उल्हासनगर दि २० : उल्हासनगर शहरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून वीज बिल देखील जास्त येणे व अन्य समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत. या संदर्भात वीज महावितरण कंपनीने तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेनेतर्फे महावितरण कार्यालयाचे बैठकीत देण्यात आला आहे .
शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या नेतृत्वाखालील साईबाबा मंदिर येथील महावितरण कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी कल्याण तेजश्री मुख्य अभियंता विजय फुंदे, उल्हासनगरचे कार्यकारी अभियंता हरीश भराडे यांच्या सोबत वरील सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी नागरीकांना भेडसावत असलेल्या समस्यांबाबत लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा नाही तर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला .
शिवसेनेच्या या भूमिकेनंतर उपस्थित महावितरणचे आधिकारी यांनी या सर्व समस्या एक महिन्यात सोडवण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, उपजिल्हा प्रमुख दिलीप गायकवाड, युवासेना शहर अध्यक्ष बाळा श्रीखंडे, समाजसेवक रवि खिलनानी, उपशहर प्रमुख सुरेश सोनवणे, आदेश पाटील,विल्सन डिसोजा,तुषार बादंल अमोल सरदार,विजय पवार, कैलास म्हात्रे व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व कॅम्प नंबर एक विभागातील महिला काही प्रमाणात उपस्थित होत्या.





























