उल्हासनगर दि.११ ( प्रमोद दळवी ) : शहरात एसआयआरचे काम जोरात सुरू आहे. आमदार कुमार आयलानी आणि एसडीओ विजयानंद शर्मा यांनी शनिवारी सर्व बीएलओंसोबत बैठक घेतली. या बैठकीत आमदार कुमार आयलानी यांनी सर्व बीएलओंना त्यांचे कर्तव्य निष्ठेने पार पाडण्याचे आवाहन केले, जेणेकरून कोणत्याही पात्र व्यक्तीचे नाव मतदार यादीतून सुटणार नाही.
उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा यांनी सांगितले की, जर कोणताही बीएलओ आपल्या कामात हलगर्जीपणा करत असेल किंवा त्याच्याविरुद्ध तक्रार आल्यास शिक्षेची तरतूद आहे, त्यामुळे त्यांनी आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडावे. त्यांनी इतर आवश्यक सूचनाही दिल्या. आमदार कुमार आयलानी यांनी शहरातील नागरिकांना एसआयआर मॅपिंग प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले, अन्यथा त्यांची नावे मतदार यादीतून वगळली जातील. हे काम संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाले आहे. यामध्ये कोणाला काही अडचण आल्यास आपल्या भागातील बीएलओला भेटा किंवा आमदारांच्या जनसंपर्क कार्यालयात येऊन समस्या सोडवा.





























