ठाणे दि. ४ ( प्रमोद दळवी ) : आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या १७८ व्या स्मृतिदिनानिमित्ताने ठाणे सेंट्रल जेल येथे हजारो आदिवासी बांधवांनी अभिवादन केले.

याप्रसंगी मा.ना.प्रा.अशोकरावजी उईके मंत्री आदिवासी विकास महाराष्ट्र शासन मुंबई मंत्रालय, मा.डॉ.हेमंत सवरा (खासदार), मा.जिल्हा अधिकारी पांचाळ ,आमदार निरंजन डावखरे,आमदार केळकर,आदिवासी अप्पर आयुक्त कदम प्रकल्प अधिकारी शहापूर,जेल अध्यक्षका श्रीम. भोसले मॅडम मा. डॉ.व्ही व्ही पोपेरे (आदिवासी सेवक) महाराष्ट्र शासन, सह्याद्री सेवा संघाचे अध्यक्ष रामनाथ भोजने, डॉ सुपे सर, राजेंद्र भांगरे शहापूर, लकी जाधव (नासिक), नवाळे सर, साबळे सर पुणे, सुनील भांगरे सर , सर्व समाज बांधव व सर्व आदिवासी विकास विभागातील कर्मचारी वर्ग इतर सर्व मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

राघोजी भांगरे यांचे कार्य खेडोपाड्यापर्यंत पोहोचवले पाहिजे त्यांचा इतिहास नव्या पिढीला वाचता लिहिता आला पाहिजे म्हणून प्रत्येक कार्यकर्त्यांनी व समाज बांधवांनी कार्य केले पाहिजे असे आव्हान आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांनी आपल्या भाषणात सांगितले.





























