- बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
( प्रमोद दळवी )
उल्हासनगर दि १९: पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी, शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि सीमेवर सेवा देणाऱ्या जवानांना पाठिंबा देण्यासाठी तसेच ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर उल्हासनगरात शिवसेनेच्या नेतृत्वात देशभक्ती, एकता आणि अभिमानाचा जल्लोष करण्याकरिता उल्हासनगर शिवसेना शहर शाखेच्या वतीने मोठी भव्य तिरंगा बाईक रॅली सोमवारी काढण्यात आली. ही तिरंगा बाईक रॅली उल्हासनगर -५ कैलाश कॉलनी येथून सुरू झाली. त्यानंतर ही रॅली पवई मार्गे, १७ सेक्शन,छत्रपती शिवाजी महाराज चौक , नेहरू चौक,सिरु चौक, १ – नं पोलीस स्टेशन मार्ग बिर्ला गेट निलकंटेश्वर मंदिर येथे समाप्त झाली.काढण्यात आलेल्या बाईक रॅलीत मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते.

त्यावेळी महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी संगितले की काही दिवसापूर्वी पहलगाम येथे आपल्या या भारतातील नागरिकांवर पाकिस्तान मधील अतिरेक्यांनी गोळीबार करून त्यांना ठार केले होते . त्याचा निषेध म्हणून देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिल आणि त्या उत्तरामधून पाकिस्तान सळो की पळो झाला. पाकिस्तानची अवकात पाकिस्तानला कळाली आणि ते कळाल्या नंतर माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जवानांनी जो काही हमला करुन पाकिस्तानी अतिरेक्यांचा खात्मा केला. त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रभर सर्व शहरांमध्ये शूरवीर जवानांसाठी त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी त्यांचं ध्येय वाढवण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ही आज बाईक रॅली पूर्ण महाराष्ट्रभर काढण्यात आली.

उल्हासनगर मध्ये देखील हि तिरंगा बाईक रॅली कैलास कॉलनी चौक उल्हासनगर – ५ ते बिर्ला गेट निळकंठेश्वर मंदिर उल्हासनगर -१ पर्यंत काढण्यात आली .भारतीय जवानांचे मनोबल वाढवण्यासाठी, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी, व भारत देशाकडे वाकडया नजरेने कोणी पाहिले तर त्याची परिस्थिती अशी होईल हे दाखवणाऱ्या आपल्या भारतीय जवानांनी पाकिस्तानवर हमला करून आपल्या देशाचे रक्षण केले आणि आपला भारत देश काय आहे ते दाखवले. त्याबद्दल त्या जवानांचे मनोबल वाढवण्यासाठी रॅली होती.असे महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी म्हणाले .

त्यावेळी अरुण आशान यांनी देखील आपले मत व्यक्त केले .या तिरंगा बाईक रॅलीमध्ये शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरुण अशान, दिलीप गायकवाड, महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी ,शिवसेना शहर प्रमुख राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज), रमेश चव्हाण, उपशहर प्रमुख सुरेश सोनवणे, जितू उपाध्याय , संदिप गायकवाड ,ज्ञानेश्वर मरसाळे, कल्याण लोकसभा सचिव तिरुपती रेड्डी, युवासेना लोकसभा सचिव हरजिंदरसिंह भुल्लर, महिला शहर संगठक सौ मनीषा भानुशाली, उत्तर भारतीय शहर संगठक के.डी. तिवारी, माजी नगरसेवक कलवंत सिंह सोहता, जयकुमार केणी,वासेना उपजिल्हाधिकारी युवराज पाटील, युवासेना शहर अधिकारी सुशील पवार, उपस्थिती लावली.तसेच यावेळी सर्व विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख,शिवसेना, युवा सेना, व महिला आघाडीचे पदाधिकारी ,ज्येष्ठ नागरिक, तरुण आणि देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने रैली मध्ये सहभागी झाले होते. ही रॅली एकतेचा आणि देशप्रेमाचा संदेश देणारी होती. शहीद जवानांच्या बलिदानाला मान देत आणि सध्या देशासाठी लढणाऱ्या जवानांना पाठिंबा देणारी ही रॅली प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेम जागवत गेली.






























