( प्रमोद दळवी )
उल्हासनगर दि.२८ : उल्हासनगरात राहणारे वामदेव भोयर, व सौ सुनंदा भोयर यांनी संविधानाचा विचार प्रत्येकापर्यंत पोहोचण्यासाठी संविधान जागर अभियानाचा कार्यक्रम रविवारी दिनांक २७ एप्रिल २०२५ रोजी आयोजित केला होता. या कार्यक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला, अनेक विचारवंतांनी या अभियानामध्ये सहभाग नोंदवला व सक्रिय काम करण्याचा निर्धार केला.
संविधानाचे रक्षण म्हणजे तुमच्या माझ्या जगण्याच्या अधिकाराचे रक्षण! संविधानाचे पालन करणे हीच खरी देशभक्ती! चला,संविधान सर्वांचे आहे ‘ हे प्रत्येकाला सांगूया. संविधानाचा विचार घराघरात पोचवूया. सर्वांशी प्रेमाने आपुलकीने वागूया, भीती व द्वेषाला दूर सारूया. आपले कुटुंबीय व मित्रांसोबत संविधानाच्या ७५ वर्षाचा आनंद साजरा करूया. संविधानाचा विचार प्रत्येकांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘’ संविधान जागर अभियान ” सुरू करण्यात आले आहे. उल्हासनगरातील रहिवासी वामदेव भोयर व सुनंदा भोयर यांनी संविधान घराघरात कसे पोहोचवता येईल, याकरिता वैचारिक लोकांची बैठक बोलून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या संविधान जागर अभियानामध्ये श्री निश्चय साक्षात साधना यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.
संविधान घरोघरी पोहोचण्याची आखणी या कार्यक्रमात करण्यात आली. श्री निश्चय साक्षात साधना,नारायण भगत,राजेंद्र भालेराव ,यशवंत बसेशंकर,गौतम जाधव,भीमराज भगत,राजेश चंद्रागडे ,सुनंदा भोयर,वामदेव भोयर ,अरुणा सोनावणे,वंदना इंगळे ,संगीता साळवे,सुनील सोनवणे,राजेंद्र तोरणे,रवींद्र धांडे ,यशवंत भाई रणशेवरे या विचारवंतांनी भाग घेतला व सक्रिय काम करण्याचा निर्धार केला.





























