Homeशहरउल्हासनगरात पूर्व वैमनस्यातून तरुणाची धारदार चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या :...

उल्हासनगरात पूर्व वैमनस्यातून तरुणाची धारदार चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या : मारेकरी अटकेत

उल्हासनगर दि. ७ ( प्रमोद दळवी ) : मागील भांडणाचे व एकमेकांच्या विरोधात केलेल्या केसच्या वादातून मनात राग धरून तरुणाला भर रस्त्यात अडवून त्याच्यावर धारदार चाकूने सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी हिललाईन पोलिसांनी तातडीने त्या मारेकर्‍याचा  शोध घेऊन त्याला अटक केली आहे

पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार उल्हासनगरातील कॅम्प नंबर -४  परिसरातील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री अकराच्या सुमारास कुर्ला कॅम्प रोड, कालीमाता मंदिरच्या मागे भर रस्त्यात व सुरू असलेल्या पावसात एका तरुणाने दुसऱ्या तरुणांवर धारदार चाकूने सपासप वार करून त्याला गंभीर जखमी करून त्या ठिकाणाहून पलायन केले. या घटनेची माहिती विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांना मिळताच त्यांनी पोलीस पथकासह घटना घडलेल्या ठिकाणी धाव घेतली. त्यावेळी त्या ठिकाणी रक्ताच्या ठरवण्यात एक तरुण जखमी अवस्थेत पडलेला होता. त्याच्या जवळच एक धारदार चाकू रक्ताने माखलेल्या अवस्थेत पडलेला होता. पोलिसांनी सर्वप्रथम त्या जखमी तरुणाला जवळच असलेल्या बालाजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण त्याची प्रकृती खूपच गंभीर असल्याने त्याला उल्हासनगरातील सेंट्रल हॉस्पिटलमध्ये घेण्यात आले. पण डॉक्टरांनी उपचार सुरू करण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्या मयत झालेल्या तरुणाचे नाव सतनामसिंग लबाना असल्याचे व तो उल्हासनगरातील कॅम्प नंबर – ५  परिसरातील सेक्शन ३९  वीर तानाजी नगर या परिसरातला राहणारा असल्याचे समजले.

सतनामसिंग याला जीव ठार मारून पळून गेलेल्या मारेकराचे नाव गुरप्रीतसिंग उर्फ अनिस करतारसिंग लबाना (१९ ) असून तो देखील वीर तानाजी नगर परिसरातली राहणार असल्याचे पोलिसांना समजले. त्याच दरम्यान हिल्लाईन पोलिसांनी अनिस लबाना याचा शोध घेऊन त्याला त्वरित ताब्यात घेऊन विठ्ठलवाडी पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी घटनास्थळावरून रक्ताने माखलेला धारदार चाकू व इतर वस्तू पंचनामा करून ताब्यात घेतल्या. याशिवाय या थरारक हत्याचा व्हिडिओ काही नागरिकांनी मोबाईल मध्ये चित्रीत केला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे घटना घडलेल्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सतनामसिंग लबाना याची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याने त्याचा भाऊ कुलदीप सिंग लभाना यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुरुप्रीतसिंग उर्फ अनिस लबाना याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

या घटने संदर्भात विठ्ठलवाडी पोलिसांनी केलेल्या चौकशीत अधिक माहिती मिळाली मयत सतनामसिंग व यातील आरोपी अनिस यांचे एकमेकांच्या कुटुंबीयांच्या विरोधात पूर्वीपासून वाद आहेत. आणि त्याच्या नातेवाईकांनी मयत सतनामसिंग याच्या विरोधात हिललाईन पोलीस ठाण्यात जबरी चोरीची फिर्याद दाखल केली होती. त्यात त्याला अटक करण्यात आली होती. सध्या तो त्या केसमधून जामिनावर बाहेर आलेला होता. तेव्हापासून आरोपी व मयत यांच्या कुटुंबांमध्ये वाद सुरू होता. अनिस लबाना याने मयत सतनामसिंग याच्यासोबत असलेल्या मागील भांडणाचे व एकमेकांचे विरोधात केलेल्या केसच्या वादाचे कारणावरून मनात राग धरून सतनामसिंग लबाना याच्यावर धारदार चाकूने त्याच्या मानेवर छातीवर पोटावर व शरीरावर सापासाप वार करून त्याला जीवे ठार मारले आहे अशी माहिती तपासात पोलिसांना मिळाली आहे. अधिक तपास विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘सुरक्षा नेहमीच चिंतेची बाब’: बांगलादेश भारताच्या संभाव्य T20I दौऱ्यासाठी सुरक्षा उपाय वाढवण्यास तयार आहे

बीसीबी भारताच्या बांगलादेश दौऱ्यासाठी 'सुरक्षा वाढवण्यास' तयार आहे (प्रतिमा: क्रिकइन्फो) बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) सप्टेंबरमध्ये भारताच्या नियोजित व्हाईट-बॉल दौऱ्यासाठी उच्च-स्तरीय सुरक्षा प्रदान करण्याच्या...

मुंबईला पुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठा एका दिवसापूर्वी 17% वरून 28.9% पर्यंत वाढला | मुंबई...

मुंबई: सध्या सुरू असलेल्या ओल्या पावसामुळे मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील पाणीसाठ्यात या पावसाळ्यात सर्वाधिक वाढ झाली आहे.मंगळवार, 7 जुलै...

एकाशी निगडीत, दुसऱ्याशी लग्न: सिया गोयलचे अंतिम ‘दुहेरी आयुष्य’ केतन अग्रवाल खून प्रकरणाचा तपास...

मंगेतर केतन अग्रवालच्या हत्येचा आरोप असलेली सिया गोयल ही कथितपणे दुहेरी जीवन जगत होती कारण पोलिस तपासात गुप्त विवाह केल्याचा दावा केला आहे....

दिवसा फायटर, रात्री सुरक्षा रक्षक: भेटा विक्की सिंग टॉमक्याल, MMA फायटर जो अगदी कमीत...

व्यावसायिक रिंगमध्ये लाथ मारण्यासाठी ताकद निर्माण करण्यासाठी विक्की सिंग टॉमक्याल सिलिंडरला उशी बांधतो तेव्हा तो कमतरतांवर नाही तर त्याच्या एमएमएच्या स्वप्नाचा पाठलाग...

ठाणे जिल्ह्यात आठवडाभरात ८३८ मिमी पाऊस; बारवी धरणातील पाणीसाठा ३६ टक्क्यांवर

ठाणे दि. ७ ( प्रमोद दळवी ) : ठाणे जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून समाधानकारक पाऊस सुरू असून नद्या आणि धरणांतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे....

‘सुरक्षा नेहमीच चिंतेची बाब’: बांगलादेश भारताच्या संभाव्य T20I दौऱ्यासाठी सुरक्षा उपाय वाढवण्यास तयार आहे

बीसीबी भारताच्या बांगलादेश दौऱ्यासाठी 'सुरक्षा वाढवण्यास' तयार आहे (प्रतिमा: क्रिकइन्फो) बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) सप्टेंबरमध्ये भारताच्या नियोजित व्हाईट-बॉल दौऱ्यासाठी उच्च-स्तरीय सुरक्षा प्रदान करण्याच्या...

मुंबईला पुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठा एका दिवसापूर्वी 17% वरून 28.9% पर्यंत वाढला | मुंबई...

मुंबई: सध्या सुरू असलेल्या ओल्या पावसामुळे मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील पाणीसाठ्यात या पावसाळ्यात सर्वाधिक वाढ झाली आहे.मंगळवार, 7 जुलै...

एकाशी निगडीत, दुसऱ्याशी लग्न: सिया गोयलचे अंतिम ‘दुहेरी आयुष्य’ केतन अग्रवाल खून प्रकरणाचा तपास...

मंगेतर केतन अग्रवालच्या हत्येचा आरोप असलेली सिया गोयल ही कथितपणे दुहेरी जीवन जगत होती कारण पोलिस तपासात गुप्त विवाह केल्याचा दावा केला आहे....

दिवसा फायटर, रात्री सुरक्षा रक्षक: भेटा विक्की सिंग टॉमक्याल, MMA फायटर जो अगदी कमीत...

व्यावसायिक रिंगमध्ये लाथ मारण्यासाठी ताकद निर्माण करण्यासाठी विक्की सिंग टॉमक्याल सिलिंडरला उशी बांधतो तेव्हा तो कमतरतांवर नाही तर त्याच्या एमएमएच्या स्वप्नाचा पाठलाग...

ठाणे जिल्ह्यात आठवडाभरात ८३८ मिमी पाऊस; बारवी धरणातील पाणीसाठा ३६ टक्क्यांवर

ठाणे दि. ७ ( प्रमोद दळवी ) : ठाणे जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून समाधानकारक पाऊस सुरू असून नद्या आणि धरणांतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे....
error: Content is protected !!