Homeशहरअतिसार थांबवा अभियानांतर्गत आनंद नगर येथे जनजागृती उपक्रम

अतिसार थांबवा अभियानांतर्गत आनंद नगर येथे जनजागृती उपक्रम

ठाणे दि.१९ ( प्रमोद दळवी )  : ठाणे महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या “अतिसार थांबवा अभियान” अंतर्गत आनंद नगर आरोग्य केंद्र, कासारवडवली येथे विशेष जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात आला.

या उपक्रमास ज्ञानगंगा एज्युकेशनल ट्रस्टच्या नर्सिंग महाविद्यालयाचे पीआरओ प्रा. अनिल आठवले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. माधवी देवल, परिचारिका सौ. प्रतिभा भोये, कु. राजश्री महाले तसेच प्रसाविका, आशा व इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. अभियानाअंतर्गत बाह्यरुग्ण विभागातील रुग्ण व नागरिकांना अतिसार प्रतिबंधासाठी आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. हात स्वच्छ धुण्याची योग्य पद्धत, वैयक्तिक व परिसर स्वच्छता राखणे, सुरक्षित व ताजे अन्न सेवन करणे, उकळून अथवा शुद्ध केलेले पाणी पिणे तसेच शिळे अन्न टाळण्याबाबत माहिती देण्यात आली.

तसेच ORS (ओआरएस) द्रावण तयार करण्याची योग्य पद्धत समजावून सांगण्यात आली. ORS चे द्रावण तयार केल्यानंतर ते २४ तासांच्या आत वापरण्याचे तसेच उर्वरित द्रावण टाकून देण्याचे आवाहन करण्यात आले. लहान मुलांमध्ये अतिसाराची लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेण्याचे महत्त्वही यावेळी अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान हात धुण्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले तसेच उपस्थितांना ORS पाकिटांचे वाटप करण्यात आले. नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत या जनजागृती उपक्रमात सहभाग नोंदविला.

दिनांक १६ जून ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत सुरू असलेल्या “अतिसार थांबवा अभियान” अंतर्गत अशा विविध जनजागृती उपक्रमांद्वारे नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचे कार्य सुरू असून, या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व संबंधितांचे आभार व्यक्त करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उल्हासनगरमध्ये साईनाथ सेवा समिती पालखी परिवारच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

उल्हासनगर दि. १५ ( प्रमोद दळवी )  : रक्तदान हेच श्रेष्ठ दान या सामाजिक भावनेतून साईनाथ सेवा समिती पालखी परिवार, उल्हासनगर-१ यांच्या वतीने भव्य...

उल्हासनगर गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५७ कोटी २५ लाखांची सायबर फसवणूक उघड

उल्हासनगर दि. १५ ( प्रमोद दळवी )  : देशातील विविध राज्यांतील नागरिकांची तब्बल ५७ कोटी २५ लाख ४४ हजार २८४ रुपयांची सायबर फसवणूक केल्याचे...

स्वातंत्र्य दिन व संविधान बहुउद्देशीय संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा : विद्यार्थ्यांना वह्या-पेनचे वाटप

उल्हासनगर दि. १५ ( प्रमोद दळवी  )  : स्वातंत्र्य दिन तसेच संविधान बहुउद्देशीय संस्थेचा वर्धापन दिन विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात...

उल्हासनगरच्या आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा : ८ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्रांचे लोकार्पण

नागरिकांना मिळणार अधिक सुलभ, गुणवत्तापूर्ण आणि नागरिकाभिमुख प्राथमिक आरोग्यसेवा उल्हासनगर दि.१५ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच सुलभ, दर्जेदार...

उल्हासनगरच्या वाहतूक कोंडीवर हायटेक उपाय; Google Maps वर नजर ठेवत आता कंट्रोल रूममधून वाहतूक...

उल्हासनगर  दि. १५ ( प्रमोद दळवी ) : अरुंद रस्ते, वाढती वाहनसंख्या आणि त्यातून निर्माण होणारी वाहतूक कोंडी ही उल्हासनगर शहराची मोठी समस्या बनली...

उल्हासनगरमध्ये साईनाथ सेवा समिती पालखी परिवारच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

उल्हासनगर दि. १५ ( प्रमोद दळवी )  : रक्तदान हेच श्रेष्ठ दान या सामाजिक भावनेतून साईनाथ सेवा समिती पालखी परिवार, उल्हासनगर-१ यांच्या वतीने भव्य...

उल्हासनगर गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५७ कोटी २५ लाखांची सायबर फसवणूक उघड

उल्हासनगर दि. १५ ( प्रमोद दळवी )  : देशातील विविध राज्यांतील नागरिकांची तब्बल ५७ कोटी २५ लाख ४४ हजार २८४ रुपयांची सायबर फसवणूक केल्याचे...

स्वातंत्र्य दिन व संविधान बहुउद्देशीय संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा : विद्यार्थ्यांना वह्या-पेनचे वाटप

उल्हासनगर दि. १५ ( प्रमोद दळवी  )  : स्वातंत्र्य दिन तसेच संविधान बहुउद्देशीय संस्थेचा वर्धापन दिन विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात...

उल्हासनगरच्या आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा : ८ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्रांचे लोकार्पण

नागरिकांना मिळणार अधिक सुलभ, गुणवत्तापूर्ण आणि नागरिकाभिमुख प्राथमिक आरोग्यसेवा उल्हासनगर दि.१५ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच सुलभ, दर्जेदार...

उल्हासनगरच्या वाहतूक कोंडीवर हायटेक उपाय; Google Maps वर नजर ठेवत आता कंट्रोल रूममधून वाहतूक...

उल्हासनगर  दि. १५ ( प्रमोद दळवी ) : अरुंद रस्ते, वाढती वाहनसंख्या आणि त्यातून निर्माण होणारी वाहतूक कोंडी ही उल्हासनगर शहराची मोठी समस्या बनली...
error: Content is protected !!