Homeशहरविविध नागरिक समस्या सोडविण्यात अपयशी ठरलेल्या उल्हासनगर महापालिका प्रशासनाच्या विरोधात जनआक्रोश आंदोलन

विविध नागरिक समस्या सोडविण्यात अपयशी ठरलेल्या उल्हासनगर महापालिका प्रशासनाच्या विरोधात जनआक्रोश आंदोलन

( प्रमोद दळवी )

उल्हासनगर दि.३० : शहरातील विविध समस्याने नागरिक हैराण झाले आहेत. उल्हासनगर महापालिकेच्या भोंगळ कारभारा विरोधात नागरिकांच्या मनात प्रचंड रोष निर्माण झालेला आहे. शहरातील नागरिकांच्या विविध समस्या महापालिकेच्या निदर्शनास आणण्याकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने ०२  मे रोजी सकाळी ११  वाजता उल्हासनगर महानगरपालिकेसमोर शिवसेना नागरिकांसोबत जन आक्रोश आंदोलन करणार असल्याचा इशारा पालिकेला निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. त्यावेळी महापालिकेच्या प्रशासन अधिकाऱ्यांना सद्बुद्धी येण्यासाठी होम हवन देखील करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांनी दिली आहे.

शहरातील नागरिक विविध समस्याने ग्रासलेले आहेत. त्यात शहरात निर्माण झालेली गंभीर पाणीपुरवठा समस्या, पाणीपट्टी दरामध्ये भरमसाठ वाढ, शहरातील झालेली रस्त्यांची दयनीय अवस्था, शहरात पसरलेले कचऱ्याचे साम्राज्य, कोणार्क कंपनीच्या सफाई कंत्राटदाराकडून साफसफाईकडे होणारे दुर्लक्ष, ठेकेदारास भरमसाठ देयक अदा करूनही व्ही. टी.सी मैदान तीन वर्षापासून अपूर्ण अवस्थेत. तरीही ठेकेदारावर कोणतीही कारवाई नाही, शहरातील गार्डन मैदाने सरकारी जागेवर इत्यादी होणारे अतिक्रमण, शहरातील होत असलेल्या रस्त्याचे व भुयारी गटारांची निष्कृष्ट दर्जाची कामे. शहरातील सार्वजनिक शौचालयांशी झालेले दुरावस्था. आधी समस्यांबाबत प्रशासनाचे लक्षवेधण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने पालिका प्रशासनाच्या विरोधात आक्रोश जन आंदोलन ०२  मे रोजी सकाळी ११  वाजता महापालिकेसमोर आयोजित करण्यात आले आहे.

शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या जनआंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन धनंजय बोडारे यांनी केले आहे. पालिकेला निवेदन दिल्यानंतर धनंजय बोडारे यांनी पत्रकारांना या जनआक्रोश आंदोलनासंदर्भात माहिती दिली त्यावेळी ते म्हणाले गेल्या तीन वर्षापासून या महापालिकेमध्ये प्रशासकीय राजवट आहे. भारतीय जनता पार्टीचं राज्य या राज्यामध्ये या देशांमध्ये असे असताना लोकप्रतिनिधीची निवडणूक गेल्या ३ वर्षांपासून येथे नाही. काही ठिकाणी तर पाच सहा वर्षांपासून नाही. अशा परिस्थितीमध्ये प्रशासकीयांनी लोकांची कामे तातडीने करणे गरजेचे आहे. उलट त्यांना निरंकुश असते सत्ता. पण गेल्या ३ वर्षांपासून या महापालिकेची परिस्थिती बिघडत चालली आहे. येणारा अधिकारी काही काम करत नाही. आमचा हा अनुभव आहे. मागच्या वर्षी पेक्षा या वर्षी समस्या वाढल्या आहेत. अशा दिवसान  दिवस या समस्या वाढतच चालला आहेत.  त्याच्यावर समाधान निघेल की नाही हे सांगता येत नाही. लोकप्रतिनिधी वारंवार अधिकाऱ्यांना फोन करूनही ते उचलत नाही. आयुक्त तर लोकांना भेटत सुद्धा नाही. भेटत असतील ते माहित नाही पण माझा अनुभव आहे. वारंवार भेट मागून सुद्धा आयुक्त भेट देत नाही. आम्ही या समस्यांसाठीच आयुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्न करत असतो. असे धनंजय बोडारे म्हणाले. त्यावेळी धनंजय बोराडे यांनी नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्येचा पाढाच वाचला.

नागरिकांना  विनंती केली की २  तारखेला आपला आक्रोश घरी बसून चालणार नाही. नाहीतर मग आपण काही बोलू शकणार नाही. या महापालिकेला घेरावा घालायचा आहे. त्या  ठिकाणी धरणे द्यायचे आहे. या प्रशासनातील मग शासनातील असतील प्रशासनातील असतील लोकांना सद्बुद्धी येण्यासाठी आम्ही होम हवन करणार आहोत सर्वांना विनंती करतो याच्यातून आहुती द्या. आणि या प्रशासनाला जागे करूया, प्रचंड जन आक्रोश महापालिकेसमोर दाखवा. त्याशिवाय हे अधिकारी जागे होणार नाही असे धनंजय बोडारे  म्हणाले त्यावेळी  कल्याण उपजिल्हाप्रमुख राजेंद्र शाहू, भीमसेन मोरे, दिलीप मिश्रा, आदिनाथ पालवे, राजू माने, शिवाजी जावळे, सुरेश पाटील, कुलविंदरसिंह बैस, आधी उपस्थित होते

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मानहानीच्या खटल्यात मुंबईतील विकासकाला मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला आहे

एसडी कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड आणि म्हाडा पुनर्विकास प्रकल्पाला लक्ष्य करणाऱ्या कथित बदनामीकारक सोशल मीडिया पोस्ट, व्हिडिओ आणि संदेश पुढील सुनावणीपर्यंत प्रसारित करू नयेत,...

कायदेशीर नोटीस AITA आणि DLTA च्या निष्कासनासाठी कॉल करते

पुणे: अडचणीत सापडलेल्या ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (एआयटीए) आणि दिल्ली लॉन टेनिस असोसिएशनला मंगळवारी दिल्लीच्या भूमी आणि विकास अधिकारी (एल अँड डीओ)...

CWG 2026: गुलवीर सिंगने इतिहास रचला, पुरुषांच्या 10,000 मीटरमध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला

मंगळवार, 28 जुलै 2026 रोजी, ग्लासगो, स्कॉटलंड येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 10,000 मीटरच्या अंतिम फेरीत भारताच्या गुलवीर सिंगने अंतिम रेषा ओलांडून...

हेन्री फोर्ड कोट: हेन्री फोर्डचे दिवसाचे कोट: “जेव्हा सर्वकाही तुमच्या विरुद्ध चालले आहे असे...

पर्यटकांसाठी, प्रवासाची कल्पना बऱ्याचदा चित्र-परिपूर्ण किनारे, लक्झरी रिसॉर्ट्स आणि Instagram-योग्य क्षणांचा संग्रह म्हणून विकली जाते. पण उत्साही प्रवाशांसाठी, ज्यांनी पुरेसा प्रवास केला...

जपानी कंपन्या परदेशी नोकरीच्या संधींसाठी AISSMS अभियांत्रिकी विद्यार्थ्यांशी संलग्न आहेत

एआयएसएसएमएस येथे आयोजित जागतिक करिअरच्या उभारणीवर अभिमुखता कार्यक्रम पुणे : जपानमध्ये कुशल अभियंत्यांची मागणी सतत वाढत असल्याने जपानी उद्योगातील एका शिष्टमंडळाने अलीकडेच AISSMS...

मानहानीच्या खटल्यात मुंबईतील विकासकाला मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला आहे

एसडी कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड आणि म्हाडा पुनर्विकास प्रकल्पाला लक्ष्य करणाऱ्या कथित बदनामीकारक सोशल मीडिया पोस्ट, व्हिडिओ आणि संदेश पुढील सुनावणीपर्यंत प्रसारित करू नयेत,...

कायदेशीर नोटीस AITA आणि DLTA च्या निष्कासनासाठी कॉल करते

पुणे: अडचणीत सापडलेल्या ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (एआयटीए) आणि दिल्ली लॉन टेनिस असोसिएशनला मंगळवारी दिल्लीच्या भूमी आणि विकास अधिकारी (एल अँड डीओ)...

CWG 2026: गुलवीर सिंगने इतिहास रचला, पुरुषांच्या 10,000 मीटरमध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला

मंगळवार, 28 जुलै 2026 रोजी, ग्लासगो, स्कॉटलंड येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 10,000 मीटरच्या अंतिम फेरीत भारताच्या गुलवीर सिंगने अंतिम रेषा ओलांडून...

हेन्री फोर्ड कोट: हेन्री फोर्डचे दिवसाचे कोट: “जेव्हा सर्वकाही तुमच्या विरुद्ध चालले आहे असे...

पर्यटकांसाठी, प्रवासाची कल्पना बऱ्याचदा चित्र-परिपूर्ण किनारे, लक्झरी रिसॉर्ट्स आणि Instagram-योग्य क्षणांचा संग्रह म्हणून विकली जाते. पण उत्साही प्रवाशांसाठी, ज्यांनी पुरेसा प्रवास केला...

जपानी कंपन्या परदेशी नोकरीच्या संधींसाठी AISSMS अभियांत्रिकी विद्यार्थ्यांशी संलग्न आहेत

एआयएसएसएमएस येथे आयोजित जागतिक करिअरच्या उभारणीवर अभिमुखता कार्यक्रम पुणे : जपानमध्ये कुशल अभियंत्यांची मागणी सतत वाढत असल्याने जपानी उद्योगातील एका शिष्टमंडळाने अलीकडेच AISSMS...
error: Content is protected !!