अंबरनाथ दि. १ ( प्रमोद दळवी ) : माय भारत युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार, यशदा महाराष्ट्र शासन व युनिसेफ यांच्या सहयोगाने व द युवा यूनिटी फाउंडेशन तर्फे आयोजित युवा जलदिंडी अभियान ५ दिवसीय निवासी शिबीर व जल संवर्धनासाठी युवक व समुदायाचा सहभाग शिबिर १ जून २०२६ ते ५ जून २०२६ पर्यंत अंबरनाथ नगरपरिषद शाळा क्रमांक १० , पालेगाव, अंबरनाथ पूर्व येथे सोमवार पासून शिबिरची सुरु करण्यात आले.
शशिकांत दायमा ( वालधुनी जल बिरादरी), सौ. मनीषा शर्मा,( जिल्हा युवा अधिकारी), जिल्हा ठाणे माय भारत युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार, इंडियन सोशल मुवमेंटचे संस्थापक आनंदा होवाळ, मिरा सपकाळे, योगेश चलवादी, पत्रकार अजय शर्मा व शितल मोरे यांचे उपस्थितित शिबिराची सुरुवात झाली.
येत्या ५ दिवसांत युवा जलदिंडी द्वारे अंबरनाथ येथील कॉलेजच्या ५० युवक युवतींची पदयात्रा, वृक्षारोपण, जलसंवर्धन बाबत जनजागृती, पथनाट्य सादरीकरण, पर्यावरण संवर्धन बाबत जनजागृती, ग्राम सर्वेक्षण, वृक्षारोपण, सायकल रॅली उपक्रम राबवले जातील, ५ जून जागतिक पर्यावरण दिनी पर्यावरण प्रेमी सोबत चर्चात्मक कार्यशाळा आयोजित करुन शिबिराचे समारोप करण्यात येईल अशी माहिती शशिकांत दायमा यांनी दिली.





























