- बैठकीत अनेक विषयांवर चर्चा
उल्हासनगर दि १८ : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली टिळक भवन दादर मुंबई या ठिकाणी उल्हासनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

प्रदेश उपाध्यक्ष एडवोकेट गणेश पाटील ,नांदेड लोकसभेचे खासदार रवींद्र चव्हाण तथा उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष रोहित साळवे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. या बैठकीत उल्हासनगर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आपले मत मांडले व आगामी निवडणुकी संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ बोलताना म्हणाले की प्रत्येक कार्यकर्त्यांनी जनसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तळागाळापासून कामाला सुरुवात करावी उल्हासनगर म्हणजे समस्याच्या माहेरघर आहे. उल्हासनगर शहरातील नागरिक हे तेथील सत्ताधाऱ्यांना कंटाळलेले आहेत .

अशा स्थितीत काँग्रेसने आपले ठळकपणे भूमिका निभवावी व जनतेच्या सोबत उभे राहावे. यावेळी अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उल्हासनगर काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले. या बैठकीला जिल्हाध्यक्ष रोहित साळवे ह्यांनी येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत निर्णायक सदस्य निवडून आणण्या संदर्भातील रणनीती प्रांत अध्यक्ष समोर मांडली. सदर बैठकीला काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेविका अंजलीताई साळवे, ब्लॉक अध्यक्ष किशोर धडके,नानिक आहुजा , सुनील बहराणी, मनीषा महाकाळे, प्राध्यापक सिंधुताई रामटेके, जिल्हा उपाध्यक्ष श्याम मढवी, महादेव शेलार, राजेश फक्के, कुलदीप आयलशिंगानी,जिल्हा महासचिव दिपक सोनोने, फमिदा सय्यद, युवराज पगारे ,डॉ धीरज पटोले, डॉ हितेश सचवानी,वामदेव भोयर ,चिराग फक्के, आबासाहेब साठे, निलेश जाधव,अनिल यादव, ईश्वर जग्याशी, पवन मीराणी, उषा गिरी, विद्या शर्मा, समाधान खरे आदि पदाधिकारी उपस्थित होते.
सदर बैठकी नंतर उल्हासनगर कांग्रेस शिष्ट मंडळाने मा प्रांतद्ज्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ह्यांना उल्हासनगर शहरातील २०२२ पूर्वीचे सर्व बांधकामे रेग्युलराइज करण्या संदर्भातील प्रश्न येणाऱ्या अधिवेशनात कांग्रेस पक्षाच्या आमदारान मार्फत घेण्याचे निवेदन दिले.





























