Homeशहरनिर्माण मजदूर संघटनेच्या वतीने सुभाष टेकडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या...

निर्माण मजदूर संघटनेच्या वतीने सुभाष टेकडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती महोत्सव निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

उल्हासनगर दि. १९ ( प्रमोद दळवी ) : निर्माण मजदूर संघटना (रजि) सुभाष टेकडी बांधकाम कामगार नाका यांच्या विदमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५  व्या जयंती महोत्सव निमित्त दोन दिवस सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

१४  एप्रिल २०२६  रोजी प.पू डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी सकाळी ११ वाजता सुभाष टेकडीतील सिद्धार्थ स्नेह मंडळाच्या मैदानातील स्टेजवर बाबासाहेबांच्या फोटोची पूजा करून त्रिसरण पंचशील घेण्यात आले. त्यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या कामगार मंडळींना तसेच भीम अनुयायींना अल्प उपहार देण्यात आला. दिनांक १५ एप्रिल २०२६  रोजी जयंतीनिमित्त नाका कामगारांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मोठ्या संख्येने कामगारांनी विशेषतः महिला वर्गांनी या स्पर्धेत भाग घेतले. अत्यंत उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. १६  एप्रिल २०२६  रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत महिला लेझीम पथकाने अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सादर केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मधुकांत पाथारिया ( संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य निर्माण मजदूर संघटना) , नाना अहिरे (कार्याध्यक्ष निर्माण मजदूर संघटना महाराष्ट्र राज्य) , मदन केदारे (महासचिव महाराष्ट्र राज्य),  लक्ष्मी नाईक (महिला अध्यक्ष महाराष्ट्र राज्य) , संदेश सकपाळ ( डॉ. बी आर आंबेडकर फोर्स संस्थापक अध्यक्ष), प्रमोद दळवी (दैनिक जिल्हा टाइम्स वृत्तपत्र संपादक )  हे उपस्थित होते. सर्वप्रथम प्रमुख उपस्थितीत मान्यवर मंडळींचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर मान्यवर मंडळींच्या हस्ते विविध खेळांमध्ये विजयी झालेल्या स्पर्धकाला ट्रॉफी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

उपस्थित मान्यवर मंडळींनी जयंतीनिमित्त आपल्या भाषणातून निर्माण मजदूर संघटनेच्या कामगिरीचे कौतुक केले. ही संघटना अधिक बळकट करण्यासाठी सर्व कामगारांनी एकजुटीने काम करण्याचा संदेश मधुकांत पाथारिया यांनी दिला. तसेच लक्ष्मी नाईक यांनी कार्यक्रमाला उपस्थित कामगार महिलांना शासनाच्या उपयोजना व कामगारांना त्याचे होणारे फायदे, याबाबत सविस्तर माहिती दिली, संदेश सफकाळ व प्रमोद दळवी यांनी देखील आपल्या भाषणात निर्माण मजदूर संघटनेच्या कार्याचे कौतुक केले. या कार्यक्रमाला निर्माण मजदूर संघटनेचे सुभाष टेकडी कामगार नाक्याचे अध्यक्ष रमेश पंडित आखाडे, महिला अध्यक्ष मीनाक्षी नाना अहिरे, उपाध्यक्ष राजेंद्र भिमराव कदम, खजिनदार कैलाश पळसपगार, प्रचार प्रमुख सिद्धेश्वर पवार, सल्लागार नारायण अहिरे, शारदा चौधरी, निर्मला खैरे, ईश्वरा सैंदाणे, दिपाली बोरसे, दर्शना केदार, रत्‍नाबाई हयाळगे, आरती चव्हाण, रोहिणी सोनवणे, संगीता सोनवणे, महानंदा इंगळे, हिरामण पट्टेकर, दिलीप शिरसाट यांनी या कार्यक्रमात  मोलाचे सहकार्य केले.

निर्माण मजदूर  संघटना तर्फे सर्व कामगारांचे त्यावेळी आभार प्रकट करण्यात आले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५  व्या जयंती महोत्सव निमित्त फक्त कामगारांसाठी या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य नाना अहिरे, सुभाष टेकडी नाका कामगार अध्यक्ष रमेश आखाडे यांनी केले होते. निर्माण मजदूर संघटनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्य पार पाडला. या कार्यक्रमाला कामगार मंडळींचा उत्कृष्ट प्रतिसाद लाभला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ब्रह्मांड, ठाणे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात आणि...

ठाणे दि १९ : दिनांक १३ रोजी रात्री साडेअकरा वाजता आतिषबाजी करून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार...

IPL 2026: जोफ्रा आर्चरने KKR विरुद्ध इतिहास रचला, फक्त दुसरा गोलंदाज ठरला…

जोफ्रा आर्चरने दुस-या डावातील पहिल्या चेंडूवर फटकेबाजी करत रविवारी ईडन गार्डन्सवर कोलकाता नाइट रायडर्स (KKR) विरुद्ध राजस्थान रॉयल्सच्या IPL 2026 सामन्यात मोहम्मद...

सुंदर इंडो-अरबी आणि पर्शियन बाळाची नावे भारतीय कुटुंबांमध्ये शांतपणे वापरली जातात

बाळाची नावे अनेकदा शांतपणे पसरतात, जास्त लक्ष न देता. आजी-आजोबांच्या माध्यमातून, जुन्या कवितांची पुस्तके, कौटुंबिक कथा, तर कधी फक्त आवाजातून. बऱ्याच भारतीय घरांमध्ये, इंडो-अरबी...

एनसीडब्ल्यूने परतवाडा प्रकरणातील आरोपींवर कठोर आरोपांची मागणी केली आहे

पुणे: राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) अधिकाऱ्यांना अमरावतीमधील परतवाडा प्रकरणाच्या संदर्भात फॉरेन्सिक विश्लेषण जलदगतीने करण्याचे आणि दर पाच दिवसांनी प्रगती अहवाल सादर करण्याचे...

महाराष्ट्राच्या रेल्वे स्थानकावर माणूस गॅन्ट्रीवर चढला, हाय-टेन्शन वायरमधून लटकला; सेवा 40 मिनिटे दाबली

मुंबई: महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील मनमाड रेल्वे स्थानकावर एका मतिमंद व्यक्तीने गॅन्ट्रीवर चढून उच्च-टेंशन ओव्हरहेड वायर्समधून लटकले, ज्यामुळे अधिकाऱ्यांना वीज बंद करण्यास भाग...

ब्रह्मांड, ठाणे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात आणि...

ठाणे दि १९ : दिनांक १३ रोजी रात्री साडेअकरा वाजता आतिषबाजी करून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार...

IPL 2026: जोफ्रा आर्चरने KKR विरुद्ध इतिहास रचला, फक्त दुसरा गोलंदाज ठरला…

जोफ्रा आर्चरने दुस-या डावातील पहिल्या चेंडूवर फटकेबाजी करत रविवारी ईडन गार्डन्सवर कोलकाता नाइट रायडर्स (KKR) विरुद्ध राजस्थान रॉयल्सच्या IPL 2026 सामन्यात मोहम्मद...

सुंदर इंडो-अरबी आणि पर्शियन बाळाची नावे भारतीय कुटुंबांमध्ये शांतपणे वापरली जातात

बाळाची नावे अनेकदा शांतपणे पसरतात, जास्त लक्ष न देता. आजी-आजोबांच्या माध्यमातून, जुन्या कवितांची पुस्तके, कौटुंबिक कथा, तर कधी फक्त आवाजातून. बऱ्याच भारतीय घरांमध्ये, इंडो-अरबी...

एनसीडब्ल्यूने परतवाडा प्रकरणातील आरोपींवर कठोर आरोपांची मागणी केली आहे

पुणे: राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) अधिकाऱ्यांना अमरावतीमधील परतवाडा प्रकरणाच्या संदर्भात फॉरेन्सिक विश्लेषण जलदगतीने करण्याचे आणि दर पाच दिवसांनी प्रगती अहवाल सादर करण्याचे...

महाराष्ट्राच्या रेल्वे स्थानकावर माणूस गॅन्ट्रीवर चढला, हाय-टेन्शन वायरमधून लटकला; सेवा 40 मिनिटे दाबली

मुंबई: महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील मनमाड रेल्वे स्थानकावर एका मतिमंद व्यक्तीने गॅन्ट्रीवर चढून उच्च-टेंशन ओव्हरहेड वायर्समधून लटकले, ज्यामुळे अधिकाऱ्यांना वीज बंद करण्यास भाग...
error: Content is protected !!