उल्हासनगर दि.२६ : सध्या शहरात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.याचं करणं शहरातील अरुंद रस्ते एवढंच नसून सध्या वाहन पार्किंगची समस्या मोठया प्रमाणात निर्माण झाली आहे. उल्हासनगर शहरात मोठी बाजारपेठ आहे असे असतांना महापालिकेच्या मालकीच एकही वाहनतळ उपलब्ध नाही. नवीन विकास आराखडा मध्ये साईट नंबर १०९ एसएम नंबर १८० हा भूखंड महापालिकेचे वाहनतळ उभारण्यासाठी (पार्किंग) आरक्षित ठेवण्यात आला आहे. आणि याच ठिकाणी उल्हासनगरची सर्वात मोठी फर्निचरची बाजारपेठ असून या बाजार पेठेत दररोज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक फर्निचर खरेदीसाठी येत असतात तसेच काही अंतरावर गजानन मार्केट सारखे कपठ्याची भव्य बाजारपेठ सुद्धा आहे बाजूला मध्यवर्ती रुग्णालय व शासकीय कार्यालय फर्निचर मार्केट नेहरू चौक असे अनेक ठिकाण आहेत सणासुदीच्या काळात याठिकाणी नागरिकांची खरेदीसाठी प्रचंड गर्दी होते. परंतु या परिसरात वाहनतळ नसल्याने तोकांना खूप मानसिक त्रास सहन करावा लागतो.

एक खासगी वाहनतळ आहे परंतु तेथे जागा अपुरी पडते म्हणून लोक रस्त्यावर गाड्या पार्क करतात. त्यामुळे या विभागात सातत्याने वाहतूक कोंडी होत असते. महानगरपालिकेच्या वतीने या आरक्षित भूखंडावर बहुमजली वाहनतळ म्हणजेच पार्किंग उभारल्यास या विभागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा मार्गी लागून महापालिकेसही उत्पन्नाचे साधन उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे या आरक्षित भूखंडावर लवकरात लवकर वाहन तळ उभारण्यात यावं अशी मागणी जिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख व शहर अध्यक्ष संजय घुगे यांनी पालिका आयुक्त मनिषा आयवळे यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.





























