उल्हासनगर दि. ३१ ( प्रमोद दळवी ) : बारामतीतील विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात दुःखाचे वातावरण पसरलेले आहे. दादांच्या आठवणीने अनेक जण आजही कंठ दाटून रडत आहेत. आपल्या लाडक्या दादांना सर्वपक्षीय आदरांजली देण्यासाठी उल्हासनगरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष भरत राजवानी ( गंगोत्री) यांनी सर्वपक्षीय आदरांजली सभा शनिवारी सायंकाळी सपना गार्डन परिसरातील सिंधू भवन येथे आयोजित केली होती. या शोकसभेत अजित पवार यांना आदरांजली देताना व त्यांच्या काही आठवणी सांगताना जिल्हाध्यक्ष भरत गंगोत्री व सरचिटणीस सोनिया धामी यांचा कंठ दाटून आला. याशिवाय डोळ्यातून अश्रूचा धारावाहत त्यांनी लाडक्या दादांना आदरांजली अर्पण केली.

भरत गंगोत्री यांनी अजित पवार यांच्या संदर्भात बोलताना ते खूपच भावुक झाले होते. त्यामुळे त्यांनी मी जास्त बोलू शिकणार नाही इतकंच सांगेन की मी जे काही आज आहे ते दादांच्या आशीर्वादामुळे ज्यांच्यामुळेच मी आज या राजकारणात इथपर्यंत पोहोचू शकलो. दादा आमची ताकद होती त्यांचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी होते. असे बोलत त्यांनी दादांना श्रद्धांजली अर्पित केली.
या सर्वपक्षीय आदरांजली सभेत, जिल्हा अध्यक्ष भारत गंगोत्री / सरचिटणीस सोनिया धाम, आमदार कुमार आयलानी, नगरसेवक राजेंद्र चौधरी, अरुण आशान, मनसे अध्यक्ष बंडू देशमुख, किरण सोनवणे प्रदेश प्रवक्ता ( शिंदे सेना ), माझी नगरसेवक मनोज लासी, राजु जग्याशी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. जयराम लुल्ला यांनी आपल्या भावना व्यक्त करताना अजितदादा पवार यांनी या शहरासाठी खुप केले म्हणून त्यांचा शहरात पुतळा बसावा असे मत व्यक्त केले. यावेळी माझी आमदार पप्पू कलानी सह शहरातील आजी माझी नगरसेवक, पत्रकार, समाजसेवक मोठया संख्येने उपस्थिती होते





























