उल्हासनगर दि.२६ ( प्रमोद दळवी ) : दर सालाबदाप्रमाणे यावर्षी देखील उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर अशा अनेक ठिकाणी माघी गणेश उत्सव निमित्त गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सोमवारी मोठ्या उत्साहात नाचत गाजत पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले.
उल्हासनगरातील कॅम्प नंबर -४ परिसरातील सुभाष टेकडी येथील अशोक वन कॉलनीत राहणारे जुने रहिवाशी सुलोचना दळवी यांच्या निवासस्थानी माघी गणेश उत्सव निमित्त पाच दिवसाच्या गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली होती. दरवर्षी दळवी कुटुंब मोठ्या उत्साहात माघी गणेश उत्सव साजरा करत असते. सोमवारी पाच दिवसाच्या गणरायाचे नाचत गाजत व भाविकांना प्रसाद वाटप करत पाचवा मैल येथील उल्हास नदीत गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.या गणेशोत्सवात दळवी कुटुंब, शेलार कुटुंब, चव्हाण कुटुंब, जोशी कुटुंब, नाईक कुटुंब, गांगुर्डे कुटुंब, पाटील कुटुंब, तायडे कुटुंब, मोरे कुटुंब सहभागी होऊन माघी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.





























