उल्हासनगर दि १७ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर रेल्वे स्टेशन येथून ठाकुर्लीला प्रवासी भाडे सोडून येत असताना ठाकुरली परिसरात रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या खाजगी बसला रिक्षाची धडक लागल्याने रिक्षाच्या पुढच्या काचा मानेत घुसल्याने उल्हासनगरातील रिक्षा चालकाचा मृत्यू झाल्याची दुखत घटना घडल्याने सुभाष टेकडीतील सर्व रिक्षा चालकांमध्ये दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अपघातात मयत झालेल्या त्या दुर्दैवी रिक्षा चालकाचे नाव विकास उर्फ विकी प्रेमनाथ गाडे (४५) असे आहे. ते उल्हासनगरातील सुभाष टेकडी परिसरातील साईबाबा नगर येथे राहत होते. विकास हे रिक्षा चालक होते. ते सामाजिक कार्यात अग्रेसर होते. याशिवाय दलित पॅंथरचे उल्हासनगर शहर अध्यक्ष होते. विकास यांनी गुरुवारी रात्री दीडच्या सुमारास उल्हास स्टेशन येथून ठाकुर्लीचा भाड भरलं होतं. त्या प्रवाशाला ठाकुर्लीला सोडून ते उल्हासनगरला परत येत होते. त्यावेळी त्यांच्या रिक्षात त्यांचा मित्र शैलेश हा देखील मागे बसला होता. ठाकुरली परिसरात ९५ फीट रोडवर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका खाजगी बसला त्यांच्या रिक्षाची मागून जोरात धडक बसली. त्यावेळी रिक्षाच्या पुढच्या काचा तुटून विकासच्या मानेत शिरल्या. अति रक्तस्त्राव झाल्यामुळे विकास यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात शैलेशला देखील मुका मार लागला आहे.

रिक्षा चालक विकास गाडे याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कळताच उल्हासनगरातील सुभाष टेकडी मधील रिक्षा चालकांमध्ये दुःखाचे वातावरण पसरले. या दुखत घटनेचा सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे . विकास गाडे यांच्या काढण्यात आलेल्या अंत्ययात्रेत विविध क्षेत्रातील मंडळी, सर्व रिक्षा चालक, विकास यांची मित्रमंडळी, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहीद मारोतीराव दगडू जाधव रिक्षा चालक-मालक संघटनेच्या वतीने विकास यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विकास गाडे यांच्या पश्चात त्यांची पत्नी मुले असा परिवार आहे. विकास यांचा अचानक घडलेल्या या अपघाती निधनामुळे सुभाष टेकडीतील रिक्षा चालकांमध्ये दुःख व्यक्त करण्यात येत आहे. विकास हे सुभाष टेकडीतील जुने जाणते रिक्षा चालक होते.





























