उल्हासनगर दि १८ : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील हिंदी सक्तीला आक्रमकपणे विरोध केला. यानंतर राज्यातील अनेक भागातील मनसैनिक हिंदी सक्तीविरोधात आक्रमक झालेले पाहायला मिळाले. दरम्यान उल्हासनगरात देखील मनसैनिकांनी आक्रमक होत हिंदी सक्तीच्या अध्यादेशाची होळी केली. त्यावेळी हिंदी सक्तीच्या विरोधात आणि राज्य सरकारच्या विरोधात मनसैनिकांनी घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांचे निवेदन उल्हासनगरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले. आपल्या राज्यातील राज्यकर्ते हे दिल्ली समोर नतमस्तक झालेले आहेत आणि त्यामुळे मराठीची गळचेपी करण्यासाठी तिसऱ्या भाषेचा पर्याय म्हणून हिंदी सक्ती केली जात असल्याचा आरोप मनसैनिकांनी केला. दरम्यान ही सक्त मागे घेतले नाही तर आणखीन उग्र आंदोलन करण्याचा इशारा मानसैनिकांनी दिला

महाराष्ट्र शासनाने १७/०६/२०२५ रोजी शासन निर्णय क्रमांक :- संकीर्ण – २०२५ / प्र.क्र. ९४/एस.डी.-४ दिनांक १६ एप्रिल २०२५ शासन शुद्धीपत्रक काढून महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागात त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु आपल्या महाराष्ट्रच्या शिक्षण विभागाला किंवा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना ३ ऱ्या भाषेची खरंच गरज आहे का. याचा विचार सरकार करतांना दिसत नाही. फक्त दिल्ली हुन आदेश आला म्हणून महाराष्ट्रातील १ ली ते ५ वी च्या विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याच काम सरकार करत आहे असा आरोप करीत प्रांत कार्यालया बाहेर या शासन आदेशाची उल्हासनगर मनसे कडून होळी करून प्रांतअधिकारी ( SDO) विजयानंद शर्मा यांना निवेदन देण्यात आल.
मनसेने सांगितले जर जबरदस्तीने हा शासन निर्णय लागू करून विद्यार्थ्यांनवर तिसरी भाषा लादली जाणार असेल, तर हे खपवून घेतलं जाणार नाही. “महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीत हिंदी भाषा लादू दिली जाणार नाही. त्रिभाषा सूत्राचा राष्ट्रीय शिक्षण धोरणाशी काहीही संबंध नसून हा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली. हा शासन निर्णय तात्काळ रद्द न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा ईशारा मनसे कडून देण्यात आला.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सचिन कदम, जिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख,मनविसे जिल्हा अध्यक्ष धनंजय गुरव, उपजिल्हा अध्यक्ष शैलेश शिर्के,प्रदीप गोडसे,शहर अध्यक्ष संजय घुगे,मनविसे शहर अध्यक्ष वैभव कुलकर्णी, शहर संघटक अशोक गरड,मनसेचे उपशहर अध्यक्ष सचिन बेंडके,मुकेश शेटपालांनी,रवी पाल,शैलेश पांडव वाहतूक सेनेचे शहर संघटक काळू थोरात,रस्ते आस्थापनाचे मैनऊद्दीन शेख,विभाग अध्यक्ष देवा तायडे,अक्षय ठाकूर,मोहित बेहराणी, यांच्यासह निलेश शिंदे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


























