Homeशहरबदलापूर (पूर्व) येथील वालिवली परिसरात उभारण्यात येणाऱ्या एकात्मिक घनकचरा प्रकल्पाचा उल्हासनगर महापौर,...

बदलापूर (पूर्व) येथील वालिवली परिसरात उभारण्यात येणाऱ्या एकात्मिक घनकचरा प्रकल्पाचा उल्हासनगर महापौर, उपमहापौर आमदार व नगरसेवकांचा पाहणी दौरा

उल्हासनगर दि २८ ( प्रमोद दळवी ) : सहा दिवसापूर्वी उल्हासनगर महापालिकेच्या महासभेत शहरातील कॅम्प नंबर -५ परिसरातील डम्पिंग ग्राउंड संदर्भात भाजपच्या नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन केले होते. याशिवाय या डम्पिंग ग्राउंडमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून त्या ठिकाणाहून ते डम्पिंग ग्राउंड स्थलांतरित करावे अशी मागणी केली होती. आता बदलापूर (पूर्व) येथील वालिवली परिसरात उभारण्यात येणाऱ्या एकात्मिक घनकचरा प्रकल्पामुळे उल्हासनगर शहरातील कचरा समस्या सुटणार आहे. मंगळवारी उल्हासनगर महानगरपालिकेच्या महापौर अश्विनी निकम, आमदार कुमार आयलानी, उपमहापौर अमर लोंढे व विविध पक्षाच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी व नगरसेवकांनी त्या प्रकल्पाचा पाहणी दौरा केला.

बदलापूर (पूर्व) येथील वालिवली परिसरात उभारण्यात येत असलेला १४८ कोटी रुपयांचा एकात्मिक घनकचरा प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचला असून, बदलापूर, अंबरनाथ आणि उल्हासनगर या शहरांतील कचरा समस्या सुटणार आहे. सुमारे २३ एकर जागेत उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पात दररोज ६०० हून अधिक मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. या प्रकल्पात ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार केले जाणार असून सुक्या कचऱ्यापासून इंधन निर्मिती केली जाणार आहे. तसेच प्लास्टिक, काच, कापड यांसारख्या वस्तूंची पुनर्प्रक्रिया केली जाणार आहे. बांधकामातील कचऱ्याचाही पुनर्वापर करण्याची व्यवस्था या प्रकल्पात करण्यात आली आहे. वालिवली परिसरातील सर्वेक्षण क्रमांक १८८ या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पाची क्षमता दररोज ६४१ टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची असून त्यामुळे डम्पिंग ग्राउंडवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. उपलब्ध माहितीनुसार, एकूण कचऱ्यापैकी सुमारे ५५ टक्के कचऱ्याची विल्हेवाट लावली जाईल, तर ४५ टक्के ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती केली जाईल.

मंगळवारी या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी महापौर अश्विनी निकम, आमदार कुमार आयलानी, उपमहापौर अमर लुंड, भाजप गटनेते राजेश वधारिया, स्थायी समिती सभापती कलवंत सिंह सोहता, विरोधी पक्षनेत्या अंजली साळवे, आरोग्य सभापती सविता ताई तोरणे-रगडे, महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, नगरसेवक प्रधान पाटील , इतर नगरसेवक व मनपा अधिकारी तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी पाहणी दौरा केला .

यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कचऱ्याच्या प्रक्रियेची पद्धत, प्रकल्पाची सद्यस्थिती आणि उर्वरित कामाबाबत सविस्तर माहिती दिली. या प्रकल्पातील मुख्य शेडचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले असून सध्या यंत्रसामग्री बसवण्याचे काम मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणार आहे. हा क्लस्टर प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर तीनही शहरांना कचरामुक्त करण्यासोबतच दुर्गंधीच्या समस्येतून मोठा दिलासा मिळणार आहे. हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या मदतीने राबविण्यात येत असून, यामुळे परिसरातील प्रदूषणावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येईल, अशी अपेक्षा आहे. या प्रकल्पामुळे उल्हासनगर शहरातील कचरा समस्या आता सुटणार आहे. त्यामुळे शहरातील कॅम्प नंबर -५ परिसरातील डम्पिंग ग्राउंड परिसरातील नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे..

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘पुस्तके, इंटरनेटच्या माध्यमातून आत्मकेंद्रित’: मुंबईजवळ सुरक्षा रक्षकांवर चाकूने वार करणाऱ्या व्यक्तीने जिहाद विचारधारेवर कृत्य...

मीरा-भाईंदर हल्लेखोर ऑनलाइन कंटेंटच्या माध्यमातून स्वत: कट्टरपंथी बनला होता आणि 'जिहाद' करण्याच्या कल्पनेने प्रेरित होता, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. कोल्हापूर: मुंबईजवळील...

वाहनावर प्रलंबित इ-चलन दंड तडजोडीने व त्वरित निकाली काढण्याची लोकअदालत मध्ये संधी

उल्हासनगर दि २८ ( प्रमोद दळवी ) : आपल्या वाहनावर प्रलंबित इ-चलन दंड तडजोडीने व त्वरित निकाली काढण्याची नागरिकांना लोकअदालत मध्ये संधी देण्यात आली...

आगीत सर्व काही भस्मसात झालेल्या ठाण्यातील गुजर कुटुंबाला डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचा मदतीचा हात

ठाणे दि.२८ : शास्त्रीनगर परिसरातील विजय गुजर यांच्या घराला लागलेल्या भीषण आगीत त्यांचा संपूर्ण संसार काही क्षणांत भस्मसात झाला. आयुष्यभर कष्ट करून उभारलेलं घर...

‘आयएसआयएसमध्ये सामील होण्याची पहिली पायरी’: अमेरिकेत परतलेल्या माणसाने सुरक्षा रक्षकांना कसे भोसकले मुंबईजवळ दहशतवादी

आरोपीच्या निवासस्थानी ISIS मध्ये सामील होण्याची इच्छा दर्शविणाऱ्या त्रासदायक नोट्स सापडल्यानंतर मीरा रोडमध्ये दोन सुरक्षा रक्षकांना चाकूने भोसकणे हे मोठ्या सुरक्षा तपासात वाढले...

बंगालच्या उपसागराचा महासागर 92 दशलक्ष वर्षांपूर्वीचा आहे: IISER अभ्यास

प्रतिनिधी प्रतिमा" decoding="async" fetchpriority="high"/> पुणे: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISER) पुणे च्या संशोधकांनी केलेल्या एका नवीन अभ्यासात असे आढळून आले...

‘पुस्तके, इंटरनेटच्या माध्यमातून आत्मकेंद्रित’: मुंबईजवळ सुरक्षा रक्षकांवर चाकूने वार करणाऱ्या व्यक्तीने जिहाद विचारधारेवर कृत्य...

मीरा-भाईंदर हल्लेखोर ऑनलाइन कंटेंटच्या माध्यमातून स्वत: कट्टरपंथी बनला होता आणि 'जिहाद' करण्याच्या कल्पनेने प्रेरित होता, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. कोल्हापूर: मुंबईजवळील...

वाहनावर प्रलंबित इ-चलन दंड तडजोडीने व त्वरित निकाली काढण्याची लोकअदालत मध्ये संधी

उल्हासनगर दि २८ ( प्रमोद दळवी ) : आपल्या वाहनावर प्रलंबित इ-चलन दंड तडजोडीने व त्वरित निकाली काढण्याची नागरिकांना लोकअदालत मध्ये संधी देण्यात आली...

आगीत सर्व काही भस्मसात झालेल्या ठाण्यातील गुजर कुटुंबाला डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचा मदतीचा हात

ठाणे दि.२८ : शास्त्रीनगर परिसरातील विजय गुजर यांच्या घराला लागलेल्या भीषण आगीत त्यांचा संपूर्ण संसार काही क्षणांत भस्मसात झाला. आयुष्यभर कष्ट करून उभारलेलं घर...

‘आयएसआयएसमध्ये सामील होण्याची पहिली पायरी’: अमेरिकेत परतलेल्या माणसाने सुरक्षा रक्षकांना कसे भोसकले मुंबईजवळ दहशतवादी

आरोपीच्या निवासस्थानी ISIS मध्ये सामील होण्याची इच्छा दर्शविणाऱ्या त्रासदायक नोट्स सापडल्यानंतर मीरा रोडमध्ये दोन सुरक्षा रक्षकांना चाकूने भोसकणे हे मोठ्या सुरक्षा तपासात वाढले...

बंगालच्या उपसागराचा महासागर 92 दशलक्ष वर्षांपूर्वीचा आहे: IISER अभ्यास

प्रतिनिधी प्रतिमा" decoding="async" fetchpriority="high"/> पुणे: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISER) पुणे च्या संशोधकांनी केलेल्या एका नवीन अभ्यासात असे आढळून आले...
error: Content is protected !!