उल्हासनगर दि.८ : ठाणे येथील रमेश परमार कनिष्ठ महाविद्यालय व अभिरुची मंडळ यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे मो.ह.विद्यालय येथे राज्यस्तरीय बोलीभाषा काव्यसंमेलन संपन्न झाले.

जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषद व मराठी बोलीभाषा साहित्य संघ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रायोजित या काव्यसंमेलनात उल्हासनगर येथील साहित्यिक व कवी प्रा.डॉ.प्रकाश माळी सर यांना साहित्य क्षेत्रातील योगदान तसेच काव्यप्रतिभेचा आणि बोलीभाषा जतन व संवर्धनासाठी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री नामदार गणेश नाईक, आमदार निरंजन डावखरे व सुवर्ण महोत्सव समितीचे अध्यक्ष रविंद्र तामरस यांच्या उपस्थितीत मराठी बोलीभाषा अभ्यासक डॉ.बाळकृष्ण लळीत,अहिराणी भाषा अभ्यासक डॉ.बापूसाहेब हटकर व जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे कार्यवाह तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य विकास पाटील यांच्या शुभहस्ते स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे सदस्य वैशाली पाटील व सुनिल पाटील तसेच मो.ह.विद्यालयाचे शिक्षक बंधू-भगिनी,कवी-कवयित्रीमोठ्या संख्येने उपस्थित होते.





























