उल्हासनगर दि १० : उल्हासनगर येथे “संघटन सृजन अभियान” अंतर्गत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा, पत्रकार परिषद व बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली .भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने देशभरात ‘संघटन सृजन अभियान’ हाती घेतले असून, महाराष्ट्रात हे अभियान पक्षाला तळागाळापर्यंत मजबूत करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

या मेळाव्यात नियुक्त निरीक्षक ह्यांनी जिल्हाध्यक्ष निवडीपासून ते महिला काँग्रेस, युवक, सेवादल, NSUI, सर्व सेल, सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशन आणि ब्लॉक अध्यक्ष निवडीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच विविध पदांसाठीचे फॉर्म वितरित करण्यात आले व त्या नंतर प्रत्येक पदाधिकाऱ्याशी थेट संवाद साधण्यात आला.
ह्या अभियाना मुळे उल्हासनगर शहरातील कांग्रेस विचारधारा मानणाऱ्या सर्व नागरिकांना पक्षात विविध पदावर काम करण्याची संधी भेटणार आहे. यावेळी अखिल भारतीय काँग्रेसचे निरीक्षक डॉ पालक वर्मा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस निरीक्षक बाबू नायर ,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस निरीक्षक अनीस इद्रिसी व जिल्हाध्यक्ष रोहित साळवी आणि सर्व ब्लॉक अध्यक्ष व इतर ज्येष्ठ नेते व पदाधिकारी उपस्थित होते.





























