेळी मदत व पुनर्वसन अपर मुख्य सचिव सोनिया सेठी तसेच आपत्ती व्यवस्थापन प्रभाग संचालक सतीशकुमार खडके यांनी त्यांना कालपासून राज्यभरात सुरु असलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत तसेच करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.


९.५ कोटी नागरिकांना अलर्ट
तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा या आपत्ती व्यवस्थापन केंद्रातून पावसाचे तसेच संभाव्य विजा पडण्याचे अलर्ट ९.५ कोटी नागरिकांना पाठविण्यात आल्याची माहिती सोनिया सेठी यांनी यावेळी उपमुख्यमंत्र्यांना दिली. तर ठाणे, रायगड, मुंबई , पुण्यातील घाट विभागात रेड अलर्ट जाहीर करण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले.एनडीआरएफ पथके तसेच इतर बचाव यंत्रणा त्याचप्रमाणे सर्व जिल्हा प्रशासन व पालिकांशी आपत्ती व्यवस्थापन केंद्रांमार्फत सातत्याने संपर्क ठेवला जातो आणि वेळोवेळीचे अलर्ट त्यांना दिले जातात त्यामुळे कुठेही बचाव कार्य किंवा मदत पोहचवायची असेल तर लगेच ते करता येते असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.


यावेळी उपमुख्यमंत्री यांनी केंद्रातील तज्ञ, तसेच तांत्रिक कर्मचाऱ्यांकडून प्रत्यक्ष व्यवस्था कशी काम करते ते जाणून घेतले आणि समाधान व्यक्त केले. हे कर्मचारी २४ तास काम करतात, त्यांची राहण्याच्या व्यवस्था आणि इतर अडचणी तत्काळ दूर करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधितांना दिले.ठाण्याच्या धर्तीवर आपत्ती प्रतिसाद दले सर्व महानगरपालिकांमध्ये तत्काळ नियुक्त करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी प्रधान सचिव नगरविकास डॉ गोविंदराज यांना दिले. कोकण आपत्ती सौम्यीकरणाची किती कामे पूर्ण झाली आहेत त्याचा आढावाही त्यांनी घेतला.यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना त्याचप्रमाणे आपत्ती कार्य केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘राजीनामा देण्यासाठी दबाव टाकण्यात आला’: महिलेने धर्मांतर, कामाच्या ठिकाणी भेदभाव केल्याचा आरोप केल्यानंतर पुण्याच्या...

एका तंत्रज्ञान कंपनीच्या एका माजी कर्मचाऱ्याने धार्मिक छळ, कामाच्या ठिकाणी भेदभाव आणि राजीनामा देण्याचे आरोप केले आहेत, त्यानंतर पुण्यातील हिंजवडी पोलिसांकडे तक्रार दाखल...

‘एक मिनिट थांबा, आम्ही कुठे गोलंदाजी करू?’: सनरायझर्स हैदराबादचा स्टार वैभव सूर्यवंशी दुःस्वप्न आठवतो

वैभव सूर्यवंशी (बीसीसीआय/आयपीएल फोटो) नवी दिल्ली: वैभव सूर्यवंशीच्या विक्रमी IPL 2026 मोहिमेतील सर्वात मोठी खेळी क्रमवारीत ठेवायची असेल, तर एलिमिनेटरमध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्धचा त्याचा...

महाराष्ट्र सरकार आणि प्रसार भारती SPV मुंबईत एकात्मिक फिल्म आणि टेलिव्हिजन मीडिया हब विकसित...

यासाठी राज्य सरकार आणि प्रसार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उद्देश वाहन स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मंजुरी दिली. मुंबई...

पिंपरी चिंचवड पोलिसांनी केली 52 हजार लिटर अवैध दारू जप्त, नष्ट

भारतीय पोलिसांनी अंमलबजावणी कारवाई दरम्यान जप्त केलेल्या अवैध दारूच्या बाटल्या नष्ट केल्या पुणे : पिंपरी चिंचवड पोलिसांनी २८ मे ते २ जून दरम्यान...

आजची जपानी म्हण: “ज्या नखेला चिकटते ते मिळते…” |

दिवसाची जपानी म्हण (AI-व्युत्पन्न प्रतिमा) जपानी म्हणी, ज्यांना कोटोवाझा असेही म्हणतात, जपानच्या सांस्कृतिक वारशाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. पिढ्यान्पिढ्या पार पडलेल्या, या म्हणींमध्ये...

‘राजीनामा देण्यासाठी दबाव टाकण्यात आला’: महिलेने धर्मांतर, कामाच्या ठिकाणी भेदभाव केल्याचा आरोप केल्यानंतर पुण्याच्या...

एका तंत्रज्ञान कंपनीच्या एका माजी कर्मचाऱ्याने धार्मिक छळ, कामाच्या ठिकाणी भेदभाव आणि राजीनामा देण्याचे आरोप केले आहेत, त्यानंतर पुण्यातील हिंजवडी पोलिसांकडे तक्रार दाखल...

‘एक मिनिट थांबा, आम्ही कुठे गोलंदाजी करू?’: सनरायझर्स हैदराबादचा स्टार वैभव सूर्यवंशी दुःस्वप्न आठवतो

वैभव सूर्यवंशी (बीसीसीआय/आयपीएल फोटो) नवी दिल्ली: वैभव सूर्यवंशीच्या विक्रमी IPL 2026 मोहिमेतील सर्वात मोठी खेळी क्रमवारीत ठेवायची असेल, तर एलिमिनेटरमध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्धचा त्याचा...

महाराष्ट्र सरकार आणि प्रसार भारती SPV मुंबईत एकात्मिक फिल्म आणि टेलिव्हिजन मीडिया हब विकसित...

यासाठी राज्य सरकार आणि प्रसार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उद्देश वाहन स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मंजुरी दिली. मुंबई...

पिंपरी चिंचवड पोलिसांनी केली 52 हजार लिटर अवैध दारू जप्त, नष्ट

भारतीय पोलिसांनी अंमलबजावणी कारवाई दरम्यान जप्त केलेल्या अवैध दारूच्या बाटल्या नष्ट केल्या पुणे : पिंपरी चिंचवड पोलिसांनी २८ मे ते २ जून दरम्यान...

आजची जपानी म्हण: “ज्या नखेला चिकटते ते मिळते…” |

दिवसाची जपानी म्हण (AI-व्युत्पन्न प्रतिमा) जपानी म्हणी, ज्यांना कोटोवाझा असेही म्हणतात, जपानच्या सांस्कृतिक वारशाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. पिढ्यान्पिढ्या पार पडलेल्या, या म्हणींमध्ये...
error: Content is protected !!