बारामती दि २८ : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे बुधवारी सकाळी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात निधन झाले. सकाळी सुमारे पावणेनऊच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून, पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, या अपघातावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.
अजित पवार यांच्या निधनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, “हा महाराष्ट्राला प्रचंड मोठा धक्का आहे. एक कर्तृत्ववान नेता हरपला. हे राज्याचे झालेलं नुकसान कधीही भरून निघणार नाही. पण, सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. ही घटना निव्वळ अपघात आहे. यात कोणतेही राजकारण करू नये,” अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी व्यक्त केली.





























