- उल्हासनगर कांग्रेस गांधी भवन कार्यालयाचे उद्घाटन व सोबत प्रसिद्ध केले भाजपा – शिवसेना महायुतीच्या प्रशासकीय राजवटीतील भ्रष्टाचाराच्या लेखा जोखा
- उल्हासनगर दि.११ : कल्याण व उल्हासनगर दौऱ्यावर वर असलेले महाराष्ट्र कांग्रेस प्रांत अध्यक्ष श्री हर्षवर्धन सपकाळ ह्यांच्या मार्फत महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ,उल्हासनगर ३ येथील पुनर्निर्मित गांधी भवन सभा गृह व कार्यालयांचे उद्घाटन सोहळा पार पडला.

यावेळी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की काँग्रेस म्हणजे सकाळचं सत्य होणारे गोड स्वप्न आहे जे कधी खोटं ठरत नसते,या देशाला काँग्रेसने घडवलेल आहे या ,शहराला काँग्रेसने बसवलेला आहे आज या शहराची अवस्था राज्यातल्या युती सरकारने काय केलेली आहे ,नेमकं खड्ड्यात रस्ता आहे का खड्ड्यात शहरा हेच करायला मार्ग नाही.उल्हासनगर चे नाव घेतले की लोक नको रे बाबा असे म्हणतात भ्रष्टाचाराने बरबटलेली उल्हासनगर महानगरपालिका यांनी अंध अपंगांच्या छड्या सुद्धा सोडल्या नाहीत ,जे लोक अंध अपंगाला सोडत नाही ते तुम्हा आम्हाला काय सोडतील म्हणून एकदा काँग्रेसला संधी द्या असे मी उल्हासनगरच्या जनतेला आवाहन करतो ,तुम्ही आम्हाला जबाबदारी द्या त्या जबाबदारीतून मागे हटण्याचे काम किंचितही होणार नाही अशी मी तुम्हाला रोहित साळवे यांच्या वतीने ग्वाही देतो असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले

सदर पुनर्निर्मिती उल्हासनगर कांग्रेस अध्यक्ष रोहित साळवे ह्यांच्या प्रयत्नाने व ब्लॉक अध्यक्ष नानिक आहुजा,किशोर धडके, सुनील बेहरानी, प्रवक्ता अशेराम टाक ह्यांच्या सहयोगाने उभारण्यात आले.ह्या उद्घाटन सोहळ्या नंतर भाजपा शिवसेना प्रशासकीय राजवटीतील भ्रष्ट कारभाराचा लेखा जोखा प्रसिद्ध करण्यात आला, ज्या मध्ये प्रामुख्याने दिव्यांगाच्या छडी विक्रीतीतील घोटाळा, टीडीआर वाटपातील महाघोटाळा,टैक्स विभागातील विशेष कंपन्यांना व लोकांना दिलेल्या सवलती मधील गैरव्यवहार, कोणार्क कंपनी द्वारे कचरा उचलण्याच्या व पाणी पुरवठा वितरण ठेक्यातील भ्रष्टाचार,झा पी एंड कंपनीचा विशेषिष्ट राजकीय पाठिंबा मुळे ठेकेदारीतील मक्तेदारी,शहाड येथील महानगरपालिका रुग्णालयातील ठेक्यातील अनियमतता, अश्या अनेक विषयांचा समावेश होता.
लेखा जोखा प्रसिद्धी नंतर उपस्थितांशी बोलताना जिला अध्यक्ष रोहित साळवे ह्यांनी विरोधकां टोला लगावला की उल्हासनगर भाजप हा फक्त आज एक ठेकेदारांची टोळी आहे, आणि येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीसाठी पण ते फक्त महापालिका ठेकेदाराला किव्हा त्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी देण्यासाठी धडपडत आहे, प्रशासनावर आज त्यांचा कसला ही अंकुश नाही म्हणूनच सर्व विभागात प्रचंड भ्रष्टाचार व शहरातील नागरिकांचे मूलभूत समस्यांसाठी देखील हाल झाले आहेत , व उल्हासनगर कांग्रेसचे पदाधिकारी या सत्ताधाऱ्यांचा भ्रष्ट कारभाराचा लेख जोखा जनते पर्यंत नेईल असे रोहित साळवे यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात कांग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते ह्या मध्ये प्रदेश काँग्रस सरचिटणीस एड गणेश पाटील ,उल्हासनगर प्रभारी नवीन सिंह , प्रदेश उपाध्यक्ष राणी अग्रवाल , पप्पू राका, ब्रिज दत्त, कल्याण अध्यक्ष सचिन पोटे ,अंबरनाथ अध्यक्ष प्रदीप पाटील ,माजी नगरसेवक अंजली साळवे ,उमेश पाटील ,मनीषा महाकाली ,कुलदीप ऐलसिंहनी ,शंकर आहुजा ,महादेव शेलार ,अजीज खान ,शाबूधीन खान ,पवन मिरानी, श्याम मढवी, विशाल सोनवणे, दीपक सोनवणे,डॉ हितेश सचवणी ,फरियाद शेख ,रोहित ओव्हाळ ,हरमीत सिंग ,वामदेव भोयर ,बापू पगारे,राजेश फक्के,फामिद सय्यद ,विद्या शर्मा, सिंधू रामटेके,राजकुमारी नारा ,अनिल यादव ,ईश्वर जागियाशी , संतोष मिंडे व अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.





























