Homeशहरउल्हासनगरात पाणी प्रश्न पेटला : शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक,

उल्हासनगरात पाणी प्रश्न पेटला : शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक,

  • पाण्याची हांडे डोक्यावर घेऊन महिला कार्यकर्त्यांचा पालिकेत शिरण्याचा प्रयत्न,
  • पालिका प्रशासनाला सद्बुद्धी येण्यासाठी होम हवन
  • सुरक्षारक्षक व पोलिसांबरोबर शिवसैनिकांची धक्काबुक्की

( प्रमोद दळवी )

उल्हासनगर दि. २  : शहरातील विविध नागरिक समस्या व पाणीटंचाईच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेऊन उल्हासनगर महापालिकेवर शुक्रवारी जन आक्रोश मोर्चा काढला होता. संतप्त शिवसैनिकांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच होम हवन आंदोलन सुरू केले. त्यावेळी महापालिकेच्या सुरक्षारक्षकांनी पालिकेच्या प्रवेशद्वाराचा गेट बंद केल्याने संताप शिवसैनिकांनी  विशेषता महिला शिवसैनिक कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारावर चढून पाण्याचा हंडा डोक्यावर घेऊन पालिकेत शिरण्याचा प्रयत्न केला. काही शिवसैनिक आत शिरल्यानंतर महापालिकेचे सुरक्षारक्षक, व पोलिसांबरोबर शिवसैनिकांची धक्काबुक्की झाली. शिवसैनिकांच्या  या आक्रमक भूमिकेमुळे महापालिकेच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

शहरातील नागरिकांच्या विविध समस्या त्वरित सोडवा, शहराला मुबलक पाणी मिळालाच पाहिजे, पाणीपट्टी दर कमी झालाच पाहिजे अशा विविध समस्या सोडवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. उल्हासनगर शहरांमध्ये पाणीटंचाई त्याचबरोबर अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक संताप झाले आहेत. हे पाणी समस्या सुटत नसल्याने ३० एप्रिल रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पालिकेला निवेदन दिले होते. त्या निवेदनात  शहरातील विविध समस्या बाबत सांगण्यात आले होते. याशिवाय शुक्रवारी या समस्या बाबत शहरातील जनतेला सोबत घेऊन महापालिकेवर जन आक्रोश मोर्चा काढणार असल्याचाही इशारा देण्यात आला होता.

शुक्रवारी सकाळी ११  वाजताच मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी पालिकेच्या गेटवर गर्दी केली होती. शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी डोक्यावर पाण्याचा हंडा घेत पालिका प्रशासनाचे  लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पालिकेवर आलेला हा जन आक्रोश मोर्चा पाहून पालिकेच्या सुरक्षारक्षकांची एकच तारांबळ उडाली होती. त्यांनी पालिकेचे प्रवेशद्वार बंद करताच संताप शिवसैनिकांनी प्रवेशद्वारावर चढून आत मध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सुरक्षा रक्षक व पोलीस यांच्यासोबत शिवसैनिकांची धक्काबुक्की झाली. पाणी समस्या सोडवण्यासाठी या जन आक्रोश आंदोलन मोर्चामुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली होती. धनंजय बोराडे यांनी सांगितले की पाण्यासाठी हे  जन आक्रोश आंदोलन वारंवार सांगून,व  लेखी निवेदन देऊनही या महापालिका प्रशासनाला जाग येत नव्हती. पाण्याची समस्या सुटणे ऐवजी दिवसान दिवस वाढतच चालले आहे. काही भागात चार चार पाच पाच दिवस पाणी येत नाही.

अधिकाऱ्यांना फोन केला तर अधिकारी फोन उचलत नाही. या समस्याची दखल घेत नाही . आयुक्त मॅडम यांना वेळ नसतो. त्यांना या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. त्यांना प्रशासकीय कामकाजामुळे पुरेसा वेळ मिळत नाही. प्रशासकीय कामकाजामध्ये त्यांचा पहिला नंबर आला आहे. त्यांचे मी अभिनंदन करतो. पण पाण्याची समस्या,रस्त्यांची समस्या जशीच्या तशीच आहे. ही पाण्याची समस्या सुटण्यासाठी आज हा जन आक्रोश आंदोलन होतं या महापालिका प्रशासनाला व अधिकाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून या जनतेने आज होमहवन केले. आम्हाला खात्री आहे त्यांना सद्बुद्धी मिळेल असे धनंजय बोडारे म्हणाले .त्यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र शाहू, भीमसेन मोरे, राधाचरण करोतिया, कुलविंदरसिंह बैस, उपविभाग प्रमुख प्रा. प्रकाश माळी सर, भाऊ मात्रे, दिलीप मिश्रा, सुरेश पाटील, राजन वेलकर, भगवान मोहिते, शिवाजी जावळे, दशरथ चौधरी, महेश फुंदे, आदिनाथ पालवे, प्रकाश चौधरी, महिला आघाडी शहर संघटक जया तेजी यांच्यासह शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांनी शिष्टमंडळासह पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत पाण्याच्या गंभीर समस्या बाबत बैठकीत चर्चा केली असता त्यावेळी अधिकाऱ्यांनी पाण्याची समस्या लवकरात लवकर आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मॅट हेन्रीने ३६ वर्षांची प्रतीक्षा संपवली, जसप्रीत बुमराहला संयुक्त क्र. आयसीसी कसोटी गोलंदाजी क्रमवारीत...

न्यूझीलंडचा मॅट हेन्री (बेन व्हिटली/पीए द्वारे एपी) मॅट हेन्री अधिकृतपणे जसप्रीत बुमराहच्या ICC पुरुष कसोटी गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर सामील झाला आहे. 24...

हवामान बदलामुळे 2030 पर्यंत भारतातील 90% अक्षय ऊर्जा पाइपलाइन धोक्यात येऊ शकते, असे अहवालात...

मुंबई/नवी दिल्ली: भारताच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ ऊर्जा संक्रमणाला मोठ्या हवामान आव्हानाचा सामना करावा लागू शकतो, देशाच्या नियोजित नूतनीकरणक्षम उर्जा क्षमतेपैकी जवळपास 90% प्रकल्पांना...

दिवाळीच्या पार्टीत चेतनला भेटले, जवळीक वाढली, मग ‘स्क्रिप्टेड’ मंगेतराची हत्या: पोलिसांनी सिया गोयलचा लोहगडचा...

दिवाळीच्या पार्टीत उफाळून आलेली मैत्री कथितपणे प्राणघातक ठरली, ज्याचा पर्यवसान लोहगड किल्ल्यावरील व्यापारी केतन अग्रवाल यांच्या हत्येमध्ये झाला. पुणे ग्रामीण पोलिसांचा दावा आहे...

युएन एजन्सीकडून 4 देशांमध्ये पेटंटसाठी आमंत्रण: 9 वर्षीय रितान्या कौशिकची विलक्षण कथा आणि तिच्या...

बहुतेक नऊ वर्षांची मुले शाळा, गृहपाठ आणि खेळण्यात दिवस घालवतात. पण रितन्य कौशिक बहुतेक मुलांप्रमाणे नाही. ज्या वयात अनेक मुलं अजूनही त्यांच्या...

2,000 कॉल, कॅफे मीट, किल्ल्याचा कट: पुण्यातील रिअल्टरच्या हत्येपूर्वी सिया गोयलला ‘स्वतःसाठी अधिक वेळ’...

केतन अग्रवाल हत्येचा कट पुणे पोलिसांनी उघड केला आहे पुणे: 2,000 हून अधिक फोन कॉल्स, कथितपणे दिवाळीच्या पार्टीत सुरू झालेली मैत्री आणि एका...

मॅट हेन्रीने ३६ वर्षांची प्रतीक्षा संपवली, जसप्रीत बुमराहला संयुक्त क्र. आयसीसी कसोटी गोलंदाजी क्रमवारीत...

न्यूझीलंडचा मॅट हेन्री (बेन व्हिटली/पीए द्वारे एपी) मॅट हेन्री अधिकृतपणे जसप्रीत बुमराहच्या ICC पुरुष कसोटी गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर सामील झाला आहे. 24...

हवामान बदलामुळे 2030 पर्यंत भारतातील 90% अक्षय ऊर्जा पाइपलाइन धोक्यात येऊ शकते, असे अहवालात...

मुंबई/नवी दिल्ली: भारताच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ ऊर्जा संक्रमणाला मोठ्या हवामान आव्हानाचा सामना करावा लागू शकतो, देशाच्या नियोजित नूतनीकरणक्षम उर्जा क्षमतेपैकी जवळपास 90% प्रकल्पांना...

दिवाळीच्या पार्टीत चेतनला भेटले, जवळीक वाढली, मग ‘स्क्रिप्टेड’ मंगेतराची हत्या: पोलिसांनी सिया गोयलचा लोहगडचा...

दिवाळीच्या पार्टीत उफाळून आलेली मैत्री कथितपणे प्राणघातक ठरली, ज्याचा पर्यवसान लोहगड किल्ल्यावरील व्यापारी केतन अग्रवाल यांच्या हत्येमध्ये झाला. पुणे ग्रामीण पोलिसांचा दावा आहे...

युएन एजन्सीकडून 4 देशांमध्ये पेटंटसाठी आमंत्रण: 9 वर्षीय रितान्या कौशिकची विलक्षण कथा आणि तिच्या...

बहुतेक नऊ वर्षांची मुले शाळा, गृहपाठ आणि खेळण्यात दिवस घालवतात. पण रितन्य कौशिक बहुतेक मुलांप्रमाणे नाही. ज्या वयात अनेक मुलं अजूनही त्यांच्या...

2,000 कॉल, कॅफे मीट, किल्ल्याचा कट: पुण्यातील रिअल्टरच्या हत्येपूर्वी सिया गोयलला ‘स्वतःसाठी अधिक वेळ’...

केतन अग्रवाल हत्येचा कट पुणे पोलिसांनी उघड केला आहे पुणे: 2,000 हून अधिक फोन कॉल्स, कथितपणे दिवाळीच्या पार्टीत सुरू झालेली मैत्री आणि एका...
error: Content is protected !!