उल्हासनगर दि. २७ ( प्रमोद दळवी ): सध्या अति उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. पडत असलेल्या कडक उन्हामुळे रस्त्यावर देखील सुखसुकाट पायाला मिळत आहे. या अति उष्णता मुळे उल्हासनगरातील कॅम्प नंबर -४ परिसरातील दहाचाळ नालंदा शाळेजवळ उल्हासनगर महानगरपालिकेने बसलेल्या बोअरवेल जवळील पाण्याने भरलेल्या भल्या मोठ्या सिंटेक्स टाकीचा उष्णतेमुळे स्फोट होऊन दोन तुकडे झाल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी सकाळी घडला. यावरून उष्णतेचा पारा अधिकच वाढला असल्याचे बोलले जात आहे.

उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर – ४ येतील सुभाष टेकडी जवळील दहाचाळ नालंदा शाळेजवळ उल्हासनगर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत नागरिकांच्या पाण्याच्या सोयीसाठी त्या ठिकाणी बोअरवेल बसवण्यात आली आहे. त्या ठिकाणी लोखंडी स्टैंड वर भली मोठी सिंटेक्स टाकी देखील ठेवण्यात आली होती. बोअरवेलचा पाणी त्या टाकीत जात असल्यामुळे नागरिक त्या टाकीद्वारेच इतर कामासाठी ते पाणी वापरतात. सध्या पडत असलेल्या अति उष्णतेमुळे पाण्याने भरलेली ती टाकी खूपच गरम होत होती. सोमवारी सकाळी पाण्याने भरलेल्या त्या टाकीचा स्फोट होऊन दोन तुकडे झाले. टाकी तुटून खाली पडल्याने त्या आवाजाने परिसरातील नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. ॲड प्रशांत चंदनशिव यांनी या घटनेबाबत पाणीपुरवठा अभियंता हरीश मिरकुटे यांना फोन करून या घटनेची माहिती दिली. टाकीचा ब्लास्ट होऊन टाकीचे दोन तुकडे झाल्यामुळे परिसरातील नागरिकांना पाण्याच्या भीषण टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्या ठिकाणी त्वरित नवीन टाकी बसवण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी व ॲड प्रशांत चंदनशिव यांनी केली आहे. अभियंता हरेश मिरकुटे यांनी दोन-चार दिवसातच नवीन टाकी त्या ठिकाणी बसून बसवण्यात येईल असे आश्वासन दिले असल्याचे चंदनशिव यांनी सांगितले. दुसरीकडे अति उष्णतेमुळे झालेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये थोडी भीती देखील निर्माण झाली आहे. सध्या अति उष्णतेमुळे नागरिकांनी दुपारच्या सुमारास घराबाहेर पडू नका असे आव्हान देखील करण्यात येत आहेत. तेव्हा आता या अति उष्णतामुळे रस्त्यावरील पाण्याच्या सिंटेक्सच्या टाक्याला देखील धोका निर्माण झाला आहे.





























