मुरबाड दि २५ : तालुक्यातील दुर्गम भागातील शिरोशी ते शेलगाव परिसरातील नागरिकांना मुरबाड,शिरोशी, सरळगाव,डोळखांब इत्यादी ठिकाणी विविध कामांसाठी जाण्यासाठी असलेला रस्ता खचुन गेल्याने संपूर्ण पावसाळ्यात चार महिने पायपीट करावी लागणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांन कडुन संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
धोकादायक बाब म्हणजे पुढील पावसात रस्त्याचा उर्वरित शिल्लक भाग पुर्णपणे खचुन जाणार असल्याने मुरबाड ते आळवे कार्यरत असलेली बस सेवा बंद होईल परीणामी वनोटे,मांदोशी,खेड,खेडवाडी इत्यादी गावातील शालेय विद्यार्थ्यांना, बाजारात खरेदीसाठी जाणाऱ्या नागरिकांना तसेच रुग्णांना मुरबाड,टोकावडे येथील रुग्णालयात उपचारासाठी जाण्यासाठी त्रासदायक होणार असुन संबंधित गावांचा मुरबाड तालुक्याशी संपर्कच तुटणार जाणार आहे , या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केले असुन फक्त ठेकेदाराच्या हाताला काम मिळावे हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवल्याने पहिल्याच पावसात रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मात्र यांचा मोठ्या प्रमाणात मनस्ताप जनतेला होणार असल्याची संतप्त प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते अरुण राऊत यांनी व्यक्त केली आहे .





























