Homeशहरविद्यार्थ्यांना वह्या वाटप करून आदिनाथ पालवे यांनी साजरा केला वाढदिवस

विद्यार्थ्यांना वह्या वाटप करून आदिनाथ पालवे यांनी साजरा केला वाढदिवस

उल्हासनगर दि. २१ ( प्रमोद दळवी )  : वाढदिवस हा समाजोपयोगी उपक्रमातून साजरा करण्याचा संदेश देत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख आदिनाथ पालवे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त उल्हासनगर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यालयात विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांना हातभार लावण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आदिनाथ पालवे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले आणि मन लावून शिक्षण घेऊन उज्ज्वल भवितव्य घडविण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष महादेवजी सोनवणे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र शाहू, शहरप्रमुख शिवाजी जावळे, माजी महानगरप्रमुख राधाचरण करतीया, उपशहरप्रमुख दशरथ चौधरी, अशोक जाधव, शाखाप्रमुख तानाजी माळी, युवासेना वॉर्ड अध्यक्ष दामू मिरगुडे, समाजसेवक शिवाजी रगडे, पत्रकार रामेश्वर गवई यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी आदिनाथ पालवे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या समाजाभिमुख उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अशा प्रकारचे उपक्रम प्रेरणादायी असून समाजातील इतरांनीही अशा सामाजिक कार्यातून वाढदिवस साजरा करण्याचा आदर्श घ्यावा, असे मत अनेकांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचा समारोप विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण, मान्यवरांच्या शुभेच्छा आणि उपस्थितांच्या उत्स्फूर्त सहभागाने आनंददायी वातावरणात झाला.

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मोशी कचरा डेपो दुर्घटनेच्या चौकशीसाठी संयुक्त समिती, महिनाभरात एनजीटीला अहवाल सादर

मोशी लँडफिल येथे कचरा पुणे : नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल (NGT) ने 8 जुलै रोजी मोशी लँडफिल कोसळण्याच्या चौकशीचे आदेश दिल्यानंतर, ज्यामध्ये नऊ जणांचा...

‘माझा शेवटचा सामना वर्ल्ड कप फायनल होता’: अर्जेंटिनाचा बचावपटू निकोलस ओटामेंडीने आंतरराष्ट्रीय निवृत्तीची घोषणा...

अर्जेंटिनाचा निकोलस ओटामेंडी (19) (एपी फोटो/एड जुर्गा) अर्जेंटिनाचा बचावपटू निकोलस ओटामेंडी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली असून, राष्ट्रीय संघातील 17 वर्षांची उल्लेखनीय...

मुंबई विमानतळावर ५.६ कोटी रुपयांच्या सोन्याची तस्करी करताना पाच जणांपैकी फ्लायर पकडले

डीआरआयने न्यायालयाला सांगितले की, सिंडिकेटमधील इतर सदस्यांची ओळख पटवण्यासाठी, सोन्याचा स्रोत शोधण्यासाठी तपास सुरू आहे. मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर...

कठीण परिस्थितीतही गुरुत्वाकर्षण आईनस्टाईन म्हटल्याप्रमाणे वागते, भारतीय शास्त्रज्ञ निष्कर्ष प्रमाणित करतात | पुणे बातम्या

IUCAA येथे अल्बर्ट आइन्स्टाईनचा पुतळा पुणे : अल्बर्ट आइनस्टाइनने त्यांचा सामान्य सापेक्षतेचा सिद्धांत मांडल्यानंतर 100 वर्षांहून अधिक काळ, कृष्णविवरांच्या आदळण्यापासून गुरुत्वीय लहरींच्या जगातील...

‘भारत फक्त उष्णता आणि अराजक नाही’: ऑस्ट्रियन महिलेने भारताविषयीच्या मिथकांना आव्हान दिले ती ‘ऐकून...

काही शब्दांत वर्णन करणे भारत हा एक कठीण देश आहे. हे खूप मोठे आहे, खूप वैविध्यपूर्ण आहे आणि संपूर्ण कथा सांगण्यासाठी एकाच...

मोशी कचरा डेपो दुर्घटनेच्या चौकशीसाठी संयुक्त समिती, महिनाभरात एनजीटीला अहवाल सादर

मोशी लँडफिल येथे कचरा पुणे : नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल (NGT) ने 8 जुलै रोजी मोशी लँडफिल कोसळण्याच्या चौकशीचे आदेश दिल्यानंतर, ज्यामध्ये नऊ जणांचा...

‘माझा शेवटचा सामना वर्ल्ड कप फायनल होता’: अर्जेंटिनाचा बचावपटू निकोलस ओटामेंडीने आंतरराष्ट्रीय निवृत्तीची घोषणा...

अर्जेंटिनाचा निकोलस ओटामेंडी (19) (एपी फोटो/एड जुर्गा) अर्जेंटिनाचा बचावपटू निकोलस ओटामेंडी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली असून, राष्ट्रीय संघातील 17 वर्षांची उल्लेखनीय...

मुंबई विमानतळावर ५.६ कोटी रुपयांच्या सोन्याची तस्करी करताना पाच जणांपैकी फ्लायर पकडले

डीआरआयने न्यायालयाला सांगितले की, सिंडिकेटमधील इतर सदस्यांची ओळख पटवण्यासाठी, सोन्याचा स्रोत शोधण्यासाठी तपास सुरू आहे. मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर...

कठीण परिस्थितीतही गुरुत्वाकर्षण आईनस्टाईन म्हटल्याप्रमाणे वागते, भारतीय शास्त्रज्ञ निष्कर्ष प्रमाणित करतात | पुणे बातम्या

IUCAA येथे अल्बर्ट आइन्स्टाईनचा पुतळा पुणे : अल्बर्ट आइनस्टाइनने त्यांचा सामान्य सापेक्षतेचा सिद्धांत मांडल्यानंतर 100 वर्षांहून अधिक काळ, कृष्णविवरांच्या आदळण्यापासून गुरुत्वीय लहरींच्या जगातील...

‘भारत फक्त उष्णता आणि अराजक नाही’: ऑस्ट्रियन महिलेने भारताविषयीच्या मिथकांना आव्हान दिले ती ‘ऐकून...

काही शब्दांत वर्णन करणे भारत हा एक कठीण देश आहे. हे खूप मोठे आहे, खूप वैविध्यपूर्ण आहे आणि संपूर्ण कथा सांगण्यासाठी एकाच...
error: Content is protected !!