उल्हासनगर दि ७ : उल्हासनगर-अंबरनाथ येथे ११ ते २१ ऑगस्ट २०२५ या ११ दिवसांत सव्वा कोटी पार्थिव शिवलिंग निर्माण आणि शिवमहायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात दररोज १२ लाख शिवलिंगांची निर्मिती, पूजन आणि विसर्जन केले जाईल.
या महायज्ञाचे अधिष्ठाता पूज्य बृजेशानंदजी महाराज आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या ५० व्या महायज्ञाची तयारी कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे आणि आयोजक अध्यक्ष संजय गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.११ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता २१०० महिलांची कलश यात्रा निघेल आणि त्यानंतर पूजनाला सुरुवात होईल. महायज्ञ दररोज सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत चालेल. दुपारी ३ ते ५ या वेळेत पूज्य बृजेशानंदजी महाराज संगीतमय शिवमाहात्म्य सांगतील. दररोज सर्व भक्तांसाठी महाप्रसाद आणि भंडाऱ्याचे आयोजनही करण्यात आले आहे.या सोहळ्यात माजी केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपाचे राष्ट्रीय नेते संजय जोशी यांच्यासह अनेक नेते, संत आणि लाखो शिवभक्त सहभागी होणार आहेत. सर्वांनी या अध्यात्मिक सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.





























