उल्हासनगर दि २२ ( प्रमोद दळवी ) : शिवसेना विभाग प्रमुख सुनील सिंग (कलवा )व समाजसेविका सौ किरण सुनील सिंग ( चिमनानी ) यांनी ब्रह्म भोज या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमाला अनेक ठिकाणाहून जवळपास ६० हून अधिक ब्राह्मण ( पंडितजी ) आले होते. या सर्वांना भोजनदान करून त्यांना भेटवस्तू देण्यात आली. सर्व पंडितांनी मिळून मंत्र तंत्रविद्यांनी सुनील सिंग (कलवा) व किरण चिमनानी यांना आशीर्वाद देत आज पासून जे ही कार्य तुम्ही हातात घ्याल त्यात तुम्ही विजय प्राप्त कराल असा आशीर्वाद दिला. सुनील सिंग ( कलवा ) व समाजसेवक किरण चिमनानी दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करत असतात. पण यावेळी मोठ्या प्रमाणात पंडितजी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

इतकच नव्हे तर सुनील सिंग ( कलवा ) व समाजसेवक किरण चिमनानी हे नेहमी समाज सेवा करत असतात. सध्या निवडणुकीचा काळ आहे. काही लोकांना हा वेगळाच प्रकार वाटू शकतो. पण असं काही नाही आहे दरवर्षी आम्ही असा कार्यक्रम आयोजित करत असतो. यावेळी देखील असाच कार्यक्रम आयोजित केला आहे असे सुनील सिंग ( कलवा ) व समाजसेवक किरण चिमनानीयांनी सांगितले . ब्रह्म भोज कार्यक्रमाला पंडितजींनी चांगला प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवल्याने सुनील सिंग कलवा व किरण चिमना नी यांनी त्यांचे आभार प्रकट केले. मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला. शहरातील दिग्गज नेत्यांनी देखील या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती. त्यात माजी आमदार पप्पू कलानी व उद्योगपती सुमित चक्रवती, सत्यम पुरी , समाजसेवीका मधु जादवानी, ज्योति मोटवानी, लिसा इसरानी, आशा बनसोडे, ज्योति जयसवाल, समाज सेवक रामसूरत यादव, रामकृष्ण यादव, पंकज जयसवाल, धर्मराज यादव, राजकुमार यादव, भान सिंह यादव, मोहन मूलचंदानी, दीपक सेनानी, नीरज मखीजा, मोंटी होनेजा यांच्यासह अनेक जण मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते.





























