बदलापूर दि . २६( प्रमोद दळवी ) : मुंबईमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातला असून ठाणे जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडत असल्याने अनेक रस्ते पाण्याखाली आले आहेत. सतत पडत असणाऱ्या या मुसळधार पावसामुळे बदलापूर मधील बेलवली परिसरातील रेल्वेच्या भुयारी मार्गात कार बुडाल्याची खळबजनक घटना घडली आहे. त्यावेळी कार मध्ये चालक असल्याने त्याला बाहेर काढण्यात यश आले आहे.
मुसळधार पावसामुळे रेल्वेच्या या भुयारी मार्गात दहा फुटापेक्षा पाणी जास्त साचले होते. त्यावेळी ही कार पाण्यात अडकली. वेळीच कार चालकाने आपली सुटका करून घेतल्याने तो बाल बाल बचावला. मुसळधार पावसामुळे या रेल्वेच्या भुयारी मार्गात पाणी तुंबलेले आहे. त्यात काल रात्रीपासून पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी देखील वाढली आहे. रेल्वेच्या भुयारी मार्गात पावसाचे पाणी तुंबन राहिल्याने तो मार्ग बंद झाला आहे. वेळीच रेल्वे प्रशासनाने तुंबत असलेल्या पाण्याचा बंदोबस्त केला नाही तर मुसळधार पावसात त्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.





























