Homeशहरउल्हासनगरातील समता नगर येथे मॅनहोलमध्ये मनुष्य उतरवून गटार साफसफाई ; स्वराज्य संघटनेची...

उल्हासनगरातील समता नगर येथे मॅनहोलमध्ये मनुष्य उतरवून गटार साफसफाई ; स्वराज्य संघटनेची आयुक्तांकडे तक्रार, दोषींवर कठोर कारवाईची मागणी

उल्हासनगर दि. ३० ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत उल्हासनगर-४ येथील समता नगर परिसरात मॅनहोलमध्ये प्रत्यक्ष स्वच्छता कर्मचाऱ्याला उतरवून गटार साफसफाई करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २९ जुलै २०२६ रोजी घडलेल्या या प्रकारामुळे महानगरपालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, मानवी जीवाशी खेळ करणाऱ्या या घटनेविरोधात स्वराज्य संघटनेने तीव्र संताप व्यक्त केला आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत स्वराज्य संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष ॲड. जय गायकवाड यांनी उल्हासनगर महानगरपालिका आयुक्तांकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. संबंधित अधिकारी, कंत्राटदार आणि या प्रकारासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींवर तात्काळ चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार, “The Prohibition of Employment as Manual Scavengers and their Rehabilitation Act, 2013” या केंद्रीय कायद्यानुसार मॅनहोलमध्ये मनुष्य उतरवून साफसफाई करण्यास स्पष्टपणे बंदी आहे. आवश्यक सुरक्षासाहित्य, यांत्रिक उपकरणे आणि सुरक्षा नियमांचे पालन न करता अशा प्रकारे काम करून घेणे हे केवळ कायद्याचे उल्लंघन नसून संबंधित कर्मचाऱ्याच्या जीवाला धोका निर्माण करणारे कृत्य आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना ॲड. जय गायकवाड म्हणाले की, भारतातील दलित समाजाला शतकानुशतके जातीच्या आधारावर अशा अमानवी आणि अपमानास्पद कामांमध्ये ढकलण्यात आले. सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्यांचा पुरस्कार करणाऱ्या देशात आजही अशा घटना घडत असतील, तर तो केवळ प्रशासकीय निष्काळजीपणा नसून जातीय शोषणाच्या मानसिकतेचेही द्योतक आहे. अशा प्रकारांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घालता येणार नाही.

स्वराज्य संघटनेने आपल्या तक्रारीत भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी महानगरपालिकेने सर्व गटार व मॅनहोल साफसफाईची कामे आधुनिक यांत्रिक साधनांद्वारेच करण्याची सक्ती करावी, तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सुरक्षा उपकरणे, प्रशिक्षण आणि मानक कार्यपद्धतीची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणीही केली आहे. दरम्यान, या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास किंवा भविष्यातही अशाच प्रकारे अमानवी पद्धतीने स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून काम करून घेतल्यास स्वराज्य संघटना संविधानिक आणि लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही ॲड. जय गायकवाड यांनी दिला आहे. मानवी प्रतिष्ठा, सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्यांशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. या घटनेमुळे उल्हासनगर महानगरपालिकेच्या स्वच्छता व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत असून, प्रशासन या गंभीर प्रकरणात कोणती भूमिका घेते आणि दोषींवर काय कारवाई करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 

 

 

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांची मनपा शाळा क्र. २४ ला भेट; ‘घे भरारी’...

उल्हासनगर दि. ३० ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त श्रीम. मनिषा आव्हाळे (भा.प्र.से.) यांनी  गुरवारी दि. ३० जुलै रोजी महानगरपालिकेच्या 'घे भरारी'...

समाजप्रबोधनाचा वारसा जपणारे अभिनेते महेश्वर तेटांबे यांना ‘महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार २०२६’ देऊन सन्मानित

मुंबई दि.३० ( प्रमोद दळवी )  : आपल्या प्रभावी अभिनयातून, सामाजिक आशयपूर्ण लेखणीतून आणि निरपेक्ष समाजसेवेतून समाजप्रबोधनाचा वारसा जपणारे प्रसिद्ध सिने-नाट्य अभिनेते, लेखक व...

‘हे आमचे मंदिर आहे’: दिल्लीतील पर्यटकांना महाराष्ट्राच्या लोहगड किल्ल्यावर धुम्रपान करण्यासाठी स्थानिकाने शिकविले

पुणे: महाराष्ट्राच्या ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावरील व्हायरल झालेल्या व्हिडिओने संरक्षित वारसा स्थळांवर पर्यटकांच्या वर्तनावर पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे.या क्लिपमध्ये किल्ल्याच्या तटबंदीवर...

बदलापूरात ‘लाडक्या खड्ड्याचा’ तिसरा वाढदिवस साजरा करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनोखे आंदोलन

बदलापूर दि.३० ( प्रमोद दळवी )  : बदलापूर शहरातील रस्त्यांवरील वाढत्या खड्ड्यांच्या समस्येविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) आणि महाविकास आघाडीच्या वतीने गुरुवारी अनोखे...

अंबरनाथमधील उड्डाणपुलावरील खड्ड्यांविरोधात नागरिकांचा अनोखा एल्गार; खड्ड्यांमध्ये कागदी होड्या सोडून आंदोलन, चार दिवसांत दुरुस्तीची...

अंबरनाथ दि.३० ( प्रमोद दळवी )  : अंबरनाथ शहरातील उड्डाणपुलावरील जीवघेण्या खड्ड्यांविरोधात नागरिकांचा संताप आता रस्त्यावर उतरला आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी खड्ड्यांमध्ये कागदी होड्या सोडत...

उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांची मनपा शाळा क्र. २४ ला भेट; ‘घे भरारी’...

उल्हासनगर दि. ३० ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त श्रीम. मनिषा आव्हाळे (भा.प्र.से.) यांनी  गुरवारी दि. ३० जुलै रोजी महानगरपालिकेच्या 'घे भरारी'...

समाजप्रबोधनाचा वारसा जपणारे अभिनेते महेश्वर तेटांबे यांना ‘महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार २०२६’ देऊन सन्मानित

मुंबई दि.३० ( प्रमोद दळवी )  : आपल्या प्रभावी अभिनयातून, सामाजिक आशयपूर्ण लेखणीतून आणि निरपेक्ष समाजसेवेतून समाजप्रबोधनाचा वारसा जपणारे प्रसिद्ध सिने-नाट्य अभिनेते, लेखक व...

‘हे आमचे मंदिर आहे’: दिल्लीतील पर्यटकांना महाराष्ट्राच्या लोहगड किल्ल्यावर धुम्रपान करण्यासाठी स्थानिकाने शिकविले

पुणे: महाराष्ट्राच्या ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावरील व्हायरल झालेल्या व्हिडिओने संरक्षित वारसा स्थळांवर पर्यटकांच्या वर्तनावर पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे.या क्लिपमध्ये किल्ल्याच्या तटबंदीवर...

बदलापूरात ‘लाडक्या खड्ड्याचा’ तिसरा वाढदिवस साजरा करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनोखे आंदोलन

बदलापूर दि.३० ( प्रमोद दळवी )  : बदलापूर शहरातील रस्त्यांवरील वाढत्या खड्ड्यांच्या समस्येविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) आणि महाविकास आघाडीच्या वतीने गुरुवारी अनोखे...

अंबरनाथमधील उड्डाणपुलावरील खड्ड्यांविरोधात नागरिकांचा अनोखा एल्गार; खड्ड्यांमध्ये कागदी होड्या सोडून आंदोलन, चार दिवसांत दुरुस्तीची...

अंबरनाथ दि.३० ( प्रमोद दळवी )  : अंबरनाथ शहरातील उड्डाणपुलावरील जीवघेण्या खड्ड्यांविरोधात नागरिकांचा संताप आता रस्त्यावर उतरला आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी खड्ड्यांमध्ये कागदी होड्या सोडत...
error: Content is protected !!